शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

पाच दिवसांत टँकर मंजूर करा, टंचाई आढावा बैठकीत पालकमंत्र्यांच्या सूचना

By चंद्रकांत शेळके | Updated: August 28, 2023 20:09 IST

प्रारंभी जिल्हाधिकारी सालिमठ यांनी जिल्ह्यातील पावसाची स्थिती, धरणसाठे, तसेच टँकरची स्थिती याची माहिती पालकमंत्र्यांना दिली.

अहमदनगर: यंदा पावसाचे प्रमाण कमी असल्याने, पुढील टंचाई गृहित धरून अधिकाऱ्यांनी तातडीने उपाययोजना कराव्यात. ज्या गावांतून टँकरचे प्रस्ताव येतील, तेथे प्राधान्याने पाहणी करून पाच दिवसांत टँकर मंजूर करावेत, याशिवाय पीकविमा भरपाई, कांदा अनुदानासाठी शासनाकडे पाठपुरावा करावा, अशा सूचना पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अधिकाऱ्यांना केल्या. सोमवारी (दि. २८) दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या जिल्हा टंचाई आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार राम शिंदे, आमदार बबनराव पाचपुते, आमदार लहू कानडे, आमदार डॉ. किरण लहामटे, आमदार आशुतोष काळे, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालिमठ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, मनपा आयुक्त पंकज जावळे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले, माजी आमदार राहुल जगताप आदी उपस्थित होते.

प्रारंभी जिल्हाधिकारी सालिमठ यांनी जिल्ह्यातील पावसाची स्थिती, धरणसाठे, तसेच टँकरची स्थिती याची माहिती पालकमंत्र्यांना दिली. जिल्ह्यातील ९ मंडलांत ० ते २५ टक्के, ५७ मंडलांत २५ ते ५० टक्के, तसेच २६ मंडलांत ५० ते ७५ टक्के पाऊस झाला आहे, असे जिल्हाधिकारी म्हणाले. यावर आ.कानडे यांनी आक्षेप घेत, अधिकाऱ्यांनी केवळ तांत्रिक माहितीच्या आधारे पावसाची नोंद न घेता, प्रत्यक्ष गावात जाऊन माहिती घ्यावी, तसेच जेथे पर्जन्यमापक यंत्रे नाहीत, तेथे ते तातडीने बसवावीत, असे सांगितले. उत्तरेतील धरणांत समाधानकारक पाणीसाठा आहे. मात्र, दक्षिण भागातील धरण साठ्यांची स्थिती चिंताजनक आहे. दक्षिणेतील मांडओहोळ ७ टक्के, घाटशिळ ७ टक्के, सीना २६ टक्के, खैरी १६ टक्के, विसापूर धरणात ५ टक्के एवढाच साठा आहे. त्यामुळे पुढे पाऊस झाला नाही, तर या भागातील रब्बी हंगामही धोक्यात येणार असल्याची चिंता आमदारांनी व्यक्त केली. त्यावर राम शिंदे यांनी कुकडीचे आवर्तन सोडण्याची मागणी केली.

जिल्ह्यात सध्या ६० टँकरद्वारे ६६ गावे व ३८९ वाड्यांना पाणीपुरवठा होत असल्याची माहिती प्रशासनाने दिली. त्यावर कर्जत-जामखेड तालुक्यांत मागणी करूनही टँकर मंजुरीसाठी उशीर होत असल्याचा आक्षेप आ.शिंदे यांनी घेतला. याचाच धागा पकडत कर्डिले यांनी टँकर मंजुरीचे अधिकारी बीडीओंना द्या. म्हणजे वेळ जाणार नाही, असे सुचविले. त्यावर पालकमंत्री विखे यांनी सूचना देत, ग्रामपंचायत व तालुका पातळीवरील अधिकाऱ्यांनी समन्वय ठेवून मागणी येईल, तेथे केवळ पाच दिवसांत टँकर मंजूर करा, असे आदेश दिले.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRadhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटील