शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
3
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
4
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
5
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
6
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
7
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
8
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
9
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
10
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
11
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
12
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
13
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
14
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
15
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
16
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
17
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
18
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
19
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
20
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर

अनिल राठोड म्हणाले होते,  ‘माझा मीच गॉड फादर’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2020 12:40 IST

माजीमंत्री, माजी आमदार, शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड यांची लोकमत वर्धापन दिन विशेषांकात मुलाखत प्रसिद्ध केली होती. मी कसा घडलो, हे त्यांनी त्यांच्याच शब्दात सांगितले होते. 

सुदाम देशमुख /अहमदनगर

-------------------घरात हलाखीची परिस्थिती असल्याने बी. कॉम. चे शिक्षण पूर्ण केल्याबरोबर नोकरीसाठी मुंबईला गेलो. सेंच्युरी बाजारमध्ये लेखापालची (अकौंटंट) नोकरी लागली. मात्र तिथे फारसे मन रमले नाही. पुण्यात स्वारगेट येथील एका खासगी कंपनीत नोकरी सुरू केली. महिन्याला मिळणारा पगार घराकडे पाठवायचो. जेमतेम पैसे मिळत असले तरी नोकरीत काही मन रमले नाही. हिंदुत्वाविषयी माझ्या मनाला प्रचंड ओढ होती. बाहेरगावी नोकरी करून आई-वडिलांकडे लक्ष देणे शक्य नव्हते. म्हणून पुन्हा नगरला आलो. पण घरात बसणे शक्य नव्हते. उदरनिर्वाहासाठी काहीतरी काम  केले पाहिजे, यावर विचार मंथन सुरू होते. दिलीप शिदेंची गाडी होती. त्यांच्या गाडीसोबत चितळे रोडवर माझीही गाडी लावली. वडा-पाव, पावभाजी, ज्युसची गाडी सुरू केली आणि सुरू झाला रोजच्या जीवनाशी संघर्ष!

वडापाव विकताना माझ्यातील हिंदुत्त्वाचे रक्त काही मला स्वस्थ बसू देत नव्हते. हे रक्त जन्मजात भिनलेले. हिंदू धर्मासाठी काम करणारी त्यावेळी हिंदु एकता समिती होती. या समितीचे काम मला मनापासून आवडायचे.  याच कामामुळे माझी शहरभर एक कार्यकर्ता म्हणून ओळख झाली. मला कोणी गॉडफॉदर भेटला नाही. हम खुद फादर है. हृदयात ठासून भरलेले हिंदुत्त्व हेच माझ्यासाठी खरे गॉडफादर ठरले. 

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमख बाळासाहेब ठाकरे यांचा झंजावात त्यावेळी सुरू होता. मीही शिवसेनेत काम सुरू केले. शिवसेना शहर प्रमुख, जिल्हा प्रमुख अशा जबाबदाºया यशस्वीपणे सांभाळल्या. त्याकाळात शिवसेनेच्या शाखा विस्ताराच्या कामाने झपाटलो होतो. छत्रपती शिवाजी महाराज आणि आई तुळजाभवानी हेच माझे दैवत. त्यांच्या नावांनी दिलेल्या घोषणा लोकांना आवडत होत्या. कार्यकर्ते कधीच मी गोळा केले नाहीत. मला ते गोळा करून आणावे लागले नाहीत. प्रत्येक काम करताना नवीन कार्यकर्ते मला मिळत गेले.  जनतेला संपूर्ण संरक्षण हेच माझे ब्रीद आहे. शिवसेनेची पहिली शाखा उघडण्यासाठी भांडणे, मारामाºया झाल्या. शाखा उघडण्यास मातब्बरांकडून दबाव आला. धमक्या आल्या. मात्र त्याला न जुमानता काम सुरू केले. प्रत्येक शाखा उघडायची म्हटली की दहशतीशी सामना करावा लागला. मात्र हा संघर्ष नित्याचाच झाला. ‘दैनंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग’ हे संत तुकाराम महाराजांचे वचन आम्ही प्रत्यक्षात जगत होतो. नगर शहरावर तेव्हापासून दहशत आहे. घोषणा देण्यासही बंदी असायची. पण कोणापुढेच मी डगमगलो नाही. कारण कामाशी मी प्रामाणिक होतो. माझ्यात कुठेही खोट नव्हती. सामान्य माणसासाठी काम करणे हाच माझा ध्यास राहिला आहे.

