शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
2
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
3
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
4
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
5
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
6
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
7
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
8
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
9
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
10
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
11
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
12
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
13
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
14
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन
15
एशियाटिक अध्यक्षपदासाठी २ माजी खासदार आमनेसामने; लढतीबाबत उत्सुकता
16
इंडक्शन कुकिंग वापरणाऱ्यांना फूटपाथवर अन्न शिजवण्यास मनाईचे ते परिपत्रक गैरलागू: हायकाेर्ट
17
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
18
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
19
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
20
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले

कोरोनाग्रस्तांवर अंत्यसंस्कार करणारी जिवंत माणसं कोरोनापासून दूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:19 IST

अहमदनगर : कोरोनामुळे दररोज पाच ते सहाजणांना जीव गमवावा लागत आहे. कोरोनाग्रस्तांवर शहरातील अमरधाम येथे अंत्यसंस्कार केले जात असून, ...

अहमदनगर : कोरोनामुळे दररोज पाच ते सहाजणांना जीव गमवावा लागत आहे. कोरोनाग्रस्तांवर शहरातील अमरधाम येथे अंत्यसंस्कार केले जात असून, कोरोनाग्रस्तांवर अंत्यसंस्कार करणारे मात्र कोरानापासून दूर आहेत. अंत्यसंस्कार करणाऱ्या एकाही कर्मचाऱ्याला कोराना झालेला नाही, असे मनपाच्या कामगारांकडून सांगण्यात आले.

कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तीच्या आसपासही कुणी फिरकत नाही. अगदी कुंटुंबातील व्यक्तीही त्याच्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करतात. कोरोनाग्रस्तांचे मृतदेह नातेवाईकांच्या हाती न देता, प्रशासनाकडूनच त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातात. त्यासाठी महापालिकेने चार कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. हे कर्मचारी स्वत:च्या आरोग्याची व कुटुंबाची काळजी घेत कोरोनाग्रस्तांवर अंत्यसंस्कार करतात. रुग्णालयातून मृतदेह शववाहिकेतून प्लास्टिकमध्ये गुंडाळून अमरधाम येथे आणला जातो. तिथे पोहोचल्यानंतर प्रवेशव्दारावर हे कर्मचारी मृतदेह शववाहिनीतून बाहेर काढून नातेवाईकांना लांबून दर्शन देतात. नातेवाईकांना प्रवेशव्दाराच्या बाहेर उभे राहण्यास सांगितले जाते. नातेवाईकही सूचनांचे पालन करतात. पीपीई किट घालूनच कर्मचारी कोरोनाग्रस्तांचे मृतदेह हाताळतात. स्वत:ची काळजी घेऊन मृतदेहावर अंत्यसंस्कार करत असल्याने अजून तरी कुणीही कर्मचारी पॉझिटिव्ह आलेला नाही, असे या कर्मचाऱ्यांनी सांगितले.

...

अंत्यसंस्कारासाठी ११.३०पर्यंत मुदत

जिल्हा रुग्णालयासह खासगी रुग्णालयात कोरोनामुळे मृत झालेल्यांचे मृतदेह साडेअकरा वाजेपर्यंतच अमरधाममध्ये पाठवले जातात. त्यानंतर मृत्यू झालेल्यांचे मृतदेह दुसऱ्या दिवशी सकाळी पाठवले जात असल्याने सर्व कर्मचारी साडेअकरापर्यंत थांबतात.

....

अंत्यसंस्काराचा भार चौघांवर

कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी महापालिकेने चार कर्मचाऱ्यांची नेमणूक केली आहे. काही दिवसांपूर्वी १८ ते २० मृतदेह अंत्यसंस्कारासाठी येत होते. सध्या दररोज ५ ते ६ मृतदेह अंत्यसंस्कारासाठी येत असल्याचे या कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात आले.

....

सूचना: फोटो आहे.