शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

अशोक चव्हाणांच्या प्रवेशाने भाजपला धक्का, उद्धव ठाकरेंची थेट श्रीरामपुरातून टीका

By शिवाजी पवार | Updated: February 13, 2024 18:32 IST

शिवसेनेची संवाद यात्रा श्रीरामपुरात असताना ठाकरेंची सभा

शिवाजी पवार, लोकमत न्यूज नेटवर्क, श्रीरामपूर (जि. अहमदनगर): काँग्रेस नेते अशोक चव्हाणांवर भ्रष्टाचाराचे आरोप करणाऱ्या भाजपने त्यांना पक्षात प्रवेश दिला. या घटनेमुळे महाविकास आघाडीला नव्हे, तर भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना धक्का बसला आहे, अशी टीका माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. येथील गिरमे चौकात मंगळवारी आयोजित शिवसेनेच्या संवाद मेळाव्यात ठाकरे बोलत होते.

यावेळी शिवसेना नेते खासदार संजय राऊत, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, माजी मंत्री आमदार शंकरराव गडाख, मिलिंद नार्वेकर, वरुण सरदेसाई, माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे, माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, रावसाहेब खेवरे, संजय छल्लारे, सचिन बडधे, लखन भगत, निखिल पवार, अशोक थोरे यावेळी उपस्थित होते.

ठाकरे म्हणाले, नांदेडमध्ये अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान झाले. मात्र, अशोक चव्हाण यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाण्याऐवजी भाजपच्या दारात जाणे पसंत केले. आदर्श घोटाळ्याचा आरोप भाजपने त्यांच्यावर केला होता. चव्हाण यांच्या प्रवेशाने भाजपला धक्का बसला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रकार परिषदेत चव्हाण यांच्या प्रवेशावर उत्तर देता आलेले नाही. इंदापूरचे हर्षवर्धन पाटील त्यावेळी उपस्थित होते. त्यांनी दोन वर्षांपूर्वी भाजप प्रवेशानंतर निवांत झोप लागते, असे उद्गार काढले होते. त्यामुळे ‘ईडी’, ‘सीबीआय’पासून झोप घेण्यासाठी दुसऱ्या पक्षाच्या नेत्यांना भाजपमध्ये घेतले जात आहे.

भाजपच्या नेत्यांमध्ये कोणतेही कर्तृत्व नाही. त्यामुळे त्यांना दुसऱ्या पक्षातील नेत्यांना फोडावे लागत आहे. ‘भारतरत्न’ देऊन नेत्यांना फोडण्याचे काम भाजप करीत आहे, असे ठाकरे म्हणले.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरे