शहरं
Join us  
Trending Stories
1
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
2
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
3
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
4
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
5
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
6
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
7
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
8
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार
9
“धर्म-भाषा काहीही असो, आपण सर्व हिंदू आहोत; ब्रिटिशांनी आपल्यात फूट पाडली”- मोहन भागवत
10
"...तोपर्यंत मी तुरुंगात राहण्यास तयार आहे"; सोनम वांगचुक यांनी जोधपूरहून भावाकडे पाठवला मेसेज
11
INDW vs PAKW: अचानक मैदानात पसरला पांढरा धूर: भारत-पाक सामन्यात नेमकं काय घडलं?
12
IND W vs PAK W : पुरुष असो वा महिला, नो हँडशेक फॉर्म्युला! हरमनप्रीतनं पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ
13
‘’२०२७ चा वर्ल्डकप खेळायला मिळाला तर…’’, बोलता बोलता रोहित झाला होता भावूक, तो व्हिडीओ होतोय व्हायरल  
14
बिहारमध्ये केव्हा होणार विधानसभा निवडणूक? CEC ज्ञानेश कुमार यांची घोषणा; SIR संदर्भातही मोठं विधान
15
गुजरातमधून आणलेला सिंह तामिळनाडूच्या प्राणीसंग्रहालयातून पळाला; स्थानिकांमध्ये घबराट...
16
EMI थकवला तर फोन, लॅपटॉप होणार लॉक! RBI चा नवा नियम; कर्ज वसुलीसाठी बँकांना मिळणार 'हे' अधिकार
17
अनिल परबांचे आरोप, ज्योती रामदास कदम पहिल्यांदाच मीडियासमोर आल्या; आगीची घटना कशी घडली?
18
"केस ओढले, इस्रायलच्या ध्वजाला किस करायला लावलं"; ग्रेटा थनबर्गला अमानुष वागणुकीचा आरोप, प्रकरण काय?
19
अनर्थ टळला! लँडिंगपूर्वी एअर इंडिया विमानाचं RAT एक्टिव्ह; बर्मिघम रनवेवर विमान सुरक्षित उतरवलं
20
देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी खिशात किती कॅश ठेवतात? स्वतःच केला खुलासा

प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेचा बट्ट्याबोळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2019 12:35 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठा गाजावाजा करुन सुरु केलेल्या प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा बट्ट्याबोळ उडाल्याचे चित्र निर्माण झाले आहे़

अहमदनगर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठा गाजावाजा करुन सुरु केलेल्या प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा बट्ट्याबोळ उडाल्याचे चित्र निर्माण झाले आहे़ या योजनेत १ हजार ३४९ आजारांचा समावेश करण्यात आला आहे़ मात्र, उपचारांवरुन बोंबाबोंब आहे़ जिल्ह्यातील एकाही रुग्णालयात या योजनेतून उपचार करण्यात येत नाही़ तसेच योजनेतील लाभार्थ्यांना दिले जाणारे आरोग्य कार्डचे वाटपही रखडले आहे़पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २३ सप्टेंबर २०१८ रोजी आयुष्यमान भारत- प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेचे उद्घाटन केले होते़ या योजनेतून प्रत्येक कुटुंबाला एका वर्षात १ हजार ३४९ आजारांवर ५ लाख रुपयांपर्यंतचे उपचार मोफत देण्याची घोषणा करण्यात आली होती़ तसे आदेशही निघाले़प्रधानमंत्री जन आरोग्य योजना राज्य आरोग्य हमी सोसायटीकडून राबविण्यात येत आहे. २०११ सालच्या जनगणनेनुसार या योजनेत लाभार्थी निवडण्यात आले़ १५ एप्रिल २०१८ ते ८ मे २०१८ या काळात ग्रामीण विभागात तसेच १८ मे २०१८ ते १४ जून २०१८ या काळात शहरी विभागातील लाभार्थ्यांची माहिती संकलीत करण्यात आली असून, त्यात मोबाईल क्रमांक, रेशन कार्ड क्रमांक, कुटुंबाच्या आर्थिक स्थितीची माहिती संकलीत करण्यात आल्याचे सांगण्यात आले़या योजनेच्या लाभासाठी आरोग्य कार्ड वाटप करण्यात येत आहे़ शहरी भागात जिल्हा रुग्णालयातून तर ग्रामीण भागातून सेतू केंद्रांमधून हे कार्ड वाटप करण्यात येत आहे़ सेतू केंद्राकडून एका कार्डसाठी ३० रुपये आकारण्यात येत आहेत़ मात्र, सध्या हे कार्ड वाटप रखडले आहे़अवघ्या ६ टक्के कार्डचे वाटपच्नगर जिल्ह्यात प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेत ३ लाख २० हजार ४६१ कुटुंबांचा समावेश करण्यात आला आहे़ जिल्हा शासकीय रुग्णालयासह इतर २४ खासगी रुग्णालयांतून या योजनेतील लाभार्थ्यांवर मोफत उपचार करण्यात येतात़ या उपचारांवरील ६० टक्के खर्च केंद्र सरकार व ४० टक्के खर्च राज्य सरकार भरणार आहे़ या योजनेचा लाभ घेण्यासाठी कार्ड वाटप सुरु आहे़ जिल्हा रुग्णालयातून ४ हजार ५२ तर सेतू केंद्रांमधून १७ हजार ८४६ असे एकूण २१ हजार ८९६ कार्डचे वाटप करण्यात आले आहे़ मात्र, हे प्रमाण अवघे ६़८६ टक्के आहे़अवघ्या १२ रुग्णांना लाभच्लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाल्यापासून या योजनेचे काम पूर्णपणे थांबविण्यात आले होते़ आचारसंहिता संपल्यानंतरही अद्याप या योजनेचे काम पुन्हा सुरु झालेले नाही़ कार्ड वाटप पूर्ण झाले नाही़ तसेच योजनेची माहितीही लोकांपर्यंत पोहोचलेली नाही़ त्याशिवाय जिल्हा रुग्णालय वगळता इतर २४ रुग्णालयांमध्ये या योजनेतून उपचार केले जात नाहीत़ त्यामुळे या योजनेतून केवळ १२ रुग्णांवर उपचार केल्याची माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली़

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar collector officeअहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय