शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

अहमदनगरचा समावेश आॅरेन्ज झोनमध्ये? ही तर गुड न्यूज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2020 14:24 IST

लोकमत न्यूज नेटवर्क अहमदनगर : जिथे पंधरापेक्षा कमी रुग्ण आहेत, अशा जिल्ह्यांचा समावेश आॅरेन्ज झोनमध्ये करण्यात आला आहे. अहमदनगर ...

लोकमत न्यूज नेटवर्कअहमदनगर : जिथे पंधरापेक्षा कमी रुग्ण आहेत, अशा जिल्ह्यांचा समावेश आॅरेन्ज झोनमध्ये करण्यात आला आहे. अहमदनगर जिल्ह्यात रुग्णांची संख्या २७ असली तरी तीन रुग्ण घरी सोडण्यात आले असून बरेचशे रुग्ण हे विदेशी, परप्रांतीय आहेत. त्यामुळे अहमदनगरच्या रुग्णांचा विचार केला तर नगरमध्ये ही संख्या १५ पेक्षा कमी आहे. त्यामुळेच राज्य शासनाने अहमदनगरचा समावेश आॅरेन्ज झोनमध्ये केला आहे. यामुळे नगर जिल्ह्यातील लॉकडाऊनमधील काही निर्बंध शिथिल होण्याची शक्यता आहे. जिल्ह्याच्या सीमा मात्र बंदच राहणार आहेत. याबाबत प्रशासकीय पातळीवर अद्याप कोणताही आदेश आलेला नाही. मात्र आॅरेन्ज झोनमध्ये समावेश झाल्याने नगरकरांना दिलासा मिळणार आहे.रुग्ण संख्येनुसार जिल्ह्यांचे रेड, आॅरेन्ज आणि ग्रीन झोन करण्यात आले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी तीन झोनची निर्मिती करण्यात आली आहे. १५ पेक्षा जास्त रुग्ण असलेले जिल्हे रेड झोनमध्ये गेले आहेत. १५ पेक्षा कमी रुग्ण संख्या असलेले जिल्हे आॅरेन्ज झोनमध्ये गेले आहेत, तर एकही रुग्ण नसलेल्या जिल्ह्याचा समावेश ग्रीन झोनमध्ये करण्यात आला आहे.२७ रुग्ण असुनही अहमदनगर जिल्ह्याचा आॅरेन्ज झोनमध्ये समावेश करण्यात आला आहे. रुग्ण संख्या २७ असली तरी बरे झालेल्या तीन रुग्णांना घरी पाठविण्यात आले आहे. एकाचा मृत्यू झाला आहे. आठ रुग्ण परप्रांतीय व विदेशी आहेत. २७ मधून बारा वजा केले असता १५ रुग्णसंख्याच राहते. जे रुग्ण मुळचे नगर जिल्ह्यातील आहेत. त्यामुळे नगरचा समावेश बहुतेक आॅरेन्ज झोनमध्ये केला असण्याची शक्यता आहे.