शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

अहमदनगर महापालिकेचे कचरा संकलन दुसऱ्या दिवशीही ठप्पच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2018 20:03 IST

कचरा संकलन करणारी वाहने आणि मजुरांचा पुरवठा करणाºया पुरवठादारांना वेतनाचे पैसे न दिल्याने त्यांनी गेल्या दोन दिवसांपासून बंद पुकारला आहे. त्यामुळे शहरातील कचरा जागेवरच पडून आहे.

ठळक मुद्देसभापती वाकळे-उपायुक्तांचे प्रयत्न निष्फळ

अहमदनगर : कचरा संकलन करणारी वाहने आणि मजुरांचा पुरवठा करणाºया पुरवठादारांना वेतनाचे पैसे न दिल्याने त्यांनी गेल्या दोन दिवसांपासून बंद पुकारला आहे. त्यामुळे शहरातील कचरा जागेवरच पडून आहे. शिवसेनेचे सर्वच पदाधिकारी फरार झाल्याने स्थायी समितीचे सभापती बाबासाहेब वाकळे यांनी पुढाकार घेत पुरवठादारांशी चर्चा केली. मात्र ती निष्फळ ठरल्याने प्रशासन-ठेकेदार यांच्यातील वाद थेट जिल्हाधिकारी यांच्या कोर्टात गेला आहे.कचरा संकलन करण्यासाठी वाहने आणि मजुरांचा पुरवठा करणाºया पुरवठादार संस्थांचे गेल्या सहा महिन्यांपासूनचे दीड कोटी रुपयांची वेतनाची देयके थकली आहेत. बिलासाठी वारंवार पाठपुरावा करूनही पैसै मिळत नसल्याने पुरवठादारांनी वाहने व मजुरांचा पुरवठा बंद केला आहे. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून कचरा संकलन बंद आहे. शहरातील अनेक भागात कचरा जागेवरच असून वाहनेही जागेवरच ठप्प आहेत. अनेक भागात कचरा रस्त्यावर अस्ताव्यस्त पडला आहे. कंटेनरमधील कचरा ओव्हर फ्लो झाला आहे.केडगाव दगडफेकप्रकरणी सध्या पोलिसांकडून शिवसैनिकांची धरपकड सुरू आहे. त्यामुळे शिवसेनेचे महापालिकेतील पदाधिकारी फरार आहेत. महापौर सुरेखा कदम यांचे पती संभाजी कदम हेही फरार झाले आहेत. त्यामुळे महापौर दालनात शुकशुकाट आहे. गुन्हा दाखल नसला तरी नस्ती चौकशी नको म्हणून उपमहापौर अनिल बोरुडे, सभागृहनेते गणेश कवडे यांनीही महापालिकेकडे पाठ फिरवली आहे. आयुक्तांचा कार्यभार जिल्हाधिकारी द्विवेदी यांच्याकडे आहे. तसेच महापालिकेत सक्षम अधिकाºयांची वानवा असल्याने पुरवठादारांनी सभापती बाबासाहेब वाकळे यांचे दालन गाठले. वाकळे यांनी प्रभारी मुख्य लेखाधिकारी अंबादास साळी यांच्याशी चर्चा केली. प्रभारी उपायुक्त दिगंबर कोंडा, घनकचरा व्यवस्थापन प्रमुख डॉ. एन.एस. पैठणकर यांच्याशी चर्चा केली. त्यावेळी आदर्श एंटरप्रायजेसच्या संचालकांनी केलेल्या मागणीनुसार १२ लाख रुपयांचा धनादेश काढण्याचा तोडगा निघाला. मात्र ९० लाखांचे बिल असताना किमान पन्नास टक्के रक्कम अदा करण्याची मागणी केली. वाहनांवरील मजुरांचे पुरवठादार रौनक एजन्सी यांचेही बिल देण्यास प्रशासन असमर्थ ठरले. त्यामुळे सायंकाळी पैठणकर यांनी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्याकडे धाव घेतली.शहरातील कचरा जागेवरचकचरा संकलन ठप्प झाल्याने शहरातील कचरा सलग दुसºया दिवशीही जागेवरच होता. कचराकुंड्या ओव्हर फ्लो झाल्या होत्या. तर रस्त्यावर कचरा पसरला होता. काही भागातील कचरा अनेक दिवसांपासून उचलला न गेल्याने शहरात दुर्गंधी पसरली आहे.

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरMuncipal Corporationनगर पालिका