शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
5
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
6
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
7
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
8
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
9
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
10
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
11
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
12
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
13
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
14
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
15
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
16
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
17
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
18
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
19
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
20
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..

दिल्लीत जागा मिळाल्यास शेवटचं आंदोलन करणार, अण्णा हजारेंचं आश्वासन

By महेश गलांडे | Updated: December 21, 2020 08:23 IST

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर दिल्लीत रामलीला किंवा जंतरमंतर येथे जागा मिळाल्यास आपण शेवटचे आंदोलन करणार आहोत, असे आश्वासन अण्णांन दिलंय. अण्णांच्या मूळगावी राळेगणसिद्धी येथे जाऊन आंदोलक शेतकरी पुत्रांनी अण्णांची भेट घेतली.

ठळक मुद्देशेतकऱ्यांच्या प्रश्नावर दिल्लीत रामलीला किंवा जंतरमंतर येथे जागा मिळाल्यास आपण शेवटचे आंदोलन करणार आहोत, असे आश्वासन अण्णांन दिलंय. अण्णांच्या मूळगावी राळेगणसिद्धी येथे जाऊन आंदोलक शेतकरी पुत्रांनी अण्णांची भेट घेतली

अहमदनगर - दिल्लीतीलशेतकरी आंदोलन आणि भारत बंदला पाठिंबा व्यक्त करण्यासाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी राळेगणसिद्धी येथील पद्मावती मंदिरात महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर एक दिवसीय उपोषण केले होते. दिल्लीमधील शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनास अण्णांनी पूर्वीच पाठिंबा दिला आहे. आता, दिल्लीतील शेतकरी आंदोलकांच्या मुलांनी अण्णा हजारेंची भेट घेतली. त्यानंतर, दिल्लीत शेवटचं आंदोलन करणार असल्याचं अण्णांनी म्हटलंय. मात्र, त्यासाठी, जागा मिळायला हवी, असेही अण्णा म्हणाले. 

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर दिल्लीत रामलीला किंवा जंतरमंतर येथे जागा मिळाल्यास आपण शेवटचे आंदोलन करणार आहोत, असे आश्वासन अण्णांन दिलंय. अण्णांच्या मूळगावी राळेगणसिद्धी येथे जाऊन आंदोलक शेतकरी पुत्रांनी अण्णांची भेट घेतली. त्यावेळी, दिल्लीत जागा मिळाली, तर शेवटचे आंदोलन करणार असल्याचं अण्णांनी म्हटलं. तसेच, मोदी सरकारने लेखी दिलेलं आश्वासन पाळलं नाही, असेही अण्णांनी सांगितले. दरम्यान, दिल्लीतील शेतकरी आंदोलनाच आज 25 वा दिवस असून 27 डिसेंबर रोजी मन की बात कार्यक्रमाच्या दिवशीच थाळीनाद आंदोलन करण्याचा इशारा शेतकरी नेत्यांनी दिलाय. 

मोदींनी आश्वासन पाळले नाही

स्वामिनाथन आयोगाच्या अहवालानुसार पिकांना उत्पादन खर्चापेक्षा ५० टक्के जादा भाव द्यायला पाहिजे. ही मागणी मोदी सरकारने गेल्या वेळेस मान्य केली. २३ मार्च २०१८ ला लिखित आश्वासन दिले, पण त्यावर अंमलबजावणी करण्यात आली नाही. मी सतत पत्रव्यवहार करत राहिलो; पण आश्वासन पाळण्यात आले नाही. त्यानंतर मी ७ दिवस उपोषण केले. कृषिमंत्र्यांनी तेव्हाही लिखित आश्वासन दिले की, कृषिमूल्य आयोगाला स्वायत्तता देण्याविषयी समिती बनवण्यात येईल. ३० ऑक्टोबर २०१९ ला समितीचा अहवाल येईल. त्यानंतर कार्यवाही करू. पंतप्रधान आणि दोन कृषिमंत्र्यांनी लिखित आश्वासन दिल्यानंतरही स्वामीनाथन्‌ आयोगानुसार शेतमालाला भाव आणि कृषिमूल्य आयोगाला स्वायत्तता मिळाली नाही, असेही अण्णांनी यापूर्वीच म्हटले होते. 

कृषीमंत्र्यांना अण्णांचा सवाल

शेतकरी आंदोलनातच हिंसा नाही. अहिंसेच्या मार्गानं आंदोलन सुरू आहे. सरकारने पाच वेळेस बैठका घेऊनही मागण्या मान्य करण्यात आल्या नाहीत. मला लिखित आश्वासनं देऊनही मागण्या मान्य केल्या नाहीत. आता कृषिमंत्री आश्वासने पूर्ण करणार का? असा सवालही अण्णा हजारे यांनी यावेळी केला.

टॅग्स :Farmerशेतकरीdelhiदिल्लीanna hazareअण्णा हजारेFarmer strikeशेतकरी संप