शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

जलजीवन, बांधकाममध्ये गंभीर त्रुटी? जिल्हा परिषदेचे तीन वर्षांचे लेखा परीक्षण सुरू

By चंद्रकांत शेळके | Updated: December 5, 2023 18:59 IST

विभागीय आयुक्त कार्यालयाकडून कारवाई

चंद्रकांत शेळके, अहमदनगर: जिल्हा परिषदेच्या गेल्या तीन वर्षांतील जमा-खर्चाचे लेखापरीक्षण विभागीय आयुक्त कार्यालयाकडून सुरू असून यात जलजीवन मिशनची कामे, तसेच बांधकाम विभागातील काही बाबींवर गंभीर स्वरूपाच्या त्रुटी आढळल्याची माहिती समजते. त्यामुळे हा अहवाल विभागीय आयुक्तांकडे गेल्यानंतर यावर काय कार्यवाही होते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

दरवर्षी जिल्हा परिषदेला शासनाकडून कोट्यवधी रूपयांचा निधी प्राप्त होत असतो. याशिवाय जिल्हा परिषदेकडे स्वत:च्या सेसचा निधीही उपलब्ध असतो. यातून कोट्यवधींच्या योजना राबवल्या जातात. परंतु या योजना राबवताना अनेकदा नियमांची पायमल्ली होते. शासकीय निकष धाब्यावर ठेवले जातात. त्यामुळेच या जमा-खर्चाचा आर्थिक ताळेबंद तपासण्यासाठी दरवर्षी नाशिक विभागीय कार्यालयाचे पथक संबंधित जिल्हा परिषदेत भेट देऊन विभागनिहाय लेखा परीक्षण (ॲाडिट) करत असते. पंचायत समितीचे पाच वर्षांतून एकदा, तसेच जिल्हा परिषदेचे दरवर्षी हे लेखा परीक्षण होते. परंतु कोरोनासह काही कारणास्तव गेल्या तीन वर्षांपासून अहमदनगर जिल्हा परिषदेचे हे लेखा परीक्षण झालेले नव्हते.

दरम्यान, गेल्या २० नोव्हेंबरपासून विभागीय आयुक्त कार्यालयाकडून सहायक आयुक्त (तपासणी) राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हे पथक जिल्हा परिषदेचे लेखा परीक्षण करत आहे. १८ डिसेंबरपर्यंत ही तपासणी होणार आहे. दरम्यान, आतापर्यंत बऱ्याचशा विभागांचे लेखा परीक्षण झाले असून काही विभाग बाकी आहेत. यात जिल्हा ग्रामीण पाणीपुरवठा विभागांतर्गत राबविण्यात येणाऱ्या योजना व त्यातही जलजीवन मिशन योजनेत गंभीर त्रुटी आढळल्याची माहिती आहे. जलजीवनमधून जिल्ह्यात ८३० पाणी योजनांची कामे सुरू असून त्यासाठी १३३८ कोटींची निधी खर्च होत आहे. परंतु यात निविदा प्रक्रियेपासून ते प्रत्यक्ष काम पूर्ण होईपर्यंत शेकडो तक्रारी जिल्हा परिषदेकडे प्राप्त झालेल्या आहेत. प्रत्यक्ष लोकप्रतिनिधींसह संबंधित गावच्या लोकांनीही या कामांच्या दर्जाबाबत तक्रारी केल्या आहेत. जलजीवननंतर बांधकाम विभागातही कामे करताना अनेक निकष डावलले गेले. त्याच बाबी आता लेखा परीक्षणातही अधोरेखित होत असल्याची माहिती आहे.

नसलेले अधिकार वापरले

काही अधिकाऱ्यांनी योजना राबवताना नसलेले अधिकार चुकीच्या पद्धतीने वापरले आहेत. तसेच प्रशासकीय मंजुरी, निविदा प्रक्रिया, कार्यारंभ आदेश या प्रक्रियेतही त्रुटी आढळत आहेत. त्यामुळे प्रत्यक्ष या लेखा परीक्षणाचा अहवाल आल्यानंतरच कोणावर याची जबाबदारी निश्चित होते किंवा अधिकारी-कर्मचारी यापैकी कोण दोषी आढळले, याचा उलगडा होणार आहे.

आयुक्तांना अहवाल सादर करणार

अधिकारी-कर्मचारी मिळून ९ जणांचे हे पथक जिल्हा परिषदेत लेखा परीक्षण करत आहे. विभागनिहाय सर्व लेखा परीक्षण झाल्यानंतर साधारण २० डिसेंबरपर्यंत त्याचा एकत्रित अहवाल विभागीय आयुक्तांना सादर केला जाणार आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर