शहरं
Join us  
Trending Stories
1
गोव्यावरून कोल्हापुरात आली आणि रंकाळा तलावात...; गर्भवती नेहा पवार यांच्यासोबत काय घडलं?
2
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
3
IND vs SA Live Streaming 3rd T20I : सूर्या-गिलवर असतील नजरा! कुठं पाहता येईल तिसरा टी-२० सामना?
4
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
5
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
6
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
7
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
8
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
9
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
10
'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
Daily Top 2Weekly Top 5

अहमदनगर जिल्ह्यात १३८.९६ लाख क्विंटल साखरचे उत्पादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2018 17:57 IST

सन २०१७-१८ च्या सध्या सुरू असलेल्या गळीत हंगामात १० एप्रिलपर्यंत अहमदनगर जिल्ह्यात १२७.३८ लाख मेट्रिक टन ऊस गाळप करून १३८.९६ लाख क्विंटल साखर तयार झाली आहे.

अहमदनगर : सन २०१७-१८ च्या सध्या सुरू असलेल्या गळीत हंगामात १० एप्रिलपर्यंत अहमदनगर जिल्ह्यात १२७.३८ लाख मेट्रिक टन ऊस गाळप करून १३८.९६ लाख क्विंटल साखर तयार झाली आहे.यंदाच्या हंगामात जिल्ह्यातील १४ सहकारी व ८ खासगी असे २२ कारखाने सुरू झाले होते. यातील आठ कारखान्यांच्या गळीत हंगामाची सांगता झाली आहे. कर्जतच्या अंबालिका (इंडेकॉन) या खासगी साखर कारखान्याने ऊस गाळप व साखर उत्पादनात जिल्ह्यातील कारखान्यांमध्ये आघाडी घेतली आहे. या कारखान्याने आतापर्यंत १४ लाख १८ हजार ९९० मेट्रिक टन उसाचे गाळप करून १६ लाख ४९ हजार ९०० क्विंटल साखरेचे उत्पादन करीत ११.६३ टक्के सरासरी साखर उतारा मिळविला आहे. सहकारी कारखान्यांमध्ये भेंडा येथील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याने आघाडी घेत ११ लाख ६ हजार ९५५ मेट्रिक टन उसाचे गाळप करून १२ लाख ४३ हजार ८५० क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. त्याखालोखाल संगमनेरच्या थोरात सहकारी कारखान्याने १० लाख ७१ हजार ८० मेट्रिक टन उसाचे गाळप करून १२ लाख १४ हजार २२० क्विंटल साखरेची निर्मिती केली आहे.अहमदनगर जिल्ह्यातील तनपुरे (राहुरी), श्रीगोंदा, कुकडी, श्री क्रांती शुगर (पारनेर), अंबालिका (कर्जत), साईकृपा-१, जय श्रीराम शुगर, पियुश शुगर (संगमनेर) या आठ कारखान्यांच्या गळीत हंगामाची सांगता झाली आहे.विखेचा साखर उतारा सरस; पियुशचा सर्वात कमीप्रवरानगर येथील पद्मश्री डॉ. विखे सहकारी कारखाना सरासरी साखर उताऱ्यात अहमदनगर जिल्ह्यात सरस ठरला आहे. या कारखान्याने ११.७८ टक्के एवढा सर्वाधिक उतारा मिळविला आहे. त्यानंतर अंबालिका कारखान्याचा ११.६३, तनपुरे कारखान्याचा ११.५४, थोरात कारखान्याचा ११.३४, अगस्ती व ज्ञानेश्वरचा ११.२४, गणेशचा ११.१९ टक्के साखर उतारा आहे. संजीवनी, काळे, अशोक, वृद्धेश्वर, मुळा, कुकडी,क्रांती शुगर,गंगामाई, साईकृपा-१,प्रसाद शुगर, युटेक शुगर या कारखान्यांचा साखर उतारा ११ टक्क्यांच्या आत आहे. तर जय श्रीराम शुगर, पियुश, केदारेश्वर या तीन कारखान्यांच्या उतारा १० टक्क्यांच्या आत आहे. पियुष शुगरचा सर्वात कमी ८.७१ टक्के एवढा सरासरी उतारा आहे.

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरSugar factoryसाखर कारखाने