शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने इतिहास घडवला! महिलांनी केवळ विश्वचषक नव्हे, तर भारतीयांचे हर'मन' ही जिंकले !
2
आजचे राशीभविष्य,०३ नोव्हेंबर २०२५: इतरांचे भले करण्याच्या नादात संकटे येतील; पदोन्नती, व्यापारी सौदे यशस्वी
3
'बाहुबली'ने उचलला ४,४१० किलोचा भार, सर्वात जड उपग्रहाला पाठवले अवकाशात
4
मंत्री बंगल्यावरील कामात कोट्यवधीच्या भ्रष्टाचारावर माेहाेर; चौकशीत अभियंते दोषी
5
लेख: एकीकडे शांततेच्या गप्पा, दुसरीकडे अणुबॉम्ब परीक्षण! डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा चेहरा उघड
6
‘परिवहन’ची मंजुरी इलेक्ट्रिकला अन् सुसाट धावतात पेट्रोल बाइक टॅक्सी; कारवाईला ठेंगा
7
अग्रलेख: ‘सत्या’च्या मोर्चात ‘महा-मनसे’! मविआ + राज ठाकरे : शक्तिप्रदर्शन अर्थातच मोठे !!
8
महापौर आमचाच होऊ दे; उद्धव ठाकरे यांचे महोत्सवात देवाला गाऱ्हाणे; कार्यकर्त्यांना सल्ला
9
पॅलेस्टाइन-इस्रायल युद्धाच्या झळांनी होरपळलेले नागरिक आणि ‘कलिंगड’ आइस्क्रीम!
10
कोस्टल रोड वाहतुकीसाठी २४ तास खुला; पण अंधारातून प्रवास असल्याने अपघाताचा धोका वाढला !
11
बांगलादेशींच्या मुद्द्यावरून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी; पालिका निवडणुकीमुळे वातावरण तप्त
12
विशेष लेख: शेतकऱ्यांना कर्जमुक्ती नाही, तर आम्ही थांबणार नाही; हा एल्गार थांबणार नाही..!!
13
IND vs SA Final :अमनजोत कौरनं घेतलेल्या लॉराच्या कॅचवर फिरली मॅच; व्हिडिओ बघाच
14
Womens World Cup Final:'वाइल्ड कार्ड' एन्ट्रीसह आली अन् बॅटिंगनंतर बॉलिंगमध्येही 'ट्रम्प कार्ड' ठरली (VIDEO)
15
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
16
शफालीसह दीप्तीचं अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियानं सेट केलं २९९ धावांचे टार्गेट
17
मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा
18
वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...
19
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
20
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी

उघड्यावरचे पदार्थ खाणे, दूषित पाणी पिणे टाळावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:17 IST

पावसाळ्यात सर्दी-खोकला, ताप, जुलाब, गॅस्ट्रो, टायफाॅईड, कावीळ, कॉलरा, डेंग्यू, मलेरिया, त्वचेचे विकार आदी आजारांचे रुग्ण डॉक्टरांकडे ओपीडीत तपासणीसाठी, रुग्णालयात ...

पावसाळ्यात सर्दी-खोकला, ताप, जुलाब, गॅस्ट्रो, टायफाॅईड, कावीळ, कॉलरा, डेंग्यू, मलेरिया, त्वचेचे विकार आदी आजारांचे रुग्ण डॉक्टरांकडे ओपीडीत तपासणीसाठी, रुग्णालयात उपचारांसाठी आलेले पाहायला मिळतात. पावसाळ्यात उघड्यावरचे, तेलकट-तुपकट पदार्थ, शिळे अन्न, अती तिखट खाणे पूर्णपणे टाळावे. आहारात ताजे अन्न असावे. पाऊस पडल्यानंतर चमचमीत खाण्याचा मोह होतो. मात्र, बाहेरचे पदार्थ खात असल्यास ते टाळायला हवे. बाहेर खाल्ल्यानंतर आपण तेथेच पाणी पितो. हे पाणी अशुद्ध असल्यास पोटाचे आजार वाढण्याची शक्यता असते. त्यातून प्रतिकारशक्ती कमी होऊन इतरही आजार असलेल्यांसाठी हे धोकादायक ठरू शकते.

कोरोनाच्या काळात प्रतिकारशक्ती चांगली राहण्यासाठी पालेभाज्या, फळे खाणे चांगले आहे. मात्र, फळे, भाज्या चांगल्या स्वच्छ कराव्यात. भरपूर प्रमाणात पाणी प्यावे. हळद, आले, लसूण, सुंठ या पदार्थांचे सेवन करणे लाभदायी मानले जाते. सर्दी, खोकला वाटल्यास गरम पाण्याची वाफ घ्यावी. शक्यतो पदार्थ गरम असतानाच ते खावेत. पचनाला जड असणारे पदार्थ, फास्टफूड, जंकफूड खाणे टाळावे. काही त्रास जाणवल्यास मनानेच कुठलीही औषधी, गोळ्या न घेता तात्काळ डॉक्टरांना दाखवावे.

---------------

काळजी घेणे गरजेचे

साचलेल्या पाण्यातून डासांची उत्पत्ती होते. पावसाळ्यात डब्यात, गच्चीवर, गॅलरीमध्ये ठेवलेल्या वस्तू, अडगळीत ठेवलेले टायर यात पाणी साचून डासांची अधिक उत्पत्ती होते. डास चावल्यास डेंग्यू, मलेरिया असे आजार होतात. खिडक्यांना जाळ्या बसवणे गरजेचे असून लहान मुलांना मच्छरदानीमध्ये झोपवावे.

------------------

होऊ शकतो सर्दी, खोकला

लहान मुलांना आईस्क्रिम, कोल्ड्रिंक असे थंड पदार्थ देणे टाळावे. अनेकांना वर्षभर फ्रिजमधील थंड पाणी पिण्याची सवय असते. हीच सवय घरातील लहान मुलांनाही लागते. पावसाळ्यात थंड पाणी पिल्याने त्याचा घशाला त्रास होऊन सर्दी, खोकला होऊ शकतो.

-----------------

आल्याचा चहा घ्यावा

पावसाळ्यात कच्चे, तळलेले आणि आंबवलेले पदार्थ खाऊ नयेत. पावसाळ्यात पचनक्रिया नाजूक होते. त्यामुळे घरगुती जेवणच चांगले. मांसाहार शक्यतो टाळावा. पावसाळ्यात आल्याचा चहा घ्यावा. लहान मुलांना पाणी उकळून ते थंड करून गाळून द्यावे. मोठ्यांनी हे करावे.

------------------

पावसाळ्यात उघड्यावरचे पदार्थ खाल्ल्याने अनेक आजार बळावण्याची शक्यता अधिक असते. अन्नपदार्थांवर घोंगावणाऱ्या माशांचे प्रमाण वाढलेले असते. त्यामुळे बॅक्टेरिया पसरून पोटाचे आजार होऊ शकतात. उलट्या, जुलाब, ताप येणे ही पावसाळ्यातील आजारांची लक्षणे आहेत. कॉलरा, गॅस्ट्रो, टायफाॅईड यासारख्या आजारांची सा‌थ पावसाळ्यात दिसून येते.

-

- डॉ. सुशांत गीते, फिजिशयन, संगमनेर