शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
4
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
5
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
6
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
7
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
8
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
9
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
10
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
11
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
12
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
13
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
14
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
15
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
16
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
17
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
18
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
19
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
20
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या

मूल्यमापन पुढील वर्षीही होईल, आता सुरक्षा महत्त्वाची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 04:18 IST

राज्यात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असल्याने सुरक्षेच्या कारणास्तव शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी पहिली ते आठवी आणि नववी व अकरावी ...

राज्यात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असल्याने सुरक्षेच्या कारणास्तव शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी पहिली ते आठवी आणि नववी व अकरावी या विद्यार्थ्यांच्या कोणत्याही परीक्षा न घेता त्यांना पुढील वर्गात प्रवेश देण्याबाबत निर्णय घेतला आहे. शासनाचा हा निर्णय योग्य आहे का? मुलांची कोणतीही परीक्षा न घेता, मूल्यमापन न करता त्यांना पुढील वर्गात ढकलणे योग्य आहे का? या निर्णयामुळे विद्यार्थ्यांचे वर्ष वाया गेल्यासारखे होते का? या अनुषंगाने लोकमतने शिक्षणतज्ज्ञ तसेच पालकांची मते जाणून घेतली. त्यावर शिक्षणतज्ज्ञांनी शासनाच्या या निर्णयाचे स्वागत केले. या भयानक काळात विद्यार्थ्यांच्या सुरक्षितेच्या दृष्टीने शासनाने परीक्षा रद्द केल्या हा निर्णय अतिशय योग्य आहे. मुळात शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे वर्षभर आकारिक मूल्यमापन केलेलेच आहे. केवळ संकलित मूल्यमापन बाकी आहे. हे मूल्यमापन किंवा राहिलेला अभ्यास पुढील वर्गात पुढच्या वर्षी शिक्षक पूर्ण करू शकतात. त्यामुळे विद्यार्थ्यांचे असे काही विशेष नुकसान होणार नाही; परंतु हा काळ सुरक्षेचा आहे. त्यामुळे सर्वांनी सध्या आपली सुरक्षा घेणे, सुरक्षित राहणे महत्त्वाचे आहे, असे मत शिक्षणतज्ज्ञासह पालकांनी व्यक्त केले.

-------------

पहिली ते आठवीच्या वर्गांना शिक्षण हक्क अंतर्गत पुढील वर्गात पाठवण्याचा निर्णय योग्य आहे; परंतु नववी आणि अकरावीचे मूल्यमापन व्हायला हवे होते. शाळा स्तरावर या वर्गांची बरीचशी तयारी शिक्षकांनी करून घेतलेली आहे.

- प्राचार्य सुनील पंडित, जिल्हाध्यक्ष, मुख्याध्यापक संघटना

-------------

सध्याच्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना वर्गोन्नत करण्याचा शासनाचा निर्णय अतिशय योग्य आहे. परीक्षा न घेतल्यामुळे विद्यार्थ्यांचे जे काही नुकसान होणार आहे ते पुढील वर्षी पुढील वर्गात शिक्षक भरून काढू शकतात. त्यासाठी शासनानेच चार महिन्यांचा एखादा ब्रीज कोर्स तयार करून राज्यभर तो राबवावा. त्यातून ही उणीव भरून निघू शकेल.

- भाऊसाहेब चासकर, शिक्षणतज्ज्ञ

-------------

शिक्षकांनी वर्षभर मुलांपर्यंत पोहोचून आकारिक मूल्यमापन केलेले आहे. त्यामुळे परीक्षा न घेतल्याने विद्यार्थ्यांचे मूल्यमापन होणार नाही हा समज चुकीचा आहे. ऑनलाइन परीक्षा घेण्यातही तंत्रज्ञानाच्या अनेक अडचणी आहेत. विशेषत: ग्रामीण भागात ही गोष्ट अशक्य वाटते.

-नारायण मंगलारम, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक

----------------------

सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव खूप वाढला आहे. त्यामुळे मुलांना शाळेत पाठवणे धोक्याचे आहे. शासनाने परीक्षा रद्द केल्या ते बरे झाले.

- राजाराम चव्हाण, पालक

-------------

परीक्षा रद्द करण्याचा शासनाचा निर्णय योग्य वाटतो. एखाद्या वर्षी परीक्षा झाली नाही किंवा अभ्यास झाला नाही म्हणून विशेष काही फरक पडत नाही, मात्र या घडीला विद्यार्थ्यांची सुरक्षा महत्त्वाची आहे.

- सुनील थोरात, पालक

----------------

वर्ग विद्यार्थीसंख्या

पहिली ६८,७१६

दुसरी ७४,८९६

तिसरी ७८,४५१

चौथी ८०,४४९

पाचवी ७९,६०५

सहावी ७९,७१६

सातवी ७९,७७८

आठवी ८०,०६८

नववी ८१,२००

अकरावी ६३,८२२