शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
2
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
3
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
4
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
5
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
6
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
7
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
8
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
9
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
10
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
11
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
12
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
13
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
14
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
15
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
16
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
17
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
18
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
19
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
20
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
Daily Top 2Weekly Top 5

मोबाईल गेममुळे पारंपरिक खेळाकडे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2018 12:50 IST

इंटरनेटच्या अतिवापरामुळे बालगोपाळांसह तरूणांचे पारंपरिक खेळाकडे दुर्लक्ष झाल्याचे चित्र सध्या पहावयास मिळत आहे.

इसाक शेखबालमटाकळी : इंटरनेटच्या अतिवापरामुळे बालगोपाळांसह तरूणांचे पारंपरिक खेळाकडे दुर्लक्ष झाल्याचे चित्र सध्या पहावयास मिळत आहे.पूर्वी शाळेतील सुट्टी, उन्हाळ्याच्या सुट्या किंवा इतर रिकाम्यावेळी बालगोपाळ, तरूण पारंपरिक खेळ खेळताना दिसत होते. मात्र सध्या स्मार्टफोन व सोशल मीडियामुळे लपंडाव, क्रिकेट, सागरगोटे,भोवरा,सुरपारंब्या, गोट्या, कबड्डी, खो-खो, विटी-दांडू,संगीतखुर्ची, साप शिडी, आठचल्लस, चंफूल, लगोरी,घोडी, शिवना पाणी, आंधळी कोशिंबीर अशा पारंपरिक खेळांची जागा स्मार्ट फोन व इंटरनेटने घेतली आहे. जुन्या खेळांमधून संघभावना, स्नेहभावना, एकमेकांना मदत करणे, जबाबदारीचे महत्त्व यासह नेतृत्वगुण सहजतेने विकसित होणे असे गुण वाढीस लागत होते. मामाच्या गावी हा खेळ खेळण्याची मजा काही वेगळीच होती.मोबाईलच्या अतिरेकी वापरामुळे मुलांचे अभ्यासाकडे दुर्लक्ष होऊन आरोग्य धोक्यात आले आहे. मुले व पालकांमध्ये संभाषण कमी होऊन सोशल मीडियावर मुलांचा जीव गुंतला आहे. काही मुले तर मोबाईलच्या अतिवापरामुळे वेगळ्या मार्गाने वाहत जाताना दिसत आहे. मोबाईलमुळे मुले व्यसनात गुरफटत चालली आहेत. अगदी पाच ते सहा वर्षांची लहान मुलेही स्मार्टफोनचा आग्रह धरू लागली आहेत. तरूणाई तर तासन्तास फेसबुक व व्हॉट्सअ‍ॅपवर व्यस्त असतात. एकत्र राहूनही प्रत्यक्ष आपापसात बोलण्याऐवजी मुले तासन् तास सोशल मीडियास प्राधान्य देत आहेत. या आभासी जगात लहान थोरांसह तरूण मुले पूर्णत: गुंतून गेलेली आहेत. या बाबींचा अतिरेक झाल्यामुळे मुलांमध्ये लहान व तरूण वयातच डोळ्यांचे विकार, डोकेदुखी, एकाग्रता नसणे, वाचनाकडे दुर्लक्ष, चिडचिडेपणा, एकलकोंडेपणा यासारख्या आदी समस्या मुलांमध्ये वाढत आहेत. त्यामुळे तरुणांच्या व लहान मुलांच्या व्यक्तिमत्वावर व कार्यक्षमतेवर परिणाम होण्याची शक्यता अभ्यासक व्यक्त करीत आहेत.मोबाईल व स्मार्टफोनच्या अतिवापरामुळे लहान मुलांसह तरूणांमध्ये डोळ्यांचे आजार उद्भवत आहेत. मोबाईलच्या अतिरेकी वापरामुळे लहान मुलांचा बौद्धिक व शारीरिक विकास खुंटत चालला आहे. मोबाईलमुळे मुले हट्टी, एकलकोंडी होतात. मोबाईल घेऊन तासन्तास एका जागी बसून राहिल्यामुळे शारीरिक व मानसिक वाईट परिणाम झालेले दिसतात. सतत मोबाईलकडे पाहण्यामुळे डोळ्यांचा त्रास होतो. मुले बाहेर खेळायला न गेल्यामुळे शारीरिक वाढ खुंटते. प्रत्येक मोबाईलमध्ये इंटरनेट असल्यामुळे कोणतीही माहिती, व्हिडीओ पहायला मिळत असल्याने मुले आहारी जात आहेत. -डॉ. विठ्ठल बुधवंत, बालमटाकळी.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर