शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

सर्वकाळ सत्कार्य करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2020 12:58 IST

अंत:करणरूपी मोबाईलमधून मीपणा डिलीट केला की अंगी नम्रता येते. आपण तीळ झालो म्हणजे देव हृदयात येतो. देवाशी संवाद करण्याची गोडी लागली की ती वाढतच जाते. इंद्रिय व मनातील वासना शांत होणे हे चारित्र्यसंपन्नतेचे लक्षण आहे. 

-मुकुंद महाराज जाटदेवळेकर / स्वत:ला तिळाएवढे लहान समजा. नम्र व्हा. निष्कलंक चारित्र्यसंपन्न जीवन जगा. यामुळे देव आपल्या जवळ निश्चित येईल. देव तिळी आला म्हणजे तिळाएवढा देव आपल्या शरिरात असतो. तो आपल्या आत्म्यात विराजमान असतो. अंतरी ध्यान लावून त्याच्याशी संवाद केला तर जो आनंद मिळतो तो आनंदच देव तिळी आल्याची अनुभूती मिळवून देतो. आपण जेव्हा सर्व ठिकाणी देव पहातो, तेव्हा आपणच देव होतो. अंत:करणरूपी मोबाईलमधून मीपणा डिलीट केला की अंगी नम्रता येते. आपण तीळ झालो म्हणजे देव हृदयात येतो. देवाशी संवाद करण्याची गोडी लागली की ती वाढतच जाते. इंद्रिय व मनातील वासना शांत होणे हे चारित्र्यसंपन्नतेचे लक्षण आहे. संक्रांतीसारख्या पर्वकाळात केलेली साधना सिध्द होते. दिलेले दान अनंतपटीचा लाभ मिळवून देते. दान केल्याने पुण्य लाभते. हे पुण्य अनेक काळपर्यत सुख प्रदान करते. पर्वकाळात परिवार आणि परिसर विसरून देवासमोर एकांतात बसावे. परमेश्वराशी अनुसंधान ठेवावे. पर्वकाळात परमेश्वराचे नामस्मरण, उपासना, तपश्चर्या करावी. पर्वकाळात केलेली साधना इतर काळाच्या अनंतपटीने भगवंतापर्यत पोहोचते. साधना व्यवस्थित चालली तर आयुष्य घालवून जे मिळत नाही ते सहज मिळते. श्रीसमर्थांनी साधना व तपश्चर्या केल्यानंतर कोणत्याही सुविधा नसलेल्या काळात बलसंपन्नतेचा संदेश देत श्रीमारूतीरायांच्या मुर्तीच्या प्रतिष्ठापना केल्या. ठिकठिकाणी मठस्थापना करून महंत निर्माण केले. तिर्थाटन करताना भिक्षेच्या निमित्ताने जनजागरण केले. आज गावोगावी दिसणारी श्रीमारूतीरायांची मंदिरे ही श्रीसमर्थ रामदास स्वामींची विचारधारा सर्वदूर पोहोचल्याची स्मृतीच जागवत आहेत. आपला गर्वकाळ विनाशाकडे नेतो. त्यासाठी पर्वकाळ केव्हा येतो? याची वाट न पहाता सर्वकाळ सत्कार्यात घालवावा. आपल्या भारतभूमीतील संतांच्या वाणीमधून प्रसवलेले ग्रंथ हे त्यांचे रूपच आहेत. सांसारिक साधकांच्या हाती ग्रंथ देऊन संतांनी जीवनयात्रा सफल होवो, असा आशिर्वाद दिला आहे. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरAdhyatmikआध्यात्मिक