शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

सर्वकाळ सत्कार्य करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2020 12:58 IST

अंत:करणरूपी मोबाईलमधून मीपणा डिलीट केला की अंगी नम्रता येते. आपण तीळ झालो म्हणजे देव हृदयात येतो. देवाशी संवाद करण्याची गोडी लागली की ती वाढतच जाते. इंद्रिय व मनातील वासना शांत होणे हे चारित्र्यसंपन्नतेचे लक्षण आहे. 

-मुकुंद महाराज जाटदेवळेकर / स्वत:ला तिळाएवढे लहान समजा. नम्र व्हा. निष्कलंक चारित्र्यसंपन्न जीवन जगा. यामुळे देव आपल्या जवळ निश्चित येईल. देव तिळी आला म्हणजे तिळाएवढा देव आपल्या शरिरात असतो. तो आपल्या आत्म्यात विराजमान असतो. अंतरी ध्यान लावून त्याच्याशी संवाद केला तर जो आनंद मिळतो तो आनंदच देव तिळी आल्याची अनुभूती मिळवून देतो. आपण जेव्हा सर्व ठिकाणी देव पहातो, तेव्हा आपणच देव होतो. अंत:करणरूपी मोबाईलमधून मीपणा डिलीट केला की अंगी नम्रता येते. आपण तीळ झालो म्हणजे देव हृदयात येतो. देवाशी संवाद करण्याची गोडी लागली की ती वाढतच जाते. इंद्रिय व मनातील वासना शांत होणे हे चारित्र्यसंपन्नतेचे लक्षण आहे. संक्रांतीसारख्या पर्वकाळात केलेली साधना सिध्द होते. दिलेले दान अनंतपटीचा लाभ मिळवून देते. दान केल्याने पुण्य लाभते. हे पुण्य अनेक काळपर्यत सुख प्रदान करते. पर्वकाळात परिवार आणि परिसर विसरून देवासमोर एकांतात बसावे. परमेश्वराशी अनुसंधान ठेवावे. पर्वकाळात परमेश्वराचे नामस्मरण, उपासना, तपश्चर्या करावी. पर्वकाळात केलेली साधना इतर काळाच्या अनंतपटीने भगवंतापर्यत पोहोचते. साधना व्यवस्थित चालली तर आयुष्य घालवून जे मिळत नाही ते सहज मिळते. श्रीसमर्थांनी साधना व तपश्चर्या केल्यानंतर कोणत्याही सुविधा नसलेल्या काळात बलसंपन्नतेचा संदेश देत श्रीमारूतीरायांच्या मुर्तीच्या प्रतिष्ठापना केल्या. ठिकठिकाणी मठस्थापना करून महंत निर्माण केले. तिर्थाटन करताना भिक्षेच्या निमित्ताने जनजागरण केले. आज गावोगावी दिसणारी श्रीमारूतीरायांची मंदिरे ही श्रीसमर्थ रामदास स्वामींची विचारधारा सर्वदूर पोहोचल्याची स्मृतीच जागवत आहेत. आपला गर्वकाळ विनाशाकडे नेतो. त्यासाठी पर्वकाळ केव्हा येतो? याची वाट न पहाता सर्वकाळ सत्कार्यात घालवावा. आपल्या भारतभूमीतील संतांच्या वाणीमधून प्रसवलेले ग्रंथ हे त्यांचे रूपच आहेत. सांसारिक साधकांच्या हाती ग्रंथ देऊन संतांनी जीवनयात्रा सफल होवो, असा आशिर्वाद दिला आहे. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरAdhyatmikआध्यात्मिक