शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

अहमदनगर : श्रीरामपूर तालुक्यात कडकडीत बंद, जिल्हा मुख्यालयाची मागणी

By शिवाजी पवार | Updated: June 17, 2023 12:14 IST

शिर्डीतील अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयास विरोध

श्रीरामपूर (अहमदनगर) : राज्य सरकारने शिर्डी येथे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय मंजूर केल्यामुळे त्याविरुद्ध श्रीरामपूर शहर व तालुक्यात शनिवारी कडकडीत बंद पाळण्यात आला. नियोजित जिल्हा मुख्यालयासाठी श्रीरामपूर शहर हेच योग्य असल्यामुळे शिर्डीतील कार्यालय श्रीरामपूरला हलवण्याची तालुक्यातील नागरिकांची मागणी आहे.

शनिवारच्या बंदमध्ये सर्वपक्षीय नेते व कार्यकर्ते सहभागी झाले होते. श्रीरामपूर शहरातील मर्चंट असोसिएशनने बंदमध्ये सहभाग घेतल्यामुळे सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली. शहरात सकाळी मोटरसायकल रॅली  काढण्यात आली. ग्रामीण भागामध्येही बंद पाळण्यात आला. टाकळीभान, वडाळा महादेव, बेलापूर, उंदिरगाव येथेही कडकडीत बंद पाळण्यात आला. बंदमुळे व्यवहार ठप्प झाले.

गेल्या अनेक वर्षांपासून नगर जिल्ह्याचे विभाजन करून श्रीरामपूरला नवे मुख्यालय करण्याची मागणी आहे. यासाठी वेळोवेळी सरकार दरबारी पाठपुरावा करण्यात आला होता. जिल्हा मुख्यालयासाठी आवश्यक सर्व सरकारी कार्यालय येथे कार्यरत आहेत. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय, अतिरिक्त पोलिस अधीक्षक कार्यालय, पासपोर्ट कार्यालय, जिल्हा न्यायालय यांची यापूर्वीच येथे स्थापना केली गेली. त्यामुळे भविष्यातील मुख्यालयाचे ठिकाण म्हणून श्रीरामपूरकडे पाहिले जात होते.

मात्र मंत्रिमंडळांनी नुकतेच शिर्डी येथे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय मंजूर केले. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांनी त्याकरिता पाठपुरावा केला. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे श्रीरामपूरच्या जिल्हा मुख्यालयाच्या मागणीला धक्का बसला आहे. त्यामुळे श्रीरामपूर तालुक्यातून रोष व्यक्त होत आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर