शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

राहुरी तालुक्यातील शेतकऱ्यांकडे १२८ कोटींची थकबाकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:26 IST

महावितरणने थकबाकी वसूल व्हावी म्हणून रोहित्राचा वीजपुरवठा सरसकट बंद केला आहे. रोहित्रावरील सर्व शेतकऱ्यांनी वीज बिल भरणे बंधनकारक आहे. ...

महावितरणने थकबाकी वसूल व्हावी म्हणून रोहित्राचा वीजपुरवठा सरसकट बंद केला आहे. रोहित्रावरील सर्व शेतकऱ्यांनी वीज बिल भरणे बंधनकारक आहे. दोन ते तीन शेतकऱ्यांनी जरी वीज बिल भरले नाही तरी सर्व शेतकऱ्यांचा वीजपुरवठा बंद होत आहे. त्वरित वीज बिल वसुली व्हावी म्हणून महाराष्ट्र विद्युत महामंडळाने फास आवळला असून शेतकऱ्यांची धावपळ उडाली आहे.

शेतकऱ्यांना आठ तास वीजपुरवठा होत आहे. त्यातच रोहित्र बंद करण्याच्या मोहिमेमुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे. लॉकडाऊनमुळे शेतकऱ्यांच्या शेतीमालाचे भाव कोसळले आहेत. अनेक शेतकऱ्यांवर कर्ज झालेले आहे, अशा परिस्थितीत वीज पुरवठा खंडित करण्याच्या प्रकारामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. बिल भरण्यासाठी पैसे आणायचे कोठून? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.

आत्तापर्यंत ४ कोटी २५ लाख वीज बिल शेतकऱ्यांनी भरले आहेत. ज्यांच्याकडे पैसे आहेत त्या शेतकऱ्यांनी शासकीय कृषी पंप योजनेच्या फायदा घेत वीज बिल भरण्याचे सुरू केले आहे. शेतकऱ्यांना नोटिसा देऊनच वीजपुरवठा खंडित करावा अशी मागणी करण्यात आलेली आहे.

.........

थकीत वीज बिलापोटी शेतकरी विजेचा भरणा करीत आहेत. शेतकऱ्यांना घरपोच बिले देण्यात येणार आहेत. त्या दृष्टिकोनातून वीज बिल वसुलीसाठी नियोजन करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनी सहकार्य करावे.

- धीरज गायकवाड,

अभियंता, महावितरण

....

कांदा व गहू या पिकांचे शेवटचे दोन ते तीन पाणी बाकी आहेत. त्यातच जर वीजपुरवठा खंडित झाला तर हातातोंडाशी आलेला घास या सरकारने हिरावून घेण्याचे काम सुरू केले आहे. आम्हांला जर वेळच्यावेळी बिले दिली असती तर आम्ही ती भरली असती. एवढी मोठी रक्कम आणायची तरी कुठून?

- अजित पटारे, शेतकरी