शहरं
Join us  
Trending Stories
1
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
2
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
3
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
4
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
5
“अधिवेशानाचे सत्ताधाऱ्यांना गांभीर्य नाही, ‘हम करे सो कायदा’ पद्धतीने…”: हर्षवर्धन सपकाळ
6
“संसदीय लोकशाहीत विविध पक्षांच्या संघटनेचे योगदान देखील महत्त्वाचे”; मंत्री चंद्रकांत पाटील
7
“बाबा आणि आत्याने आईला खूप मारलं'”; ढसाढसा रडत ४ वर्षांच्या लेकाचा धक्कादायक खुलासा
8
अक्षय खन्नाला आहेत दोन भाऊ, एक सख्खा अन् एक सावत्र, दोघांनीही बॉलिवूडमध्ये केलं काम
9
विराट कोहली, रोहित शर्माला कपिल देव यांचा अजब सल्ला, म्हणाले- "मला वाटतं की टीम इंडियात..."
10
कॅमेरा नसलेला 'आयफोन' बाजारात? खरेच असा फोन अस्तित्वात आहे का? ॲप्पलच बनविते...
11
या ठिकाणी अचानक पडले ७०० मोठे खड्डे, जमिनीत गाडला जातोय संपूर्ण परिसर, कारण काय?
12
“साधूसंत झाडावर राहणार का? एक दिवस लोक सरकारला ‘चले जाव’ म्हणतील”; अण्णा हजारे संतापले
13
मैत्रिणींचा सोनमला वाचवण्याचा प्रयत्न? राजा रघुवंशीच्या भावाचा खळबळजनक आरोप
14
राहुल गांधींसोबतच्या बैठकीला शशी थरूर अनुपस्थित, चर्चांना उधाण, पक्षाने दिली अशी माहिती 
15
टाटा-हिंडाल्कोसह 'या' शेअर्समध्ये बंपर तेजी! बाजारात सलग दुसऱ्या दिवशी गुंतवणूकदारांची चांदी
16
Numerology: एकसारखे नंबर वारंवार दिसणे केवळ योगायोग नाही, तर उज्ज्वल भविष्याचे शुभ संकेत!
17
अजबच! घटस्फोट झाला, पण पत्नीने ना पोटगी मागितली ना... , उलट लग्नातल्या बांगड्याही केल्या परत, कोर्टही अवाक्   
18
नवा सिक्सर किंग! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीचा कहर! १४ षटकार ठोकत मोडला १७ वर्षांपूर्वीचा जागतिक विक्रम
19
चांदी झाली 'सोनेरी'! २ लाख रुपये किलोचा टप्पा पार, पण गुंतवणुकीपूर्वी 'हा' भयानक इतिहास वाचा
20
इम्रान खानचा काटा काढायला असीम मुनीरचा खतरनाक प्लॅन; देशद्रोहाचा खटला चालवला जाणार?
Daily Top 2Weekly Top 5

अकोलेतील साहित्य संमेलनात आदिवासींच्या एकीचा सूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2018 17:54 IST

फडकी फाउंडेशनतर्फे बुधवारी येथे आयोजित दुसऱ्या राज्यस्तरीय आदिवासी साहित्य संमेलनात आदिवासींच्या एकीचा सूर उमटला. पशु पक्ष्यांचे हुबेहुब आवाज काढणारे तालुक्यातील उडदावणे येथील ८० वर्षीय ठकाबाबा गांगड यांना बैजू बावरा कलारत्न पुरस्काराने गौरविण्यात आले.

अकोले : फडकी फाउंडेशनतर्फे बुधवारी येथे आयोजित दुसऱ्या राज्यस्तरीय आदिवासी साहित्य संमेलनात आदिवासींच्या एकीचा सूर उमटला. पशु पक्ष्यांचे हुबेहुब आवाज काढणारे तालुक्यातील उडदावणे येथील ८० वर्षीय ठकाबाबा गांगड यांना बैजू बावरा कलारत्न पुरस्काराने गौरविण्यात आले.आदिवासी समाज मातृसत्ताक संस्कृती जपणारा असला तरी वास्तवात स्त्रियांची अवहेलना होताना व त्यांच्या हक्कांची पायमल्ली होताना दिसत आहे. त आदिवासी महिलांच्या सक्षमीकरणासाठी त्यांना दर्जेदार शिक्षण मिळाले पाहिजे. आदिवासी महिला केंद्रीत साहित्य निर्मितीला प्राधान्य दिले गेले तरच आदिवासी संस्कृती अबाधित राहील, असे प्रतिपादन संमेलनाध्यक्षा कवयित्री कुसूम आलाम (गडचिरोली) यांनी केले. कंपन्यांच्या अतिक्रमणामुळे झारखंडमध्ये आदिवासी विस्थापित होत आहेत. विस्थापित होण्याच्या मोठ्या समस्येमुळे येथील आदिवासी संस्कृती व साहित्य धोक्यात आले आहे. मराठी साहित्य हिंदीत अनुदानित झाले आणि ते झारखंडमधे पोहचले तर काही प्रमाणात बदल होऊ शकतो, असे मत जेष्ठ साहित्यिक महादेव टोप्पो(रांची) यांनी व्यक्त केले. जल, जंगल, जमीन यातच आदिवासींच्या संस्कृती असून आदिवासींच्या साहित्य संस्कृती जतन करण्यासाठी जंगल संपत्ती टिकली पाहिजे. त्यासाठी वन कायदे अधिक कडक व्हावेत. त्याची योग्य अंमलबजावणी व्हावी.तसेच वन संपत्तीचे संरक्षण आणि संवर्धन सजगतेने व्हावे असा सल्ला सांगल्याभाई वळवी (गुजरात) यांनी यावेळी दिला. यावेळी बियाणे बँक चालविणाºया राहीबाई पोपेरे, इंद्रजित गावित, फडकीचे अध्यक्ष डॉ.संजय लोहकरे, मारूती लांघी, डॉ.तुकाराम रोंगटे, सुनील गायकवाड, उपसभापती मारूती मेंगाळ आदी उपस्थित होते.अमू अक्का एक हो....!‘अमु अक्का एक हो...!’ म्हणजे आम्ही सर्व ‘श्रमिक, कष्टकरी, शेतकरी,उपेक्षितांचं जगणं वाट्याला आलेले, धनिकांकडून शोषण केले गेले, सतत हेटाळले गेलेले’ एक आहोत. भाजप व संघवाले बोलायला चतुर आहेत. आदिवासींना वन निवासी म्हणून हेटाळत आहेत. शेतकºयांच्या पोरांची एकी त्यांना बघवत नाही. शेटजी-भटजींच्या विरोधात प्रांतिक,भाषिक, जातीय, धर्मीय असे सर्व भेद बाजूला ठेऊन शेतकरी श्रमिकांची एकीची मूठ घट्ट केली पाहिजे. तसेच रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे व भयावह किटकनाशकांच्या फवारणीमुळे शेतजमीन, माती वांझ,निर्जिव होत चालली आहे. त्यासाठी जनजागृती केली पाहिजे. सर्व भेद विसरुन शेतकºयांच्या मुलांनी ‘घामाचं योग्य दाम’ मिळविण्याच्या लढ्यासाठी सिध्द व्हा, असे आवाहन मार्क्सवादी किसान सभेचे राज्य सचिव डॉ.अजित नवले यांनी केले. 

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरAkoleअकोले