शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
"जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

पाच दिवसांत टँकर मंजूर करा, टंचाई आढावा बैठकीत पालकमंत्र्यांच्या सूचना

By चंद्रकांत शेळके | Updated: August 28, 2023 20:09 IST

प्रारंभी जिल्हाधिकारी सालिमठ यांनी जिल्ह्यातील पावसाची स्थिती, धरणसाठे, तसेच टँकरची स्थिती याची माहिती पालकमंत्र्यांना दिली.

अहमदनगर: यंदा पावसाचे प्रमाण कमी असल्याने, पुढील टंचाई गृहित धरून अधिकाऱ्यांनी तातडीने उपाययोजना कराव्यात. ज्या गावांतून टँकरचे प्रस्ताव येतील, तेथे प्राधान्याने पाहणी करून पाच दिवसांत टँकर मंजूर करावेत, याशिवाय पीकविमा भरपाई, कांदा अनुदानासाठी शासनाकडे पाठपुरावा करावा, अशा सूचना पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अधिकाऱ्यांना केल्या. सोमवारी (दि. २८) दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या जिल्हा टंचाई आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार राम शिंदे, आमदार बबनराव पाचपुते, आमदार लहू कानडे, आमदार डॉ. किरण लहामटे, आमदार आशुतोष काळे, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालिमठ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, मनपा आयुक्त पंकज जावळे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले, माजी आमदार राहुल जगताप आदी उपस्थित होते.

प्रारंभी जिल्हाधिकारी सालिमठ यांनी जिल्ह्यातील पावसाची स्थिती, धरणसाठे, तसेच टँकरची स्थिती याची माहिती पालकमंत्र्यांना दिली. जिल्ह्यातील ९ मंडलांत ० ते २५ टक्के, ५७ मंडलांत २५ ते ५० टक्के, तसेच २६ मंडलांत ५० ते ७५ टक्के पाऊस झाला आहे, असे जिल्हाधिकारी म्हणाले. यावर आ.कानडे यांनी आक्षेप घेत, अधिकाऱ्यांनी केवळ तांत्रिक माहितीच्या आधारे पावसाची नोंद न घेता, प्रत्यक्ष गावात जाऊन माहिती घ्यावी, तसेच जेथे पर्जन्यमापक यंत्रे नाहीत, तेथे ते तातडीने बसवावीत, असे सांगितले. उत्तरेतील धरणांत समाधानकारक पाणीसाठा आहे. मात्र, दक्षिण भागातील धरण साठ्यांची स्थिती चिंताजनक आहे. दक्षिणेतील मांडओहोळ ७ टक्के, घाटशिळ ७ टक्के, सीना २६ टक्के, खैरी १६ टक्के, विसापूर धरणात ५ टक्के एवढाच साठा आहे. त्यामुळे पुढे पाऊस झाला नाही, तर या भागातील रब्बी हंगामही धोक्यात येणार असल्याची चिंता आमदारांनी व्यक्त केली. त्यावर राम शिंदे यांनी कुकडीचे आवर्तन सोडण्याची मागणी केली.

जिल्ह्यात सध्या ६० टँकरद्वारे ६६ गावे व ३८९ वाड्यांना पाणीपुरवठा होत असल्याची माहिती प्रशासनाने दिली. त्यावर कर्जत-जामखेड तालुक्यांत मागणी करूनही टँकर मंजुरीसाठी उशीर होत असल्याचा आक्षेप आ.शिंदे यांनी घेतला. याचाच धागा पकडत कर्डिले यांनी टँकर मंजुरीचे अधिकारी बीडीओंना द्या. म्हणजे वेळ जाणार नाही, असे सुचविले. त्यावर पालकमंत्री विखे यांनी सूचना देत, ग्रामपंचायत व तालुका पातळीवरील अधिकाऱ्यांनी समन्वय ठेवून मागणी येईल, तेथे केवळ पाच दिवसांत टँकर मंजूर करा, असे आदेश दिले.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRadhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटील