शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

भाजपाचा शिक्षणव्यवस्था मोडीत काढण्याचा प्रयत्न

By admin | Updated: February 21, 2016 23:47 IST

अहमदनगर : शिक्षकांचे प्रश्न सोडविण्याऐवजी त्यांचे शोषण करुन शिक्षणव्यवस्था मोडीत काढण्याचे काम भाजप सरकारकडून सुरू आहे.

अहमदनगर : शिक्षकांचे प्रश्न सोडविण्याऐवजी त्यांचे शोषण करुन शिक्षणव्यवस्था मोडीत काढण्याचे काम भाजप सरकारकडून सुरू आहे. विद्यार्थ्यांवरही देशद्रोहाचे खटले भरले जात आहेत. यामुळे शिक्षक व तरुणांनी संघटीत राहून मुकाबला करणे आवश्यक आहे. घटनेने शिक्षक आणि मुख्याध्यापकांना मोठा अधिकार दिला असून त्याचा वापर करण्यास शिका, असे प्रतिपादन शिक्षक भारतीचे संस्थापक आमदार कपिल पाटील यांनी केले. प्राथमिक शिक्षक भारती संघटनेचा जिल्हा मेळावा रविवारी येथे झाला. यावेळी ते बोलत होते. जिल्हा परिषद अध्यक्षा मंजुषा गुंड, शिक्षक भारतीचे राज्य अध्यक्ष अशोक बेलसरे, प्रकाश दाणे, भरत शेलार, नवनाथ गेंड, गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे, प्राथमिक शिक्षक भारतीचे राज्य उपाध्यक्ष दिनेश खोसे, वसंत कर्डिले, सुनील मते, काळू धनगर, सुनील गाडगे, अप्पासाहेब जगताप, बाबासाहेब लोंढे, आशा मगर, विभावरी रोकडे यांची प्रमुख उपस्थिती होती. पाटील म्हणाले, वस्तीशाळा शिक्षकांनी एकत्रित नियोजनपूर्वक लढा दिल्याने त्यांना यश आले. वाड्या- वस्त्यांवरील मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे काम या शिक्षकांनी केले आहे. शिक्षणमंत्री शाळाबाह्य विद्यार्थ्यांबाबत बोलतात. मात्र, वस्तीशाळा शिक्षकांनी आतापर्यंत लाखो विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले असताना सरकारकडून या शिक्षकांचे शोषण सुरू आहे. या शिक्षकांचा मूळ सेवेचा विषय असून त्यासाठी कायदेशीर पातळीवर सल्ला घेवून हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. २००५ नंतर सेवेत आलेल्या शिक्षकांच्या पेन्शनचा विषय आहे. हा प्रकार केवळ शिक्षकांच्या बाबतीत नसून सर्व शासकीय कर्मचाऱ्यांबाबत आहे. हा प्रश्न सोडवणे कठीण असले तरी अशक्य नाही. यासाठी सर्वांनी एकत्र येणे आवश्यक आहे. सरकारकडून कायदे संपवण्याचा प्रयत्न सुरू आहे. फसवून सत्तेत आलेल्या भाजपा सरकारने शिक्षकांचे शोषण करू नये. ज्या देशात शिक्षकांचे शोषण होते, तो देश पुढे जावू शकत नाही, अशी टीका पाटील यांनी केली. कोणत्याही क्षेत्रात शिक्षकांशिवाय प्रगती नसल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मेळाव्यात सुरुवातीला गुंड यांनी मार्गदर्शन केले. अनुदानित शिक्षण बंद करण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे यावेळी बेलसरे म्हणाले. लवकरच शिक्षक भारतीची एकदिवसीय शिक्षण परिषद घेण्याचा प्रयत्न असल्याचे गेंड यांनी सांगितले. यावेळी खोसे, दाणे यांची भाषणे झाली. (प्रतिनिधी)मेळाव्यात जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या निवडणुकीचा विषय दिनेश खोसे यांनी काढला. यंदाच्या निवडणुकीत प्राथमिक शिक्षक भारतीच्या कार्यकर्त्यांनी सहभागी होवू नये. पुढील वर्षी शिक्षक भारती स्वतंत्र पॅनल करणार असून आ. कपिल पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिक्षक बँक ताब्यात घेण्याचा मानस त्यांनी बोलून दाखवला.