शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
5
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
6
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
7
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
8
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
9
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
10
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
11
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
12
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
13
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
14
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
15
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
16
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
17
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
18
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
19
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट

अशोक चव्हाणांच्या प्रवेशाने भाजपला धक्का, उद्धव ठाकरेंची थेट श्रीरामपुरातून टीका

By शिवाजी पवार | Updated: February 13, 2024 18:32 IST

शिवसेनेची संवाद यात्रा श्रीरामपुरात असताना ठाकरेंची सभा

शिवाजी पवार, लोकमत न्यूज नेटवर्क, श्रीरामपूर (जि. अहमदनगर): काँग्रेस नेते अशोक चव्हाणांवर भ्रष्टाचाराचे आरोप करणाऱ्या भाजपने त्यांना पक्षात प्रवेश दिला. या घटनेमुळे महाविकास आघाडीला नव्हे, तर भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना धक्का बसला आहे, अशी टीका माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. येथील गिरमे चौकात मंगळवारी आयोजित शिवसेनेच्या संवाद मेळाव्यात ठाकरे बोलत होते.

यावेळी शिवसेना नेते खासदार संजय राऊत, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, माजी मंत्री आमदार शंकरराव गडाख, मिलिंद नार्वेकर, वरुण सरदेसाई, माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे, माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, रावसाहेब खेवरे, संजय छल्लारे, सचिन बडधे, लखन भगत, निखिल पवार, अशोक थोरे यावेळी उपस्थित होते.

ठाकरे म्हणाले, नांदेडमध्ये अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान झाले. मात्र, अशोक चव्हाण यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाण्याऐवजी भाजपच्या दारात जाणे पसंत केले. आदर्श घोटाळ्याचा आरोप भाजपने त्यांच्यावर केला होता. चव्हाण यांच्या प्रवेशाने भाजपला धक्का बसला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रकार परिषदेत चव्हाण यांच्या प्रवेशावर उत्तर देता आलेले नाही. इंदापूरचे हर्षवर्धन पाटील त्यावेळी उपस्थित होते. त्यांनी दोन वर्षांपूर्वी भाजप प्रवेशानंतर निवांत झोप लागते, असे उद्गार काढले होते. त्यामुळे ‘ईडी’, ‘सीबीआय’पासून झोप घेण्यासाठी दुसऱ्या पक्षाच्या नेत्यांना भाजपमध्ये घेतले जात आहे.

भाजपच्या नेत्यांमध्ये कोणतेही कर्तृत्व नाही. त्यामुळे त्यांना दुसऱ्या पक्षातील नेत्यांना फोडावे लागत आहे. ‘भारतरत्न’ देऊन नेत्यांना फोडण्याचे काम भाजप करीत आहे, असे ठाकरे म्हणले.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरे