शहरं
Join us  
Trending Stories
1
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
2
"Today I say to the whole world..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
3
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
4
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
5
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
6
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
7
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
8
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
9
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
10
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
11
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
12
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
13
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
14
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
15
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
16
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
17
मायेची फुंकर! ब्रेकअप, स्ट्रेस, रागावर फक्त एकाच थेरपीने उपचार, उशी ठरतेय वेदनांवरची डॉक्टर
18
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
19
WhatsApp वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! अ‍ॅडव्हान्स्ड चॅट प्रायव्हसी फीचर आले, कसे वापरायचे जाणून घ्या
20
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार

सर्वकाळ सत्कार्य करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2020 12:58 IST

अंत:करणरूपी मोबाईलमधून मीपणा डिलीट केला की अंगी नम्रता येते. आपण तीळ झालो म्हणजे देव हृदयात येतो. देवाशी संवाद करण्याची गोडी लागली की ती वाढतच जाते. इंद्रिय व मनातील वासना शांत होणे हे चारित्र्यसंपन्नतेचे लक्षण आहे. 

-मुकुंद महाराज जाटदेवळेकर / स्वत:ला तिळाएवढे लहान समजा. नम्र व्हा. निष्कलंक चारित्र्यसंपन्न जीवन जगा. यामुळे देव आपल्या जवळ निश्चित येईल. देव तिळी आला म्हणजे तिळाएवढा देव आपल्या शरिरात असतो. तो आपल्या आत्म्यात विराजमान असतो. अंतरी ध्यान लावून त्याच्याशी संवाद केला तर जो आनंद मिळतो तो आनंदच देव तिळी आल्याची अनुभूती मिळवून देतो. आपण जेव्हा सर्व ठिकाणी देव पहातो, तेव्हा आपणच देव होतो. अंत:करणरूपी मोबाईलमधून मीपणा डिलीट केला की अंगी नम्रता येते. आपण तीळ झालो म्हणजे देव हृदयात येतो. देवाशी संवाद करण्याची गोडी लागली की ती वाढतच जाते. इंद्रिय व मनातील वासना शांत होणे हे चारित्र्यसंपन्नतेचे लक्षण आहे. संक्रांतीसारख्या पर्वकाळात केलेली साधना सिध्द होते. दिलेले दान अनंतपटीचा लाभ मिळवून देते. दान केल्याने पुण्य लाभते. हे पुण्य अनेक काळपर्यत सुख प्रदान करते. पर्वकाळात परिवार आणि परिसर विसरून देवासमोर एकांतात बसावे. परमेश्वराशी अनुसंधान ठेवावे. पर्वकाळात परमेश्वराचे नामस्मरण, उपासना, तपश्चर्या करावी. पर्वकाळात केलेली साधना इतर काळाच्या अनंतपटीने भगवंतापर्यत पोहोचते. साधना व्यवस्थित चालली तर आयुष्य घालवून जे मिळत नाही ते सहज मिळते. श्रीसमर्थांनी साधना व तपश्चर्या केल्यानंतर कोणत्याही सुविधा नसलेल्या काळात बलसंपन्नतेचा संदेश देत श्रीमारूतीरायांच्या मुर्तीच्या प्रतिष्ठापना केल्या. ठिकठिकाणी मठस्थापना करून महंत निर्माण केले. तिर्थाटन करताना भिक्षेच्या निमित्ताने जनजागरण केले. आज गावोगावी दिसणारी श्रीमारूतीरायांची मंदिरे ही श्रीसमर्थ रामदास स्वामींची विचारधारा सर्वदूर पोहोचल्याची स्मृतीच जागवत आहेत. आपला गर्वकाळ विनाशाकडे नेतो. त्यासाठी पर्वकाळ केव्हा येतो? याची वाट न पहाता सर्वकाळ सत्कार्यात घालवावा. आपल्या भारतभूमीतील संतांच्या वाणीमधून प्रसवलेले ग्रंथ हे त्यांचे रूपच आहेत. सांसारिक साधकांच्या हाती ग्रंथ देऊन संतांनी जीवनयात्रा सफल होवो, असा आशिर्वाद दिला आहे. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरAdhyatmikआध्यात्मिक