शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
2
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
3
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
4
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
5
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
6
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
7
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
8
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
9
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
10
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
11
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
12
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
13
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
14
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
15
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
16
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
17
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू
18
अहमदाबाद प्लेन क्रॅशसंदर्भात बाबा रामदेव यांना वेगळाच संशय, स्पष्टच बोलले! केली मोठी मागणी
19
Maharashtra Rain Alert: कोकणाला रेड अलर्ट! मुंबई-ठाण्यासह 'या' जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा
20
Tarot Card: कष्ट करावे लागतील, तडकाफडकी कोणतेही निर्णय घेऊ नका; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!

जलजीवन, बांधकाममध्ये गंभीर त्रुटी? जिल्हा परिषदेचे तीन वर्षांचे लेखा परीक्षण सुरू

By चंद्रकांत शेळके | Updated: December 5, 2023 18:59 IST

विभागीय आयुक्त कार्यालयाकडून कारवाई

चंद्रकांत शेळके, अहमदनगर: जिल्हा परिषदेच्या गेल्या तीन वर्षांतील जमा-खर्चाचे लेखापरीक्षण विभागीय आयुक्त कार्यालयाकडून सुरू असून यात जलजीवन मिशनची कामे, तसेच बांधकाम विभागातील काही बाबींवर गंभीर स्वरूपाच्या त्रुटी आढळल्याची माहिती समजते. त्यामुळे हा अहवाल विभागीय आयुक्तांकडे गेल्यानंतर यावर काय कार्यवाही होते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

दरवर्षी जिल्हा परिषदेला शासनाकडून कोट्यवधी रूपयांचा निधी प्राप्त होत असतो. याशिवाय जिल्हा परिषदेकडे स्वत:च्या सेसचा निधीही उपलब्ध असतो. यातून कोट्यवधींच्या योजना राबवल्या जातात. परंतु या योजना राबवताना अनेकदा नियमांची पायमल्ली होते. शासकीय निकष धाब्यावर ठेवले जातात. त्यामुळेच या जमा-खर्चाचा आर्थिक ताळेबंद तपासण्यासाठी दरवर्षी नाशिक विभागीय कार्यालयाचे पथक संबंधित जिल्हा परिषदेत भेट देऊन विभागनिहाय लेखा परीक्षण (ॲाडिट) करत असते. पंचायत समितीचे पाच वर्षांतून एकदा, तसेच जिल्हा परिषदेचे दरवर्षी हे लेखा परीक्षण होते. परंतु कोरोनासह काही कारणास्तव गेल्या तीन वर्षांपासून अहमदनगर जिल्हा परिषदेचे हे लेखा परीक्षण झालेले नव्हते.

दरम्यान, गेल्या २० नोव्हेंबरपासून विभागीय आयुक्त कार्यालयाकडून सहायक आयुक्त (तपासणी) राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हे पथक जिल्हा परिषदेचे लेखा परीक्षण करत आहे. १८ डिसेंबरपर्यंत ही तपासणी होणार आहे. दरम्यान, आतापर्यंत बऱ्याचशा विभागांचे लेखा परीक्षण झाले असून काही विभाग बाकी आहेत. यात जिल्हा ग्रामीण पाणीपुरवठा विभागांतर्गत राबविण्यात येणाऱ्या योजना व त्यातही जलजीवन मिशन योजनेत गंभीर त्रुटी आढळल्याची माहिती आहे. जलजीवनमधून जिल्ह्यात ८३० पाणी योजनांची कामे सुरू असून त्यासाठी १३३८ कोटींची निधी खर्च होत आहे. परंतु यात निविदा प्रक्रियेपासून ते प्रत्यक्ष काम पूर्ण होईपर्यंत शेकडो तक्रारी जिल्हा परिषदेकडे प्राप्त झालेल्या आहेत. प्रत्यक्ष लोकप्रतिनिधींसह संबंधित गावच्या लोकांनीही या कामांच्या दर्जाबाबत तक्रारी केल्या आहेत. जलजीवननंतर बांधकाम विभागातही कामे करताना अनेक निकष डावलले गेले. त्याच बाबी आता लेखा परीक्षणातही अधोरेखित होत असल्याची माहिती आहे.

नसलेले अधिकार वापरले

काही अधिकाऱ्यांनी योजना राबवताना नसलेले अधिकार चुकीच्या पद्धतीने वापरले आहेत. तसेच प्रशासकीय मंजुरी, निविदा प्रक्रिया, कार्यारंभ आदेश या प्रक्रियेतही त्रुटी आढळत आहेत. त्यामुळे प्रत्यक्ष या लेखा परीक्षणाचा अहवाल आल्यानंतरच कोणावर याची जबाबदारी निश्चित होते किंवा अधिकारी-कर्मचारी यापैकी कोण दोषी आढळले, याचा उलगडा होणार आहे.

आयुक्तांना अहवाल सादर करणार

अधिकारी-कर्मचारी मिळून ९ जणांचे हे पथक जिल्हा परिषदेत लेखा परीक्षण करत आहे. विभागनिहाय सर्व लेखा परीक्षण झाल्यानंतर साधारण २० डिसेंबरपर्यंत त्याचा एकत्रित अहवाल विभागीय आयुक्तांना सादर केला जाणार आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर