शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
3
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
4
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
5
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
6
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
7
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
8
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
9
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
10
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
11
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
12
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
13
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
14
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
15
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
16
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
17
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
18
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
19
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
20
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर

चाळीस लाखांच्या दंडाबाबत नगर अर्बन बँकेच्या अधिकाºयांचीही काही जबाबदारी आहे की नाही? -रफिक मुन्शी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2020 12:17 IST

अहमदनगर- कोणतेही ठराव बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत होत असतात. त्या ठरावाची अंमलबजावणी करण्याचे काम अधिकाºयांचे, प्रशासनाचे असते. आरबीआयच्या नियमांचे उल्लंघन होते की नाही, हे पाहणे प्रशासन, अधिकारी, बँकेचे व्यवस्थापक यांचेही काम आहे. त्यामुळे बँकेचे अध्यक्ष, संचालकांप्रमाणेच त्यांचीही काही जबाबदारी आहे की नाही, असा सवाल बँकेचे सभासद व माजी जिल्हा समाज कल्याण अधिकारी रफिक मुन्शी यांनी आपली भूमिका मांडली.

अहमदनगर- कोणतेही ठराव बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत होत असतात. त्या ठरावाची अंमलबजावणी करण्याचे काम अधिकाºयांचे, प्रशासनाचे असते. आरबीआयच्या नियमांचे उल्लंघन होते की नाही, हे पाहणे प्रशासन, अधिकारी, बँकेचे व्यवस्थापक यांचेही काम आहे. त्यामुळे बँकेचे अध्यक्ष, संचालकांप्रमाणेच त्यांचीही काही जबाबदारी आहे की नाही, असा सवाल बँकेचे सभासद व माजी जिल्हा समाज कल्याण अधिकारी रफिक मुन्शी यांनी आपली भूमिका मांडली.नगर अर्बन बँकेच्या अनियमित कारभाराबाबत रिझर्व्ह बँक आॅफ इंडियाने नगर अर्बन बँकेला ४० लाख रुपयांचा दंड ठोठावला. याबाबतचे वृत्त लोकमतमध्ये प्रसिद्ध झाले. मात्र यामध्ये बँकेचे प्रशासक, माजी अध्यक्षांची भूमिका स्पष्ट केली नाही. त्यामुळे बँकेचे सभासद संभ्रमात आहेत. त्यामुळे एक सभासद या नात्याने माझी ही भूमिका मांडत असल्याचे मुन्शी म्हणाले.ते म्हणाले, मीही एक अधिकारी आहे. जिल्हा परिषदेचे समाजकल्याण सभापती आणि मी एक अधिकारी असे अनेकवेळा निर्णय घेण्याचे प्रसंग आले. सभापतींनी काहीही ठराव केले तरी ते नियमात बसतात की नाही, हे आम्ही आधी पाहत होतो. सभापती किंवा समितीने ठराव केले तरी ते चुकीचे आहेत की बरोबर याची पडताळणी करणे ही अधिकाºयांचीच जबाबदारी असते. त्याचप्रमाणे बँकेतही आहे.बँकेचे अध्यक्ष व संचालक मंडळाने जे काही ठराव केले, निर्णय घेतले, ते नियमात आहेत का हे पाहण्याची जबाबदारी अधिकारी, व्यवस्थापकांवर आहे. त्यावेळी तत्कालीन अधिकाºयांनी अध्यक्ष, संचालकांना या चुकीच्या निर्णयाबाबत सांगणे, विरोध करणे आवश्यक होते. मात्र तसे झाल्याचे दिसत नाही. आरबीआयच्या नियमांचे पालन करणे ही जबाबदारी प्रशासनाची देखील आहे. ४० लाख दंडाबाबत माजी अध्यक्ष, संचालक आणि प्रशासनाने आपली भूमिका मांडली नसल्याचे सभासद वर्ग संभ्रमात आहे. त्यामुळे माजी अध्यक्ष दिलीप गांधी यांनीही माध्यमांसमोर येऊन आपले म्हणणे मांडले पाहिजे. तसेच सध्याचे प्रशासक सुभाषचंद्र मिश्रा यांनीही ४० लाख दंडाबाबत भूमिका मांडली तर सभासदांमधील संभ्रम संपुष्टात येईल.