शहरं
Join us  
Trending Stories
1
गिल ने जीता दिल! गुजरातचं धडाकेबाज 'कमबॅक', काव्या मारनचा SRH संघ स्पर्धेतून जवळपास OUT!
2
Video: भरमैदानात तुफान राडा.... शुबमन गिलचा संयम सुटला, पंचांच्या अंगावर ओरडला अन् मग...
3
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
4
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
5
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
6
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
7
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
8
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
9
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
10
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
11
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
12
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
13
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
14
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
15
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
16
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
17
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
18
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
19
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
20
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस

कावळे रुसले...दशक्रिया विधी थांबले; श्रीगोंद्यात नेमकं काय घडले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2022 10:49 IST

श्रीगोंदा शहरातील मयतांचे दशक्रिया विधी हे आता सिद्धटेक व इतरत्र केले जात आहेत. त्यामुळे सकाळी लवकर उठणे, दशक्रिया विधीला जाणे हे परवडण्यासारखे नाही.

श्रीगोंदा (जि. अहमदनगर) : दक्षिण काशी समजल्या जाणाऱ्या श्रीगोंदा येथील सरस्वती नदीवरील दशक्रिया विधी घाट श्रीगोंदा नगरपालिकेने सुमारे एक कोटी रुपये खर्च करून बांधला. मात्र दीड वर्षांपासून दशक्रिया विधीकडे कावळ्यांनी पाठ फिरवली आहे. त्यामुळे दशक्रिया विधी घाट ओस पडला आहे.

श्रीगोंदा शहरातील मयतांचे दशक्रिया विधी हे आता सिद्धटेक व इतरत्र केले जात आहेत. त्यामुळे सकाळी लवकर उठणे, दशक्रिया विधीला जाणे हे परवडण्यासारखे नाही. त्यात गरीब कुटुंबांना बाहेरच्या ठिकाणी जाऊन असे विधी करणे आवाक्याबाहेर असते. यामुळेच संभाजी ब्रिगेड, अरविंद कापसे यांच्या संकल्पनेतून खंडोबा मंदिरासमोर सरस्वती नदीच्या तिरावर २५ फेब्रुवारी ते १ मार्च या पाच दिवसांच्या कालावधीमध्ये सलग पाच दिवस दशक्रिया विधी पूजेचा प्रयोग करण्यात आला. तेथे पाच पैकी तीन वेळा काकस्पर्श झाला. त्यामुळे आता काय करायचे? असा प्रश्न नातेवाईकांसमोर आहे. कावळा शिवत नाही म्हणून आपण मृत्यू पावलेल्या माणसाला मोक्ष मिळाला नाही, असे समजले जाते. म्हणून काकस्पर्शासाठी आता श्रीगोंद्यातील घाटावर विधी नकोच, अशी मानसिकता झाली आहे.

पाच दशक्रिया करण्याच्या प्रयोगासाठी पुजारी मोहोळकर, संभाजी ब्रिगेड तालुकाध्यक्ष नाना शिंदे, दिलीप लबडे, अरविंद कापसे, राजेंद्र राऊत, सुनील ढवळे, ॲड. गोरख कडूस, दत्ताजी जगताप, सागर हिरडे, भाऊसाहेब खेतमाळीस, गणेश पारे, मयूर आढाव, प्रवीण धुमाळ, वैभव हिरडे, सूरज शिंदे, गणेश ससाणे यांनी या उपक्रमात भाग घेतला.

श्रीगोंदा शहरात हॉटेलची संख्या वाढली आहे. हॉटेलमधील शिल्लक अन्न उघड्यावर मोठ्या प्रमाणात टाकलेले असते. त्यामुळे पक्षांना सहज पद्धतीने आहार उपलब्ध होतो. तसेच दशक्रिया घाटावर झाडांची संख्या कमी आहे. या दोन कारणांमुळे दशक्रिया विधी घाटाकडे येणाऱ्या कावळ्यांची संख्या कमी झाली आहे. घाट परिसरात वृक्षारोपण होणेही गरजेचे आहे. -दत्ता जगताप, दक्ष फौंडेशन, श्रीगोंदा