शहरं
Join us  
Trending Stories
1
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
2
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
3
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
4
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
5
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
6
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
7
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
8
BCCIचे अध्यक्ष झालेले मिथुन मन्हास आहेत कोण? कधी वीरू-युवीच्या नेतृत्वाखाली खेळले, असा आहे रेकॉर्ड
9
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
10
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
11
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
12
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा
13
प्रणितकडे इशारा करत वरुण धवन म्हणाला, 'इसने मेरा भी मजाक उडाया है!', कॉमेडियन म्हणतो...
14
आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा मोठा धक्का! 'या' कंपनीने ११,००० हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं
15
बीसीसीआयला मिळाला नवा अध्यक्ष, या माजी क्रिकेटपटूच्या नावावर झालं शिक्कामोर्तब
16
एस जयशंकर यांच्या संयुक्त राष्ट्रातील भाषणावर पाकिस्तान प्रतिक्रिया देऊन फसले; स्वतःला दहशतवादाचे अड्डे मानले
17
पाकिस्तानच्या नकवींचा कांगावा! म्हणे, इस्त्रायलने आमच्या ऑईल टँकरवर हल्ला केला, नंतर हुतींनी कब्जा केला
18
डोंबिवलीत त्या तरुणाने ११ व्या मजल्यावरुन उडी का मारली; धक्कादायक कारण आले समोर
19
'फुलवंती'सारखंच खऱ्या आयुष्यातही नकळत दुसऱ्या महिलेच्या प्रेमात पडलास तर? गश्मीर म्हणाला...
20
दिवाळीत बाइक खरेदीचा विचार करताय? ८०,००० रुपयांच्या बजेटमधील टॉप ५ पर्याय पाहा!

अगस्ती कारखान्यावरील मळभ दूर! संचालकांचे राजीनामे नामंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:15 IST

संचालकांनी दिलेले राजीनामे मंजूर केले नाहीत व अगस्ती गळीत हंगाम सुरू करण्यास अडचण येणार नाही असे कारखान्याचे उपाध्यक्ष ...

संचालकांनी दिलेले राजीनामे मंजूर केले नाहीत व अगस्ती गळीत हंगाम सुरू करण्यास अडचण येणार नाही असे कारखान्याचे उपाध्यक्ष सीताराम गायकर यांनी सांगितले.

अगस्ती साखर कारखाना कार्यस्थळी बुधवारी पत्रकार परिषद घेऊन संचालकांचे राजीनामे नामंजूर केल्याची घोषणा त्यांनी केली.

यावेळी संचालक प्रकाश मालुंजकर, मीनानाथ पांडे, गुलाब शेवाळे, रामनाथ वाकचौरे, कचरू पाटील शेेेटे, अशोक देशमुख, महेश नवले, सुनील दातीर, अशोक आरोटे, मच्छिंद्र धुमाळ, भीमसेन ताजणे, दिलीप मंडलिक उपस्थित होते.

अगस्ती साखर कारखान्याच्या आर्थिक परिस्थितीची उलटसुलट चर्चा व संचालकांचे राजीनामे यातून गळीत हंगाम पूर्व तयारीच्या अनुषंगाने मळभ तयार झाले होते.

रविवारी आमदार डाॅ. लहामटे, डाॅ. अजित नवले यांच्या पुढाकाराने दशरथ सावंत, बी. जे. देशमुख, कॉम्रेड कारभारी उगले, विनय सावंत यांच्यात बैठक होऊन अगस्ती साखर कारखान्याबाबत तीन महिने काही बोलायचे नाही, असा सकारात्मक निर्णय झाला, या निर्णयाचे उपाध्यक्ष गायकर यांनी स्वागत केले.

आमदार लहामटे व ज्येष्ठ नेते भांगरे यांनी तालुक्याच्या दृष्टीने उपमुख्यमंत्री व संचालक मंडळाची सकारात्मक चर्चा घडवून आणल्याने कारखाना चालवण्यासाठी अडचणी तूर्त कमी झाल्या आहेत. आता संचालक स्वतःच्या मालमत्तेवर बोजा चढवून कारखान्यासाठी पतसंस्थेकडून कर्ज उभारणी करणार आहे. ऊस तोडणी कामगार व वाहतूकदार यांचे देणे व त्यांना द्यावी लागणारी उचल हा प्रश्न मिटणार असल्याचे गायकर यांनी सांगितले.

महसूल मंत्री बाळासाहेब थोरात हे देखील अगस्तीला मदत करणार आहेत.

..............

अगस्तीचा साखर उतारा जिल्ह्यात पहिल्या क्रमांकावर असलेल्या एफआरपी प्रमाणे जिल्ह्यात सर्वात अधिक ऊस पेमेंट देणारा हा कारखाना ठरला आहे. ऊस उत्पादकांना २,२५० रूपये प्रती टन प्रमाणे पैसे अदा केले आहे. उर्वरित २०० रुपये दिवाळी पूर्वी दिले जाणार आहे. कारखाना गळीत हंगाम वेळेत सुुुरळीत सुरू होईल.

- सीताराम गायकर, उपााध्यक्ष