शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
8
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

अहमदनगर - पुणे इंटरसिटी रेल्वेसाठी आता दिल्लीत आंदोलन -  आ. संग्राम जगताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 15:51 IST

इंटरसिटी रेल्वेचा प्रश्न सोडवण्यासाठी शांत न बसता प्रशासनाशी भांडू. प्रसंगी आपण दिल्लीत जाऊ,

अहमदनगर : इंटरसिटी रेल्वेचा प्रश्न सोडवण्यासाठी शांत न बसता प्रशासनाशी भांडू. प्रसंगी आपण दिल्लीत जाऊ, मंत्री महोदायांशी चर्चा करू त्यातूनही मार्ग निघाला नाही तर दिल्लीत आंदोलन करू. अहमदनगर- पुणे इंटरसिटी रेल्वे सुरु व्हावी, या माग‌णीसाठी विविध सामाजिक व प्रवासी संघटनांनी रेल्वे स्टेशनवर गांधीगिरी केली. याप्रसंगी जगताप बोलत होते. 

 

आमदार संग्राम जगताप, जागरूक नागरिक मंचचे सुहास मुळे, प्रवासी संघटनेचे हरजितसिंग वाधवा, सामाजिक कार्यकर्ते कारभारी गवळी, अर्षद शेख, दत्ता गायकवाड, बहिरनाथ वाकळे, जालिंदर बोरुडे, कैलास दळवी, अशोक कानडे, प्रकाश कुलकर्णी, मन्सूर शेख आदींसह विविध क्षेत्रातिल नागरिक उपस्थित होते.

 

रेल्वे प्रशासनाकडून रेल रोको आंदोलन करू नये, अशी विनंती आंदोलकांना करण्यात आली. प्रभारी स्टेशन मास्तर श्रीकांत परोडा व वाणिज्य निरिक्षक एस.एम. वेदपाठक यांनी नगर- पुणे इंटरसिटी रेल्वेबाबत सर्वे करून सुरु करणार आहोत, असे लेखी आश्वासन यावेळी दिले. 

आमदार जगताप म्हणाले, नगर- पुणे इंटरसिटी रेल्वे सुरु व्हावी यासाठी विविध प्रवासी व सामाजिक संघटनांनी सुरु केलेले आंदोलन महत्वाचे आहे. पुण्याला जाण्याऱ्या सर्वसामान्यांचा वेळ, पैसा वाचण्यासाठी अल्प दरात सोय होण्यासाठी ही रेल्वे सुरु होणे गरजेचे आहे. आता स्पीड लिमिट असल्याने वाहनेही फस्ट चालवली तर दंड होतो. आंदोलनाला मी पाठींबा देत आहे. 

 

सुहास मुळे म्हणाले, आम्ही शांत बसणार नाही. प्रशासनाने जरी लेखी आश्वासन दिले असले तरी एक महिन्यत ही गाडी सुरु झाली नाहीतर आम्ही दिल्लीत रेल्वे मंत्र्यांच्या दालनात धरणे आंदोलन करू. हरजितसिंग वधवा म्हणाले, नगर शहराच्या विकासाच्या दृष्टीने ही रेल्वे सुरु होणे अत्यावश्यक आहे. अनेक वर्षांपासून रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा करत आहे. अर्षद शेख म्हणाले, नगर शहराचा विकास थांबल्याने हे शहर आता निवृत्त नागरिकांचे शहर होत आहे. आमची सहनशीलता आता संपली आहे.

 

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरSangram Jagtapआ. संग्राम जगतापrailwayरेल्वे