१९९० मध्ये विधानसभा निवडणूक जाहीर झाली. नगरमधून शिवसेनेला उमेदवार हवा होता. त्यासाठी शहरामध्ये अनेक कार्यकर्ते होते. प्रत्येकाला तिकिटासाठी विचारणा झाली. मात्र विधानसभेचे तिकीट घ्यायला कोणीच तयार नव्हते. निवडणूक लढविणे सोपे काम नाही, असे प्रत्येकजण म्हणत होता. त्यावेळी तिकीट घेण्याचा मला आग्रह झाला आणि मी निवडणूक लढवायचे ठरविले. माझ्याविरोधात नगर शहरातील सर्व दिग्गज निवडणुकीला उभे राहिले. पहिलीच निवडणूक आव्हानात्मक होती. लोकांचा माझ्यावरील विश्वास, लोकांमध्ये मिसळून काम करण्याची पद्धत, संरक्षणासाठी पुढाकार आणि हिंदुत्त्व लोकांना आवडले. त्या निवडणुकीत सगळ््यांचे डिपॉझिट मी जप्त केले. ३५ व्या वर्षीच आमदार झालो. एका मोठ्या संघर्षातूनच विजय मिळाला.

कार्यकर्ता म्हणूनच काम करायचे ठरविले होते. म्हणून निवडणूक हा विषय माझ्यासाठी नव्हताच. मी कोणतीही निवडणूक लढविली नव्हती. पहिल्यांदा थेट आमदारकीची निवडणूक लढविली आणि विजयी झालो, याचे मलाही आश्चर्य वाटले. तिकीट घेऊन काय करू असा माझा प्रश्न होता. प्रचारासाठी थोडेफार पैसे लागतात. तेही माझ्याकडे नव्हते. म्हणूनच निवडणूक लढविण्याचा विचार माझ्या मनात आला नव्हता. पण लोकांच्या आग्रहास्तव निवडणूक लढविली. मला निवडणुकीसाठी पैसा कधीच लागला नाही. कार्यकर्ते हेच माझे खरे धन आहे.

हिंदुत्त्वासाठी लढणारा एक सच्चा कार्यकर्ता असल्यामुळे काहीही घडलं तरी पोलीस माझ्याच मागे असायचे. मलाच पहिल्यांदा अटक व्हायची. माझ्यावर नेहमीच गुन्हे दाखल व्हायचे. हिंदू एकता समितीमध्येही माझी आरोपी म्हणूनच ओळख होती. मी काही कोणाच्या घरी डाके घातले नव्हते. मात्र लोकांच्या संरक्षणासाठी मला आरोपी व्हावे लागले. या आरोपीला पोलिसांच्याऐवजी आता लोकांनीच त्यांच्या प्रेमाच्या पिंजºयात कैद केले आहे. म्हणूनच सलग २५ वर्ष आमदार झालो.

छगन भुजबळ शिवसेनेतून बाहेर पडले. त्यावेळी महाराष्ट्रात शिवसेना फुटली. त्यावेळी मलाही विचारणा झाली होती. मात्र हिंदुत्त्वाचे रक्त माझ्या अंगात असल्याने दुसºया कोणाचाही विचार कधीच माझ्या मनात आला नाही. शिवसेना हाच एक पक्ष! हिंदुत्त्वावर होणारा अन्याय सहन होत नसल्याने सतत मनात संघर्षाची मशाल ज्वलंत होती.

नगर जातीय दंगलीसाठी राज्यात प्रसिद्ध होते. शहर जातीपातीबाबत संवेदनशील आहे. सर्जेपुरा येथे पहिल्यांदा दंगल झाली. मोठा राडा झाला होता. त्याचवेळी हिंदुच्या संरक्षणासाठी हिंदू एकता समितीच्या माध्यमातून आवाज उठविला. लोकांसाठी पुढे आलो. लोकांसाठी मी २४ तास उपलब्ध आहे. राजकारण हा काही व्यवसाय नाही. ती एक सेवा आहे आणि सेवाच राहिली पाहिजे. धंदे करण्यासाठी, शाळा-कॉलेज उघडण्यासाठी मी काही राजकारणात आलो नाही. तसे करणेही अयोग्यच आहे. म्हणूनच माझी कुठेच शाळा नाही की कॉलेजही नाही. संरक्षण आणि शांततेसाठी लढतो आहे. एक सामान्य मुलगा आमदार झाल्याचे निश्चितच समाधान आहे. आमदार असलो तरी आजही मी लोकांसाठी सामान्यच आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरAnil Rathodअनिल राठोड