शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
2
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
3
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
4
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
5
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
6
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
7
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
8
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
9
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
10
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
11
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
12
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
13
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
14
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
15
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
16
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
17
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
18
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
19
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
20
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...

अकोलेतील साहित्य संमेलनात आदिवासींच्या एकीचा सूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2018 17:54 IST

फडकी फाउंडेशनतर्फे बुधवारी येथे आयोजित दुसऱ्या राज्यस्तरीय आदिवासी साहित्य संमेलनात आदिवासींच्या एकीचा सूर उमटला. पशु पक्ष्यांचे हुबेहुब आवाज काढणारे तालुक्यातील उडदावणे येथील ८० वर्षीय ठकाबाबा गांगड यांना बैजू बावरा कलारत्न पुरस्काराने गौरविण्यात आले.

अकोले : फडकी फाउंडेशनतर्फे बुधवारी येथे आयोजित दुसऱ्या राज्यस्तरीय आदिवासी साहित्य संमेलनात आदिवासींच्या एकीचा सूर उमटला. पशु पक्ष्यांचे हुबेहुब आवाज काढणारे तालुक्यातील उडदावणे येथील ८० वर्षीय ठकाबाबा गांगड यांना बैजू बावरा कलारत्न पुरस्काराने गौरविण्यात आले.आदिवासी समाज मातृसत्ताक संस्कृती जपणारा असला तरी वास्तवात स्त्रियांची अवहेलना होताना व त्यांच्या हक्कांची पायमल्ली होताना दिसत आहे. त आदिवासी महिलांच्या सक्षमीकरणासाठी त्यांना दर्जेदार शिक्षण मिळाले पाहिजे. आदिवासी महिला केंद्रीत साहित्य निर्मितीला प्राधान्य दिले गेले तरच आदिवासी संस्कृती अबाधित राहील, असे प्रतिपादन संमेलनाध्यक्षा कवयित्री कुसूम आलाम (गडचिरोली) यांनी केले. कंपन्यांच्या अतिक्रमणामुळे झारखंडमध्ये आदिवासी विस्थापित होत आहेत. विस्थापित होण्याच्या मोठ्या समस्येमुळे येथील आदिवासी संस्कृती व साहित्य धोक्यात आले आहे. मराठी साहित्य हिंदीत अनुदानित झाले आणि ते झारखंडमधे पोहचले तर काही प्रमाणात बदल होऊ शकतो, असे मत जेष्ठ साहित्यिक महादेव टोप्पो(रांची) यांनी व्यक्त केले. जल, जंगल, जमीन यातच आदिवासींच्या संस्कृती असून आदिवासींच्या साहित्य संस्कृती जतन करण्यासाठी जंगल संपत्ती टिकली पाहिजे. त्यासाठी वन कायदे अधिक कडक व्हावेत. त्याची योग्य अंमलबजावणी व्हावी.तसेच वन संपत्तीचे संरक्षण आणि संवर्धन सजगतेने व्हावे असा सल्ला सांगल्याभाई वळवी (गुजरात) यांनी यावेळी दिला. यावेळी बियाणे बँक चालविणाºया राहीबाई पोपेरे, इंद्रजित गावित, फडकीचे अध्यक्ष डॉ.संजय लोहकरे, मारूती लांघी, डॉ.तुकाराम रोंगटे, सुनील गायकवाड, उपसभापती मारूती मेंगाळ आदी उपस्थित होते.अमू अक्का एक हो....!‘अमु अक्का एक हो...!’ म्हणजे आम्ही सर्व ‘श्रमिक, कष्टकरी, शेतकरी,उपेक्षितांचं जगणं वाट्याला आलेले, धनिकांकडून शोषण केले गेले, सतत हेटाळले गेलेले’ एक आहोत. भाजप व संघवाले बोलायला चतुर आहेत. आदिवासींना वन निवासी म्हणून हेटाळत आहेत. शेतकºयांच्या पोरांची एकी त्यांना बघवत नाही. शेटजी-भटजींच्या विरोधात प्रांतिक,भाषिक, जातीय, धर्मीय असे सर्व भेद बाजूला ठेऊन शेतकरी श्रमिकांची एकीची मूठ घट्ट केली पाहिजे. तसेच रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे व भयावह किटकनाशकांच्या फवारणीमुळे शेतजमीन, माती वांझ,निर्जिव होत चालली आहे. त्यासाठी जनजागृती केली पाहिजे. सर्व भेद विसरुन शेतकºयांच्या मुलांनी ‘घामाचं योग्य दाम’ मिळविण्याच्या लढ्यासाठी सिध्द व्हा, असे आवाहन मार्क्सवादी किसान सभेचे राज्य सचिव डॉ.अजित नवले यांनी केले. 

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरAkoleअकोले