शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
2
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
3
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
4
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
5
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
6
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
7
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
8
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
9
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
10
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
11
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
12
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
13
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
14
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
15
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
16
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
17
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
18
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
19
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
20
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!

पोलिसांकडून कारवाईत दुजाभाव

By admin | Updated: May 20, 2016 23:56 IST

अहमदनगर : वाहतूक पोलिसांच्या मनमानीने कळस गाठला असून, वर्गणी न देणाऱ्यांची धरपकड जोरात सुरू आहे़ त्यासाठी पोलिसांनी वाहतुकीचे नियमही धाब्यावर बसविले आहेत़

अहमदनगर : वाहतूक पोलिसांच्या मनमानीने कळस गाठला असून, वर्गणी न देणाऱ्यांची धरपकड जोरात सुरू आहे़ त्यासाठी पोलिसांनी वाहतुकीचे नियमही धाब्यावर बसविले आहेत़ काही रिक्षाचालकांवर टार्गेट करून त्यांच्यावर वारंवार कारवाई करण्यात येत असल्याचे निदर्शनास आले आहे़ पोलिसांच्या या मनमानीकडे वरिष्ठांनीही डोळेझाक केली आहे, हे विशेष! शहरात चार हजारांहून अधिक विनापरवाना पॅगो रिक्षा आहेत़ रितसर परवाना देण्याची त्यांची मागणी आहे, मात्र ती मिळत नाही़ परवाना मिळत नाही म्हणून रिक्षा उभी करून चालत नाही़ रिक्षा उभी ठेवली तर खायचे काय, असा प्रश्न रिक्षाचालकांसमोर आहे़ संसाराचा गाडा चालविण्यासाठी काहीजण प्रवाशी वाहतूक करतातही़ पण, दिवसभराची कमाई पोलिसांच्या हवाली करावी लागते, असा त्यांचा अनुभव आहे़ पोलिसांचे हे धोरण काही सगळ्यांसाठीच आहे, असेही नाही तर ठराविक रिक्षा चालकांसाठीच हे नियम आहेत़ इतरांना मात्र रान मोकळे आहे़ पोलीस ठाण्यातून कारवाईसाठी बाहेर पडण्याआधीच कारवाई करण्याचे नियोजन होते़ कुणावर कारवाई करायची आणि कुणाला सूट द्यायची, हे आधीच ठरलेले असते़ कारवाईच्या इराद्याने चारचाकी वाहनातून आलेले हे त्रिकूट दंडाच्या नावाखाली सर्रास वसुली करत असल्याची तक्रार आहे़ वाहन सोडविण्यासाठी चालक गेल्यास त्यांना साहेब नाहीत, नंतर या, पावती करतो, असे सांगून रिक्षा सोडविण्यास टाळाटाळ करतात़ काहीवेळा तर हजार रुपये घेऊन शंभराचीच पावती हातावर टेकविली जाते, असे रिक्षा चालकांचे म्हणणे आहे़ परवानाधारक पॅगोरिक्षा चालकांना तीन प्रवाशी वाहतूक करण्याची मुभा आहे़ मात्र, पोलिसांची बडदास्त ठेवणाऱ्यांना सर्वकाही माफ असते़ त्यांच्या रिक्षांवर कारवाई तर दूरच, पण अशा रिक्षांना पोलीस हातही करत नाहीत़ त्यांच्याकडे पाहून न पाहिल्यासारखे करतात़ असे रिक्षा चालक जोरात निघून जातात़ त्यांच्यावर कारवाई होत नाही़ इतरांना मात्र पोलिसांच्या खाकीचे दर्शन होते़ त्यामुळे सर्वसामान्य रिक्षाचालक वैतागले आहेत़ (प्रतिनिधी)