शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

स्थायी सदस्य निवडीसाठी महापौरांवर इच्छुकांचा दबाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:39 IST

अहमदनगर : महापालिकेत स्थायी समिती सदस्य पदावरून पुन्हा राजकीय धुरळा उडण्याची चिन्हे आहेत. स्थायी समितीचे आठ सदस्य सोमवारी निवृत्त ...

अहमदनगर : महापालिकेत स्थायी समिती सदस्य पदावरून पुन्हा राजकीय धुरळा उडण्याची चिन्हे आहेत. स्थायी समितीचे आठ सदस्य सोमवारी निवृत्त होत असून, त्यांच्या जागी नव्याने सदस्यांची निवड करण्यासाठी इच्छुकांचा दबाव वाढला आहे. त्यामुळे महापौर बाबासाहेब वाकळे याबाबत काय भूमिका घेतात, याकडे नगरसेवकांचे लक्ष लागले आहे.

महापालिका स्थायी समितीचे गणेश भोसले, कुमार वाकळे, सुवर्णा जाधव, मुदस्सर शेख, सोनाली चितळे, योगीराज गाडे, आशा कराळे, सुभाष लोंढे हे आठ सदस्य सोमवारी निवृत्त होत आहेत. स्थायी समितीत एकूण १६ सदस्य असतात. एक वर्षाने आठ सदस्य साेडतीद्वारे निवृत्त होत आहेत. उर्वरित आठ सदस्यांची मुदत दोन वर्षे आहे. वरील आठ सदस्यांच्या नावाची चिठ्ठी न निघाल्याने ते दोन वर्षे सदस्य राहिले. त्यांची दोन वर्षांची मुदत येत्या १ फेब्रुवारीला संपुष्टात येईल. त्यामुळे स्थायी समितीच्या आठ जागा रिक्त होतील. महासभा घेऊन नवीन आठ सदस्यांची निवड करावी, असे संकेत आहेत. सदस्य निवडीसाठीची महासभा बोलावण्याचा सर्वस्वी अधिकार महापौरांना आहे. त्यामुळे नगरसचिव कार्यालयाने तसा प्रस्ताव महापौर कार्यालयाकडे १ जानेवारी रोजी पाठविलेला आहे. परंतु, महापौर कार्यालयाकडून याबाबत कोणत्याही हालचाली नाहीत. त्यामुळे स्थायी समितीवर सदस्य म्हणून जाण्यासाठी इच्छुक असलेल्या सर्वच राजकीय पक्षांतील इच्छुकांकडून महासभा घेण्याची मागणी होत आहे. परंतु, नवीन आठ सदस्य निवडीसाठीचा कालावधी निश्चित नसल्याने आठ सदस्यांवरच स्थायीचा कारभार चालविला जाते. यापूर्वी तत्कालीन सभापती संजय गाडे यांच्या कार्यकाळात आठ सदस्यांवरच स्थायी समितीचा कारभार सुरू होता. त्याची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी इच्छुक अग्रही आहेत.

स्थायी समितीचे सभापती मनोज कोतकर हे राष्ट्रवादीकडून सभापती झाले आहेत. कोतकर यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा भाजपने दिला होता. भाजपने कोतकर यांच्याकडून खुलासाही मागविला होता. परंतु, कोतकर यांनी खुलासा केला नाही. भाजपनेही कोतकर यांच्याबाबत बोटचेपे धोरण घेत कारवाई करणे टाळले. त्यामुळे कोतकर हे भाजपचे की राष्ट्रवादीचे हे अजूनही गुलदस्त्यात आहे. त्यात आता आठ सदस्य निवृत्त होत असून, नवीन आठ सदस्य निवडीबाबत कोतकर यांची भूमिकाही महत्त्वाची आहे. नवीन सदस्य न निवडता आठ सदस्यांवरच कारभार सुरू ठेवण्याची कोतकर यांची इच्छा आहे. त्यामुळे आठ सदस्यांच्या मुदतवाढीसाठी कोतकर यांच्याकडून पडद्याआडून प्रयत्न सुरू आहेत. परंतु, त्यांचा हा प्रयत्न इच्छुक हाणून पाडतील, असेही बोलले जाते.

...

महापौरांच्या भूमिकेकडे नजरा

सर्वांत कमी संख्याबळ असूनही भाजपचे बाबासाहेब वाकळे महापौरपदी विराजमान झाले. सर्वच राजकीय पक्षांतील नगरसेवकांशी त्यांचे मैत्रीपूर्ण संबंध असल्याने त्यांचा कार्यकाळ शांततेत गेला. त्यांच्या दोन वर्षांच्या कार्यकाळात एकही निर्णय वादग्रस्त झाला नाही. पुढील पाच वर्षांतही वाद होणार नाहीत, याची काळजी महापाैर वाकळे घेताना दिसतात. स्थायी समिती सदस्य निवडीस विलंब करून ते इच्छुकांचा वाद ओढवून घेतील, असे वाटत नाही. त्यामुळे वाकळे यांच्या भूमिकेकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.