शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित शर्मा नंबर १, विराट कोहली नंबर २ ... ताज्या ICC ODI क्रमवारीत टीम इंडियाचा धुमधडाका
2
"EVM नव्हे, पंतप्रधान मोदी...!"; कंगना रनौतचा काँग्रेसवर जोरदार निशाणा, स्पष्टच बोलल्या
3
“भारतात राहणाऱ्या विरोधी पक्षनेत्याची देशाला गरज”; राहुल गांधींचे परदेश दौरे अन् भाजपाची टीका
4
तिरुपती मंदिरात ‘शाल’ घोटाळा, १०० रुपयांचं पॉलिस्टर १४०० रुपयांचं रेशीम असल्याचं सांगून विकलं  
5
‘तुम्हाला स्वप्नात पाहिलंय, कॉल करा ना?’, महिला DSP चं मधाळ चॅट आणि करोडपती झाला कंगाल
6
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींना २१०० रुपये कधी मिळणार?; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची विधानसभेत मोठी घोषणा
7
गोवा क्लब अग्निकांड: थायलंडमधून प्रत्यार्पण टाळण्यासाठी लूथरा बंधूंची कोर्टात धाव; वकिलांचा अजब युक्तिवाद
8
बाजार सलग तिसऱ्या दिवशी कोसळला! फेड रिझर्व्हच्या धास्तीने १.०९ लाख कोटींचे नुकसान; काय आहे कारण?
9
ज्या देशाच्या कारमधून पुतिन यांनी केला प्रवास; आता त्यांच्याचविरोधात उतरवले लढाऊ जहाज, तणाव वाढला
10
रोहित शर्मा नवा 'सिक्सर किंग'! पाकिस्तानचा शाहिद आफ्रिदी म्हणतो, "जो विक्रम झालाय तो..."
11
'असा पती कुणालाच भेटू नाही', परागचे दुसऱ्या महिलेसोबत संबंध, व्हाट्सॲप स्टेट्‍स ठेवून सरिताने...   
12
‘चल धरणावर जाऊया’, तरुणाने तरुणीला व्हॉट्सॲपवर पाठवला मेसेज, त्यानंतर घडलं भयंकर
13
नरेंद्र मोदींचा उत्तराधिकारी कोण बनणार? सरसंघचालक मोहन भागवतांचं सूचक विधान, म्हणाले...    
14
मोबाईल रिचार्जपेक्षा कमी किमतीत गुगलने लॉन्च केला सर्वात स्वस्त 'AI Plus Plan'! ChatGPT चे मार्केट खाणार?
15
सोशल मीडियाचा नाद लय बेक्कार! मुलांवर घातक परिणाम, अतिरेकी वापर म्हणजे धोक्याची घंटा
16
मज्जा! 'या' गावातल्या बायकांना स्वयंपाकाचं टेंशनच नाही, वाचून म्हणाल 'मलाही तिथे राहायचंय!'
17
तुम्ही हे होऊच का दिले? इंडिगो संकटावर हायकोर्टाने सरकारला फटकारले; प्रवाशांना नुकसानभरपाई देण्याचे आदेश
18
जुने बँक खाते बंद करताय? थांबा! 'या' ५ चुका केल्यास तुमच्या खिशातून कापले जातील एक्स्ट्रा चार्ज
19
Nagpur Crime: अधिवेशन सुरू असताना नागपुरात रक्ताचा सडा, तरुणाची सपासप वार करत हत्या
20
“८ दिवसांत ई-वाहनांना टोलमाफीची अंमलबजावणी करा”; विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचे निर्देश
Daily Top 2Weekly Top 5

राहुरी तालुक्यातील शेतकऱ्यांकडे १२८ कोटींची थकबाकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:26 IST

महावितरणने थकबाकी वसूल व्हावी म्हणून रोहित्राचा वीजपुरवठा सरसकट बंद केला आहे. रोहित्रावरील सर्व शेतकऱ्यांनी वीज बिल भरणे बंधनकारक आहे. ...

महावितरणने थकबाकी वसूल व्हावी म्हणून रोहित्राचा वीजपुरवठा सरसकट बंद केला आहे. रोहित्रावरील सर्व शेतकऱ्यांनी वीज बिल भरणे बंधनकारक आहे. दोन ते तीन शेतकऱ्यांनी जरी वीज बिल भरले नाही तरी सर्व शेतकऱ्यांचा वीजपुरवठा बंद होत आहे. त्वरित वीज बिल वसुली व्हावी म्हणून महाराष्ट्र विद्युत महामंडळाने फास आवळला असून शेतकऱ्यांची धावपळ उडाली आहे.

शेतकऱ्यांना आठ तास वीजपुरवठा होत आहे. त्यातच रोहित्र बंद करण्याच्या मोहिमेमुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे. लॉकडाऊनमुळे शेतकऱ्यांच्या शेतीमालाचे भाव कोसळले आहेत. अनेक शेतकऱ्यांवर कर्ज झालेले आहे, अशा परिस्थितीत वीज पुरवठा खंडित करण्याच्या प्रकारामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. बिल भरण्यासाठी पैसे आणायचे कोठून? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.

आत्तापर्यंत ४ कोटी २५ लाख वीज बिल शेतकऱ्यांनी भरले आहेत. ज्यांच्याकडे पैसे आहेत त्या शेतकऱ्यांनी शासकीय कृषी पंप योजनेच्या फायदा घेत वीज बिल भरण्याचे सुरू केले आहे. शेतकऱ्यांना नोटिसा देऊनच वीजपुरवठा खंडित करावा अशी मागणी करण्यात आलेली आहे.

.........

थकीत वीज बिलापोटी शेतकरी विजेचा भरणा करीत आहेत. शेतकऱ्यांना घरपोच बिले देण्यात येणार आहेत. त्या दृष्टिकोनातून वीज बिल वसुलीसाठी नियोजन करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनी सहकार्य करावे.

- धीरज गायकवाड,

अभियंता, महावितरण

....

कांदा व गहू या पिकांचे शेवटचे दोन ते तीन पाणी बाकी आहेत. त्यातच जर वीजपुरवठा खंडित झाला तर हातातोंडाशी आलेला घास या सरकारने हिरावून घेण्याचे काम सुरू केले आहे. आम्हांला जर वेळच्यावेळी बिले दिली असती तर आम्ही ती भरली असती. एवढी मोठी रक्कम आणायची तरी कुठून?

- अजित पटारे, शेतकरी