शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
4
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
5
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
6
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
7
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
8
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
9
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
10
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
11
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
12
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
13
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
14
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
15
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
16
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
17
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
18
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
19
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
20
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”

Ahmednagar Municipal Election : महापौर पदाचा घोडेबाजार पुन्हा रंगणार ?

By नवनाथ कराडे | Updated: December 10, 2018 15:21 IST

नवनाथ खराडे अहमदनगर : सध्याचे कल पाहता नगर महापालिकेत त्रिशंकू स्थिती दिसत आहे. महापालिका त्रिशंकू झाल्यास महापौर पदासाठी घोडेबाजाराची ...

नवनाथ खराडेअहमदनगर : सध्याचे कल पाहता नगर महापालिकेत त्रिशंकू स्थिती दिसत आहे. महापालिका त्रिशंकू झाल्यास महापौर पदासाठी घोडेबाजाराची परंपरा कायम राहणार असल्याचे चित्र दिसत आहे. अहमदनगरला महानगरपालिका स्थापन झाल्यापासून ही परंपरा कायमच आहे. नगरकरांनी कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत दिलेले नाही.२००३ मध्ये स्थापन झालेल्या नगर महापालिकेच्या चौथ्या सार्वत्रिक निवडणुकीचे कल हाती येत आहेत. ३० जून २००३ रोजी नगर महापालिका अस्तित्वात आल्यानंतर त्याचवर्षी डिसेंबरला पहिली निवडणूक झाली. या निवडणकीमध्ये सर्वाधिक जागा शिवसेना-भाजप युतीने जिंकल्या होत्या. पहिल्या अडीच वर्षांच्या कालावधीसाठी शिवसेनेचे भगवान फुलसौंदर यांना पहिला महापौर होण्याचा मान मिळाला. त्यानंतर सत्ताधारी गटात फाटाफूट झाल्याने या पंचवार्षिकमधील दुसरे महापौरपद काँग्रेसने मिळवले. यावेळी संदीप कोतकर महापौर बनले. २००८ मध्ये झालेल्या दुसऱ्या निवडणुकीतही शिवसेना- भाजप युती बहुमताच्या जवळ पोचली होती. या निवडणुकीमध्ये शिवसेनेला १८, भाजपला १२, काँग्रेसला ९, राष्ट्रवादी १४, मनसे २ तर अपक्ष २ व इतरांना दोन जागा मिळाल्या. पण पुन्हा फोडाफोडी होऊन राष्ट्रवादीचे संग्राम जगताप महापौर झाले. मात्र, झालेली फोडाफोडी जुळवून या पंचवार्षिकचे दुसरे महापौरपद शिवसेनेने पुन्हा मिळवले. शिला शिंदे या महापौर झाल्या. २०१३ मध्ये झालेल्या तिसºया सार्वत्रिक निवडणुकीत युती व काँग्रेस आघाडीला संमिश्र यश मिळाल्याने घोडेबाजार रंगला. शिवसेनेला १७, भाजपा ९, काँग्रेस ११ तर राष्ट्रवादीने १८ जागा मिळविल्या. मनसे ४, अपक्ष ९ अशा जागा मिळाल्या. यात राष्ट्रवादी काँग्रेसने बाजी मारून पुन्हा एकदा संग्राम जगताप महापौर झाले. त्यानंतर काही काळातच विधानसभा निवडणुकीत जगताप यांनी विजय मिळविला ्त्यामुळे राष्ट्रवादीचे अभिषेक कळमकर महापौर झाले. पण दुसºया टप्प्यात असाच घोडेबाजार युतीनेही रंगवून पुन्हा शिवसेनेने महापौरपद मिळवले. आणि सुरेखा कदम महापौर बनल्या.मागील १५ वर्षांत ७ महापौर झाले असून, त्यात शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रत्येकी तीन तर काँग्रेसचा एक महापौर झाला आहे. भाजपला अजून एकदाही हे पद भूषविता आलेले नाही. आता पार पडलेल्या निवडणुकीतही कोणत्यात पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. शिवसेना आणि भाजप यांनी ही निवडणुक स्वतंत्र लढविली होती. शहरातील अंतर्गत चौथ्या निवडणुकीत भाजपाला अपेक्षित यश मिळाले नाही. त्यामुळे भाजपाचा महापौर होण्याचे स्वप्न जवळपास मावळले आहे. त्यामुळे आता महापौरपदासाठी पुन्हा एकदा घोडेबाजार रंगण्याची चिन्हे आहेत.या घोडेबाजारमध्ये नेमका कोणता पक्ष आघाडी घेतोय याकडे राज्याचे लक्ष लागणार आहे.

टॅग्स :Ahmednagar Municipal Electionअहमदनगर महानगरपालिका निवडणूकBJPभाजपाShiv SenaशिवसेनाMNSमनसे