शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटील बाहेर पडणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘पत्रही नाही, राजीनामाही नाही…’
2
“चुकीच्या मार्गाला सुप्रिया सुळे जातील असे वाटत नाही”; संजय राऊत आशावादी, भाजपावर टीका
3
“चंद्रहार पाटीलसाठी प्रतिष्ठा पणाला लावली, पण बेईमानी केली”; संजय राऊतांनी बोलून दाखवली खंत
4
...म्हणून सोनमचा प्रियकर स्वत: शिलाँगला गेला नव्हता, राजाचा काटा काढण्यासाठी असा रचला भयानक कट  
5
MBA चं स्वप्न मोडलं, घराबाहेर जाण्यावर लावली बंदी; सोनम रघुवंशीची अशी होती 'सीक्रेट लाइफ'
6
वारंवार घरातून पळून जात होती पत्नी; वैतागलेल्या पतीनं उचललं धक्कादायक पाऊल!
7
पती राजाची 'सुपारी' देणारी सोनम रघुवंशी गर्भवती आहे का? तिची प्रेग्नंसी टेस्ट झाली अन्...
8
जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, म्हणाले, "शरद पवार यांना विनंती करतो, त्यांनी..."
9
रेश्मा शिंदेने घरातच साजरी केली वटपौर्णिमा! अभिनेत्रीसोबत साऊथ पतीनेही वडाच्या झाडाला मारल्या फेऱ्या
10
सोनम रघुवंशीनं किती रुपयांत केली होती पती राजाच्या जीवाची 'डील'? कुणाला किती रुपये दिले अ‍ॅडव्हॉन्स? जाणून थक्क व्हाल!
11
११ रुपयांचा शेअर पोहोचला ५७१ रुपयांवर, 'या' कंपनीने गुंतवणूकदारांना दिला '५०००%' परतावा!
12
Corona Virus : बापरे! कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने पुन्हा भरवली धडकी, XFG रोगप्रतिकारक शक्तीला देतोय चकवा
13
आर्थिक अडचणींना वैतागून एमबीबीएस विद्यार्थ्याची आत्महत्या; जेजे रुग्णालयाच्या वसतिगृहातील घटना!
14
अजित पवारांसोबत जाण्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान; पक्षाच्या वर्धापनदिनी म्हणाल्या...
15
२४ तास उलटूनही आग शमेना, अजूनही येतायत स्फोटांचे आवाज! केरळच्या समुद्रात सुरू आहे मोठं रेस्क्यू ऑपरेशन
16
Raj Kushwaha : "माझा मुलगा २० वर्षांचा, पोलीस खोटं बोलताहेत"; सोनमचा बॉयफ्रेंड राज कुशवाहच्या आईचा दावा
17
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
18
Vat Purnima Vrat 2025: वट पौर्णिमेची पूजा झाली, पण घाईघाईत कथा वाचायची राहून गेली? वाचा 'ही' कथा!
19
फक्त या कारणामुळे आशुतोष राणाने रेणुका शहाणेसोबत केलं लग्न, २४ वर्षांनंतर अभिनेत्रीचा खुलासा
20
"मला लग्नच करायचं नव्हतं...", उषा नाडकर्णींनी पहिल्यांदाच लग्नावर केलेलं भाष्य

Ahmednagar Municipal Election : महापौर पदाचा घोडेबाजार पुन्हा रंगणार ?

By नवनाथ कराडे | Updated: December 10, 2018 15:21 IST

नवनाथ खराडे अहमदनगर : सध्याचे कल पाहता नगर महापालिकेत त्रिशंकू स्थिती दिसत आहे. महापालिका त्रिशंकू झाल्यास महापौर पदासाठी घोडेबाजाराची ...

