शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

कोरोनाग्रस्तांवर अंत्यसंस्कार करणारी जिवंत माणसं कोरोनापासून दूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:19 IST

अहमदनगर : कोरोनामुळे दररोज पाच ते सहाजणांना जीव गमवावा लागत आहे. कोरोनाग्रस्तांवर शहरातील अमरधाम येथे अंत्यसंस्कार केले जात असून, ...

अहमदनगर : कोरोनामुळे दररोज पाच ते सहाजणांना जीव गमवावा लागत आहे. कोरोनाग्रस्तांवर शहरातील अमरधाम येथे अंत्यसंस्कार केले जात असून, कोरोनाग्रस्तांवर अंत्यसंस्कार करणारे मात्र कोरानापासून दूर आहेत. अंत्यसंस्कार करणाऱ्या एकाही कर्मचाऱ्याला कोराना झालेला नाही, असे मनपाच्या कामगारांकडून सांगण्यात आले.

कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तीच्या आसपासही कुणी फिरकत नाही. अगदी कुंटुंबातील व्यक्तीही त्याच्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करतात. कोरोनाग्रस्तांचे मृतदेह नातेवाईकांच्या हाती न देता, प्रशासनाकडूनच त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातात. त्यासाठी महापालिकेने चार कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. हे कर्मचारी स्वत:च्या आरोग्याची व कुटुंबाची काळजी घेत कोरोनाग्रस्तांवर अंत्यसंस्कार करतात. रुग्णालयातून मृतदेह शववाहिकेतून प्लास्टिकमध्ये गुंडाळून अमरधाम येथे आणला जातो. तिथे पोहोचल्यानंतर प्रवेशव्दारावर हे कर्मचारी मृतदेह शववाहिनीतून बाहेर काढून नातेवाईकांना लांबून दर्शन देतात. नातेवाईकांना प्रवेशव्दाराच्या बाहेर उभे राहण्यास सांगितले जाते. नातेवाईकही सूचनांचे पालन करतात. पीपीई किट घालूनच कर्मचारी कोरोनाग्रस्तांचे मृतदेह हाताळतात. स्वत:ची काळजी घेऊन मृतदेहावर अंत्यसंस्कार करत असल्याने अजून तरी कुणीही कर्मचारी पॉझिटिव्ह आलेला नाही, असे या कर्मचाऱ्यांनी सांगितले.

...

अंत्यसंस्कारासाठी ११.३०पर्यंत मुदत

जिल्हा रुग्णालयासह खासगी रुग्णालयात कोरोनामुळे मृत झालेल्यांचे मृतदेह साडेअकरा वाजेपर्यंतच अमरधाममध्ये पाठवले जातात. त्यानंतर मृत्यू झालेल्यांचे मृतदेह दुसऱ्या दिवशी सकाळी पाठवले जात असल्याने सर्व कर्मचारी साडेअकरापर्यंत थांबतात.

....

अंत्यसंस्काराचा भार चौघांवर

कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी महापालिकेने चार कर्मचाऱ्यांची नेमणूक केली आहे. काही दिवसांपूर्वी १८ ते २० मृतदेह अंत्यसंस्कारासाठी येत होते. सध्या दररोज ५ ते ६ मृतदेह अंत्यसंस्कारासाठी येत असल्याचे या कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात आले.

....

सूचना: फोटो आहे.