शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
2
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
3
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
4
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
5
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
6
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
7
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
8
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
9
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
10
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
11
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

कष्टाचं फळ मिळालं

By admin | Updated: June 26, 2023 11:44 IST

राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार मिळाल्यानंतर कष्टाचं फळ मिळाल्याचे समाधान वाटत आहे़ अशी भावना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार विजेते प्रकाश गरड यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली़

अहमदनगर : शिक्षण क्षेत्रात गेली ४५ वर्षे अविरत सेवा केली़ फक्त विद्यार्थी हेच ध्येय आणि तेच विश्व समोर ठेवून काम केले़ शालेय जीवन हाच विद्यार्थ्यांचा पाया असतो़ हा पाया भक्कम करण्यासाठी शिष्यवृत्ती परीक्षेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना घडविले़ आज राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार मिळाल्यानंतर कष्टाचं फळ मिळाल्याचे समाधान वाटत आहे़ अशी भावना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार विजेते प्रकाश गरड यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली़ पाथर्डी तालुक्यातील दुलेचांदगाव येथे अतिशय गरीब कुटुंबात माझा जन्म झाला़ वयाच्या पाचव्या वर्षी वडिलांचे छत्र हरपले़ मनात मात्र, शिक्षण घेवून मोठे व्हावे, अशी जिद्द लहानपणापासून होती़ अतिशय खडतर परिस्थितीत शिक्षण पूर्ण केले़ ईचरचबाई फिरोदिया विद्यालयात शिक्षकाची नोकरी मिळाली़ शिक्षक म्हणून काम करीत असताना प्रत्येक विद्यार्थ्यांत मी स्वत:ला पाहू लागलो़ प्रत्येक विद्यार्थी घडावा, त्याचा शैक्षणिक पाया पक्का व्हावा हेच ध्येय समोर ठेवले आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावयाला सुरुवात केली़ विद्यालयाचे अनेक विद्यार्थी राष्ट्रीय व राज्यस्तरावर प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले़ आज तेच विद्यार्थी विविध क्षेत्रात मोठमोठ्या हुद्यावर काम करत आहेत याचे मोठे समाधान आहे़ ४५ वर्षांच्या सेवेत १८ वर्षे मुख्याध्यापक म्हणून काम करण्याची संधी मिळाली़ आज राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्याहस्ते राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार मिळाला़ यामध्ये शिक्षण संस्था, सहकारी शिक्षक व गुरुजनांच्या शुभेच्छा व सहकार्य असल्याचे गरड म्हणाले़ राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार मिळालेल्या देशातील ३५१ शिक्षकांशी गुरुवारी रात्री नरेंद्र मोदी यांनी दिल्ली येथे त्यांच्या निवासस्थानी सुमारे एक तास दिलखुलास संवाद साधला़ शालेय जीवनातच मुलांचा पाया पक्का झाला तर भविष्यात तो विद्यार्थी नक्कीच प्रगती करतो़ असे सांगत मुलांना घडविण्यासाठी कोणत्या बाबी महत्त्वाच्या ठरणार आहेत, अशी विचारणा यावेळी पंतप्रधान मोदी यांनी प्रत्येक शिक्षकांना केली़ घरात आई जसे मुलांवर संस्कार करते तसे विद्यालयात शिक्षक मुलांवर संस्कार करत असतात़ विद्यार्थ्यांच्या जीवनात आईइतकेच शिक्षकांचेही महत्त्व असल्याचे यावेळी गरड म्हणाले़