नवनाथ खराडेअहमदनगर : सध्याचे कल पाहता नगर महापालिकेत त्रिशंकू स्थिती दिसत आहे. महापालिका त्रिशंकू झाल्यास महापौर पदासाठी घोडेबाजाराची परंपरा कायम राहणार असल्याचे चित्र दिसत आहे. अहमदनगरला महानगरपालिका स्थापन झाल्यापासून ही परंपरा कायमच आहे. नगरकरांनी कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत दिलेले नाही.२००३ मध्ये स्थापन झालेल्या नगर महापालिकेच्या चौथ्या सार्वत्रिक निवडणुकीचे कल हाती येत आहेत. ३० जून २००३ रोजी नगर महापालिका अस्तित्वात आल्यानंतर त्याचवर्षी डिसेंबरला पहिली निवडणूक झाली. या निवडणकीमध्ये सर्वाधिक जागा शिवसेना-भाजप युतीने जिंकल्या होत्या. पहिल्या अडीच वर्षांच्या कालावधीसाठी शिवसेनेचे भगवान फुलसौंदर यांना पहिला महापौर होण्याचा मान मिळाला. त्यानंतर सत्ताधारी गटात फाटाफूट झाल्याने या पंचवार्षिकमधील दुसरे महापौरपद काँग्रेसने मिळवले. यावेळी संदीप कोतकर महापौर बनले. २००८ मध्ये झालेल्या दुसऱ्या निवडणुकीतही शिवसेना- भाजप युती बहुमताच्या जवळ पोचली होती. या निवडणुकीमध्ये शिवसेनेला १८, भाजपला १२, काँग्रेसला ९, राष्ट्रवादी १४, मनसे २ तर अपक्ष २ व इतरांना दोन जागा मिळाल्या. पण पुन्हा फोडाफोडी होऊन राष्ट्रवादीचे संग्राम जगताप महापौर झाले. मात्र, झालेली फोडाफोडी जुळवून या पंचवार्षिकचे दुसरे महापौरपद शिवसेनेने पुन्हा मिळवले. शिला शिंदे या महापौर झाल्या. २०१३ मध्ये झालेल्या तिसºया सार्वत्रिक निवडणुकीत युती व काँग्रेस आघाडीला संमिश्र यश मिळाल्याने घोडेबाजार रंगला. शिवसेनेला १७, भाजपा ९, काँग्रेस ११ तर राष्ट्रवादीने १८ जागा मिळविल्या. मनसे ४, अपक्ष ९ अशा जागा मिळाल्या. यात राष्ट्रवादी काँग्रेसने बाजी मारून पुन्हा एकदा संग्राम जगताप महापौर झाले. त्यानंतर काही काळातच विधानसभा निवडणुकीत जगताप यांनी विजय मिळविला ्त्यामुळे राष्ट्रवादीचे अभिषेक कळमकर महापौर झाले. पण दुसºया टप्प्यात असाच घोडेबाजार युतीनेही रंगवून पुन्हा शिवसेनेने महापौरपद मिळवले. आणि सुरेखा कदम महापौर बनल्या.मागील १५ वर्षांत ७ महापौर झाले असून, त्यात शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रत्येकी तीन तर काँग्रेसचा एक महापौर झाला आहे. भाजपला अजून एकदाही हे पद भूषविता आलेले नाही. आता पार पडलेल्या निवडणुकीतही कोणत्यात पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. शिवसेना आणि भाजप यांनी ही निवडणुक स्वतंत्र लढविली होती. शहरातील अंतर्गत चौथ्या निवडणुकीत भाजपाला अपेक्षित यश मिळाले नाही. त्यामुळे भाजपाचा महापौर होण्याचे स्वप्न जवळपास मावळले आहे. त्यामुळे आता महापौरपदासाठी पुन्हा एकदा घोडेबाजार रंगण्याची चिन्हे आहेत.या घोडेबाजारमध्ये नेमका कोणता पक्ष आघाडी घेतोय याकडे राज्याचे लक्ष लागणार आहे.

टॅग्स :Ahmednagar Municipal Electionअहमदनगर महानगरपालिका निवडणूकBJPभाजपाShiv SenaशिवसेनाMNSमनसे