शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

अहमदनगर जिल्ह्यात १३८.९६ लाख क्विंटल साखरचे उत्पादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2018 17:57 IST

सन २०१७-१८ च्या सध्या सुरू असलेल्या गळीत हंगामात १० एप्रिलपर्यंत अहमदनगर जिल्ह्यात १२७.३८ लाख मेट्रिक टन ऊस गाळप करून १३८.९६ लाख क्विंटल साखर तयार झाली आहे.

अहमदनगर : सन २०१७-१८ च्या सध्या सुरू असलेल्या गळीत हंगामात १० एप्रिलपर्यंत अहमदनगर जिल्ह्यात १२७.३८ लाख मेट्रिक टन ऊस गाळप करून १३८.९६ लाख क्विंटल साखर तयार झाली आहे.यंदाच्या हंगामात जिल्ह्यातील १४ सहकारी व ८ खासगी असे २२ कारखाने सुरू झाले होते. यातील आठ कारखान्यांच्या गळीत हंगामाची सांगता झाली आहे. कर्जतच्या अंबालिका (इंडेकॉन) या खासगी साखर कारखान्याने ऊस गाळप व साखर उत्पादनात जिल्ह्यातील कारखान्यांमध्ये आघाडी घेतली आहे. या कारखान्याने आतापर्यंत १४ लाख १८ हजार ९९० मेट्रिक टन उसाचे गाळप करून १६ लाख ४९ हजार ९०० क्विंटल साखरेचे उत्पादन करीत ११.६३ टक्के सरासरी साखर उतारा मिळविला आहे. सहकारी कारखान्यांमध्ये भेंडा येथील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याने आघाडी घेत ११ लाख ६ हजार ९५५ मेट्रिक टन उसाचे गाळप करून १२ लाख ४३ हजार ८५० क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. त्याखालोखाल संगमनेरच्या थोरात सहकारी कारखान्याने १० लाख ७१ हजार ८० मेट्रिक टन उसाचे गाळप करून १२ लाख १४ हजार २२० क्विंटल साखरेची निर्मिती केली आहे.अहमदनगर जिल्ह्यातील तनपुरे (राहुरी), श्रीगोंदा, कुकडी, श्री क्रांती शुगर (पारनेर), अंबालिका (कर्जत), साईकृपा-१, जय श्रीराम शुगर, पियुश शुगर (संगमनेर) या आठ कारखान्यांच्या गळीत हंगामाची सांगता झाली आहे.विखेचा साखर उतारा सरस; पियुशचा सर्वात कमीप्रवरानगर येथील पद्मश्री डॉ. विखे सहकारी कारखाना सरासरी साखर उताऱ्यात अहमदनगर जिल्ह्यात सरस ठरला आहे. या कारखान्याने ११.७८ टक्के एवढा सर्वाधिक उतारा मिळविला आहे. त्यानंतर अंबालिका कारखान्याचा ११.६३, तनपुरे कारखान्याचा ११.५४, थोरात कारखान्याचा ११.३४, अगस्ती व ज्ञानेश्वरचा ११.२४, गणेशचा ११.१९ टक्के साखर उतारा आहे. संजीवनी, काळे, अशोक, वृद्धेश्वर, मुळा, कुकडी,क्रांती शुगर,गंगामाई, साईकृपा-१,प्रसाद शुगर, युटेक शुगर या कारखान्यांचा साखर उतारा ११ टक्क्यांच्या आत आहे. तर जय श्रीराम शुगर, पियुश, केदारेश्वर या तीन कारखान्यांच्या उतारा १० टक्क्यांच्या आत आहे. पियुष शुगरचा सर्वात कमी ८.७१ टक्के एवढा सरासरी उतारा आहे.

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरSugar factoryसाखर कारखाने