शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
7
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
8
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
9
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
10
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
11
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
12
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
13
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
14
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
15
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
16
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
17
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
18
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
19
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
20
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!

अशोकचे ३ लाख ८५ हजार टन गाळप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:20 IST

कारखाना दररोज साडे चार हजार टन उसाचे गाळप करत आहे. बाहेरील कारखान्यांना दररोज दोन ते अडीच हजार टन उसाचा ...

कारखाना दररोज साडे चार हजार टन उसाचे गाळप करत आहे. बाहेरील कारखान्यांना दररोज दोन ते अडीच हजार टन उसाचा पुरवठा केला जात आहे. आजअखेर एकूण ४ लाख ५५ हजार टन गाळप पूर्ण झाले आहे. चालू गाळप हंगामात कार्यक्षेञातील नऊ लाख ५० हजार आणि कार्यक्षेञाबाहेरील एक लाख असे १० लाख ५० हजार टन गाळपाचे नियोजन माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्या नेतृत्वाखाली व्यवस्थापनाने केले असल्याचे कहांडळ यांनी सांगितले. अशोकने प्रवरा, गणेश, राहुरी, युटेक व संगमनेर या बाहेरील कारखान्यांना ऊस पुरविला आहे. टनाचे गाळप होत आहे. संगमनेरशी एक लाख टन आणि प्रवरा कारखान्याशी दीड लाख टन पुरवठ्याचा करार करण्यात आला आहे. त्यामुळे कोणत्याही शेतकर्याचा ऊस गाळपाविना राहणार नाही, असे कहांडळ यांनी स्पष्ट केले.

मागील वर्षी चांगला पाऊस व पाटपाण्याचे नियोजनामुळे कार्यक्षेत्रात २४ हजार एकर ऊसाची लागवड झाली. यापैकी नोव्हेंबर व डिसेबर २०१९ या दोन महिन्यात १६ हजार एकर उसाची लागवड झाली. यामुळे उसाचे क्षेत्र वाढले. आडसाली उसाची लागवड मात्र नगण्य असल्याने लवकर पक्व होणाऱ्या जातीच्या उसाची व खोडव्याची नियमित तोड तारखेच्या एक महिना अगोदर केली जाते. त्यानंतर कोएम २६५ जातीच्या उसाला तोड मिळते. कोएम २६५ जातीचा ऊस हा १४ ते १८ महिन्यानंतर पक्व होतो. त्यामुळे त्याला साधारणतः फेब्रुवारी ते एप्रिल महिन्यात तोड मिळेल, असे ते म्हणाले.

..............

शेतकऱ्यांना मिळते पावती

शेतकर्यांना उसाच्या नोंदीची रितसर पावती दिली जाते. कर्ज प्रकरणासाठी प्रमाणत्र मिळते. त्यामुळे उसाच्या नोंदीच्या तारखेत फेरफार केला जातो या आरोपात तथ्य नाही.

परिसरातील आजूबाजूच्या कारखान्यांची ऑक्टोबर महिन्यातील ऊस तोड सुरू आहे. बाहेरच्या कारखान्यांना ऊस पुरवठा करणारे लोक अशोकबाबत आकसापोटी तक्रारी करतात, अशी टीका कहांडळ यांनी केली.