शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
4
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
5
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
6
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
7
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
8
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
9
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
10
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
11
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
12
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
13
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
14
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
15
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
16
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
17
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
18
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
19
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
20
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...

शेतक-यांच्या शेतावर बियाणे देणार-कृषिमंत्री दादा भुसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2020 12:14 IST

महाराष्ट्रात खरीप हंगामाची तयारी कृषी विभागाने केली आहे. खरीप हंगामासाठी लागणारी खते व बियाणे पुरेशा प्रमाणात आहेत. शेतकरी बांधवांनी कमी लागवड खर्चात जास्तीत जास्त दर्जेदार शेतमालाची निर्मिती करावी. शेतक-यांच्या शेतावर बियाणे उपलब्ध करुन देणार आहोत, असे मत कृषिमंत्री दादा भुसे यांनी व्यक्त केले. 

राहुरी : महाराष्ट्रात खरीप हंगामाची तयारी कृषी विभागाने केली आहे. खरीप हंगामासाठी लागणारी खते व बियाणे पुरेशा प्रमाणात आहेत. शेतकरी बांधवांनी कमी लागवड खर्चात जास्तीत जास्त दर्जेदार शेतमालाची निर्मिती करावी. शेतक-यांच्या शेतावर बियाणे उपलब्ध करुन देणार आहोत, असे मत कृषिमंत्री दादा भुसे यांनी व्यक्त केले. महात्मा फुले कृषी विद्यापीठात आॅॅनलाईन खरीप पीक परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. शुक्रवारी परिसंवादाच्या समारोपप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून भुसे बोलत होते. अध्यक्षस्थानी महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. के. पी. विश्वनाथा होते.  भुसे म्हणाले, गाव शिवारातील ओढे, नदी, नाले यावर बंधारे बांधण्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेणार आहे. भाडेतत्वावर वापरण्यासाठी प्रत्येक गावासाठी ट्रॅक्टर देण्यात येईल. शेततळ्याच्या अस्तरीकरणासंबंधी लवकरच निर्णय घेऊ. येत्या १० दिवसात ऊर्जा विभागाचे नवीन धोरण येत आहे. त्यामध्ये प्रत्येक शेतक-याला सौरपंप पुरविण्यासंबंधी निर्णय घेऊ. यावेळी डॉ. सुहास दिवसे, विश्वजीत माने यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या आॅनलाईन खरीप पीक परिसंवादाच्या समारोपाच्या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक डॉ. शरद गडाख यांनी केले. विवेक माने, प्रमोद पाटील या शेतक-यांनी मनोगत व्यक्त केले. दोन दिवसीय परिसंवादात राज्यातून ५०० पेक्षा जास्त शेतकरी, कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञ, कृषी विभागातील अधिकारी आॅनलाईन सहभागी झाले होते. समन्वयक म्हणून डॉ. बाबासाहेब माळी, डॉ. सचिन सदाफळ, डॉ. भगवान देशमुख, डॉ. संग्राम काळे व प्रा. अन्सार अत्तार यांनी काम पाहिले़

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRahuriराहुरीministerमंत्री