शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

युवकांना कृषी रोजगाराची दिशा

By admin | Updated: March 20, 2016 00:48 IST

लोणी : देशामध्ये मेक इन इंडिया, राज्यात मेक इन महाराष्ट्र सुरू असतानाच कृषी क्षेत्रातून देखील मोठा उद्योग उभा राहून शेतकरी समृद्ध होऊ शकतो,

लोणी : देशामध्ये मेक इन इंडिया, राज्यात मेक इन महाराष्ट्र सुरू असतानाच कृषी क्षेत्रातून देखील मोठा उद्योग उभा राहून शेतकरी समृद्ध होऊ शकतो, हाच संदेश बाभळेश्वरच्या कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने संपन्न झालेल्या कृषी उद्योजकता परिषदेत शेतकऱ्यांना देण्यात आला.बाभळेश्वर (ता. राहाता) येथील कृषी विज्ञान केंद्रात राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांच्या मार्गदर्शनाखाली व माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के यांच्या उपस्थितीत कृषी उद्योजकता परिषद आणि यूथ किसान मंच हा आगळावेगळा कार्यक्रम नुकताच संपन्न झाला. केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. भास्कर गायकवाड यांच्या संकल्पनेतून शेतीपूरक व्यवसायास चालना मिळावी म्हणून मागील दोन वर्षापासून शेळीपालन, दुग्धोत्पादन, गांडूळ खत, कोंबडीपालन यासह फळ प्रक्रिया, अ‍ॅग्री क्लिनिक्स अ‍ॅग्री बिझनेस अशा १० ते १५ विषयांचे प्रशिक्षण दिले जाते. आजपर्यंत केंद्रामार्फत दोन ते अडीच हजार युवकांना प्रशिक्षण देण्यात आले. यातून मोठा स्वयंरोजगार निर्माण झाला. याच युवकांना आपल्या व्यवसायात दिशा देण्यासाठी शनिवारी संपन्न झालेली कृषी उद्योजकता परिषद दिशादर्शक आणि ‘मेक इन कृषी’ साठी महाजागरच ठरली आहे.ग्रामीण युवक-युवतींना त्यांच्या गरजेनुसार प्रशिक्षित करतानाच बँक अर्थसहाय्य, मार्केटिंग प्रकल्प आराखडा आदी विषयाचे ज्ञान दिले. याशिवाय शेळीपालन, कुक्कुटपालन यासाठी नवीन जाती, गांडूळ खत, फळबाग छाटणी तंत्र, दुग्ध व्यवसायातील नवे तंत्रज्ञान देण्यात आले.जमुना पारी, शिरोही, बोर आदी शेळ्यांच्या नव्या जाती या उद्योजकांनी आणून हा व्यवसाय समृद्ध देखील केला आहे. राज्यात कृषी उद्योगास मोठी संधी असून, याकडे जाणीवपूर्वक आणि युवकांनी उद्योग म्हणून पाहण्याची गरज आहे. याला आर्थिक पाठबळ आणि शासनाची मदत मिळण्याबरोबरच शेतकऱ्यांच्या व्यवसायास प्रतिष्ठा देण्याचा सूर देखील परिषदेत व्यक्त झाला.कृषी उद्योजकतानिमित्त तांत्रिक सत्रामध्ये एकाच वेळी पाच ठिकाणी शेळीपालन, दुग्धोत्पादन, शेडनेट पॉलिहाऊसमध्ये भाजीपाला लागवड व विक्री, कृषी उद्योजकता व्यक्तिमत्त्व, गांडूळ खत, स्पिरूलिना यावर परिसंवाद झाले. यानिमित्त कृषिपूरक व्यवसायाचे प्रदर्शन देखील ठेवण्यात आले होते. (वार्ताहर)कृषी क्षेत्रात युवकांचा सहभाग महत्त्वपूर्ण आहे. तसे झाले तर कृषी क्षेत्रात दिशादर्शक काम उभे राहू शकते, हाच उद्देश ठेवून केंद्राकडून यूथ किसान क्लबची स्थापना करण्यात आली. प्रायोगिक तत्त्वावर १०० गावांमधून २०० युवकांचे हे संघटन नव्या तंत्रज्ञानाचा प्रचार-प्रसार करणार असून, यामध्ये दहावीपासून पीएच.डी. पर्यंतच्या युवा शेतकऱ्यांचा सहभाग आहे. यातून शेतीचा शाश्वत विकास होण्यास मदत होणार आहे.- डॉ. भास्कर गायकवाड, प्रमुख शास्त्रज्ज्ञ, कृषी विज्ञान केंद्र----------------------------------------------------ग्राहक बदलत आहे. शेळीपालन, दुग्धव्यवसाय यात मोठी संधी आहे. ती शोधण्याची गरज आहे. सेंद्रिय दूध, सेंद्रीय मटन ही संकल्पना पुढे येत आहे. पशुपालन करताना नव्या तंत्रज्ञानाच्या वापराकडे लक्ष देण्याची गरज आहे.- डॉ. नितीन मार्केंडेय