शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

जागरूक नागरिकांनी घातला बंद सिग्नलला चपलांचा हार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 16:50 IST

प्रशासनाने मोठा गाजावाजा करत नुकताच रस्ता सुरक्षा अभियानाचा शुभारंभ केला आहे. प्रत्यक्षात मात्र नगर शहरातच वर्दळ असलेल्या चौकातील सिग्नल गेल्या अनेक वर्षांपासून बंद आहेत. प्रशासनाच्या या कृत्रिम अभियानाचा शुक्रवारी जागरुक नागरिक मंचच्यावतीने निषेध नोंदवून शहरातील सक्कर चौकातील बंद पडलेल्या सिग्नलला चपलांचा हार घालून गांधीगिरी केली.

अहमदनगर : प्रशासनाने मोठा गाजावाजा करत नुकताच रस्ता सुरक्षा अभियानाचा शुभारंभ केला आहे. प्रत्यक्षात मात्र नगर शहरातच वर्दळ असलेल्या चौकातील सिग्नल गेल्या अनेक वर्षांपासून बंद आहेत. प्रशासनाच्या या कृत्रिम अभियानाचा शुक्रवारी जागरुक नागरिक मंचच्यावतीने निषेध नोंदवून शहरातील सक्कर चौकातील बंद पडलेल्या सिग्नलला चपलांचा हार घालून गांधीगिरी केली.

यावेळी मंचाचे अध्यक्ष सुहास मुळे यांच्यासह वसंत लोढा, प्रा.सुनील पंडित, मिलिंद मोभारकर, नितीन भूतारे, जागरूक नागरिक मंचचे सचिव कैलास दळवी, धनेश बोगावत आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना मुळे म्हणाले २५ लाख रुपये खर्च करून उभारलेले सिग्नल गेल्या पाच वर्षंपासून बंद आहेत. कायनेटिक चौक, सक्कर चौक व स्वस्तिक चौक या गर्दीच्या ठिकाणी कायम वाहतुकीची कोंडी व अपघात होत आहेत. नगरची वाहतूक शाखा मात्र वर्धापन दिन साजरा करत आहे. प्रशासकीय अधिकारी रस्ता सुरक्षा अभियानात केवळ फोटोशेसन करण्यातच धन्यता मानत आहेत. मागील पाच वर्षांमध्ये वाहतूक शाखेमध्ये अनेक अधिकारी येऊन गेले. महपालिकेतही अनेक लोकप्रतिनिधी व महापौर होऊन गेले, परंतु एकानेही रस्ते आणि वाहतूक नियंत्रण, ट्रॅफिक सिग्नल याबाबत कोणताही ठोस निर्णय घेत प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला नाही.

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरroad transportरस्ते वाहतूकTrafficवाहतूक कोंडी