शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

उघड्यावरचे पदार्थ खाणे, दूषित पाणी पिणे टाळावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:17 IST

पावसाळ्यात सर्दी-खोकला, ताप, जुलाब, गॅस्ट्रो, टायफाॅईड, कावीळ, कॉलरा, डेंग्यू, मलेरिया, त्वचेचे विकार आदी आजारांचे रुग्ण डॉक्टरांकडे ओपीडीत तपासणीसाठी, रुग्णालयात ...

पावसाळ्यात सर्दी-खोकला, ताप, जुलाब, गॅस्ट्रो, टायफाॅईड, कावीळ, कॉलरा, डेंग्यू, मलेरिया, त्वचेचे विकार आदी आजारांचे रुग्ण डॉक्टरांकडे ओपीडीत तपासणीसाठी, रुग्णालयात उपचारांसाठी आलेले पाहायला मिळतात. पावसाळ्यात उघड्यावरचे, तेलकट-तुपकट पदार्थ, शिळे अन्न, अती तिखट खाणे पूर्णपणे टाळावे. आहारात ताजे अन्न असावे. पाऊस पडल्यानंतर चमचमीत खाण्याचा मोह होतो. मात्र, बाहेरचे पदार्थ खात असल्यास ते टाळायला हवे. बाहेर खाल्ल्यानंतर आपण तेथेच पाणी पितो. हे पाणी अशुद्ध असल्यास पोटाचे आजार वाढण्याची शक्यता असते. त्यातून प्रतिकारशक्ती कमी होऊन इतरही आजार असलेल्यांसाठी हे धोकादायक ठरू शकते.

कोरोनाच्या काळात प्रतिकारशक्ती चांगली राहण्यासाठी पालेभाज्या, फळे खाणे चांगले आहे. मात्र, फळे, भाज्या चांगल्या स्वच्छ कराव्यात. भरपूर प्रमाणात पाणी प्यावे. हळद, आले, लसूण, सुंठ या पदार्थांचे सेवन करणे लाभदायी मानले जाते. सर्दी, खोकला वाटल्यास गरम पाण्याची वाफ घ्यावी. शक्यतो पदार्थ गरम असतानाच ते खावेत. पचनाला जड असणारे पदार्थ, फास्टफूड, जंकफूड खाणे टाळावे. काही त्रास जाणवल्यास मनानेच कुठलीही औषधी, गोळ्या न घेता तात्काळ डॉक्टरांना दाखवावे.

---------------

काळजी घेणे गरजेचे

साचलेल्या पाण्यातून डासांची उत्पत्ती होते. पावसाळ्यात डब्यात, गच्चीवर, गॅलरीमध्ये ठेवलेल्या वस्तू, अडगळीत ठेवलेले टायर यात पाणी साचून डासांची अधिक उत्पत्ती होते. डास चावल्यास डेंग्यू, मलेरिया असे आजार होतात. खिडक्यांना जाळ्या बसवणे गरजेचे असून लहान मुलांना मच्छरदानीमध्ये झोपवावे.

------------------

होऊ शकतो सर्दी, खोकला

लहान मुलांना आईस्क्रिम, कोल्ड्रिंक असे थंड पदार्थ देणे टाळावे. अनेकांना वर्षभर फ्रिजमधील थंड पाणी पिण्याची सवय असते. हीच सवय घरातील लहान मुलांनाही लागते. पावसाळ्यात थंड पाणी पिल्याने त्याचा घशाला त्रास होऊन सर्दी, खोकला होऊ शकतो.

-----------------

आल्याचा चहा घ्यावा

पावसाळ्यात कच्चे, तळलेले आणि आंबवलेले पदार्थ खाऊ नयेत. पावसाळ्यात पचनक्रिया नाजूक होते. त्यामुळे घरगुती जेवणच चांगले. मांसाहार शक्यतो टाळावा. पावसाळ्यात आल्याचा चहा घ्यावा. लहान मुलांना पाणी उकळून ते थंड करून गाळून द्यावे. मोठ्यांनी हे करावे.

------------------

पावसाळ्यात उघड्यावरचे पदार्थ खाल्ल्याने अनेक आजार बळावण्याची शक्यता अधिक असते. अन्नपदार्थांवर घोंगावणाऱ्या माशांचे प्रमाण वाढलेले असते. त्यामुळे बॅक्टेरिया पसरून पोटाचे आजार होऊ शकतात. उलट्या, जुलाब, ताप येणे ही पावसाळ्यातील आजारांची लक्षणे आहेत. कॉलरा, गॅस्ट्रो, टायफाॅईड यासारख्या आजारांची सा‌थ पावसाळ्यात दिसून येते.

-

- डॉ. सुशांत गीते, फिजिशयन, संगमनेर