शहरं
Join us  
Trending Stories
1
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
2
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
3
'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
4
शिक्षिकेचा जडला महिला मुख्याध्यापकावर जीव, प्रेम मिळवण्यासाठी AI टूल्स वापरून रचला भयानक खेळ
5
बाहेर ‘झटपट कॉम्प्युटर शिका’ची पाटी, आत वेगळाच खेळ, सापडल्या ९ तरुणी, ४ पुरुष आणि...
6
परी म्हणू की सुंदरा... Gemini Prompt ने 'असा' करा ९० च्या दशकातील 'रेट्रो साडी लूक'
7
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...
8
गृहकर्ज घेताय? जाणून घ्या ५० लाखांच्या कर्जावर कोणत्या बँकेत सर्वात कमी ईएमआय
9
पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास देशातून तीव्र विरोध, टीम इंडिया दबावात, ड्रेसिंग रूममधून आली अशी बातमी
10
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
11
हरमनप्रीत कौरनं रचला इतिहास; आता 'या' दिग्गज खेळाडूंसोबत घेतलं जाईल नाव!
12
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
13
BMW ने कार आणि बाईक्सच्या किमतीत केली मोठी कपात; तब्बल ₹१३.६ लाखांची होणार बचत...
14
सोन्याची विक्रमी झेप! आठवड्यात ३,३०० रुपयांनी महागले; चांदीचाही नवा उच्चांक, आजचा दर काय?
15
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
16
Sushila Karki: 'आम्ही सत्तेचा आस्वाद घेण्यासाठी आलेलो नाही, ६ महिन्यांतच...' पंतप्रधान सुशीला कार्की 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये!
17
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
18
तुमचे LPG गॅस सिलेंडरचे अनुदान बंद झाले? घरबसल्या मोबाईलवरुन करता येईल सुरू
19
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
20
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?

पुन्हा पुन्हा आंदोलनाची वेळ, हा सरकारचा कमीपणा : अण्णा हजारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2018 19:42 IST

शेतकऱ्यांच्या शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित हमी भाव देणे, लोकपाल व लोकायुक्तांची नियुक्ती या प्रश्नांवर पुन्हा पुन्हा आंदोलन करण्याची वेळ आपणावर व जनतेवर यावी हा केंद्र सरकारचा कमीपणा असल्याची टीका ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी बुधवारी ‘लोकमत’शी बोलताना केली.

राळेगण सिद्धी : शेतकऱ्यांच्या शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित हमी भाव देणे, लोकपाल व लोकायुक्तांची नियुक्ती या प्रश्नांवर पुन्हा पुन्हा आंदोलन करण्याची वेळ आपणावर व जनतेवर यावी हा केंद्र सरकारचा कमीपणा असल्याची टीका ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी बुधवारी ‘लोकमत’शी बोलताना केली.महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून २ आॅक्टोबरपासून विविध मागण्यांसाठी राळेगणसिद्धी येथे आंदोलन करण्याचे हजारे यांनी जाहीर केले आहे. या पार्श्वभूमिवर ते म्हणाले, देशाच्या प्रगतीसाठी विकासकामांची गरज आहे. परंतु, भ्रष्टाचारामुळे विकासाला गळती लागली आहे. विकासकामे करणे व भ्रष्टाचार रोखणे ही दोन्ही कामे केल्याशिवाय समाज व देशाला उज्ज्वल भविष्य मिळणार नाही. स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी व लोकपाल-लोकायुक्त नियुक्तीचे आश्वासन देणारांना सत्तेवर आल्यानंतर गेल्या चार वर्षांमध्ये आश्वासनांचा विसर पडला. जनतेला दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करून देशहिताचे प्रश्न सोडविणे हे सरकारचे कर्तव्य आहे. त्यासाठी २३ मार्च या शहीद दिनापासून नवी दिल्लीत उपोषण केले. तेव्हा केंद्र सरकारने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत दिलेल्या लेखी आश्वासनाची अजूनपर्यंत पूर्तता झाली नाही. गांधी जयंतीपर्यंत पूर्तता न झाल्यास पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा तेव्हाच दिला होता. गेल्या ५ महिन्यात आश्वासन पूर्तीसाठी सरकारकडून कोणतीही कार्यवाही केली नाही. विविध कारणे देऊन सरकारने लोकपाल व लोकायुक्त नियुक्तीबाबत वेळकाढूपणाचे धोरण चालविले आहे. सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला फटकारले असतानाही सरकारकडून कार्यवाही होत नाही.

राळेगणसिद्धी येथे गर्दी न करता कार्यकर्त्यांनी आपापल्या गावात, तहसील कार्यालयासमोर, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अहिंसात्मक व शांततेच्या मार्गाने आंदोलन करावे. या आंदोलनाची माहिती राष्ट्रपती व पंतप्रधान यांना पत्राद्वारे किंवा इ मेलने द्यावी. माहिती अधिकाराच्या कायद्यासाठी आठ वर्षे संघर्ष करावा लागला. त्याचा फायदा सर्वसामान्य जनतेला मिळू लागला आहे. लोकपाल-लोकायुक्त कायद्यासाठीही मागील सरकारशी मोठा संघर्ष करावा लागला. आता त्याची अंमलबजावणी व्हावी म्हणून सरकारशी संघर्ष सुरू आहे. लोकपाल-लोकायुक्त नियुक्तीमुळे सर्वच भ्रष्टाचार संपेल, असा माझा दावा नाही. परंतु, भ्रष्टाचाराला मोठ्या प्रमाणात आळा बसून सर्वसामान्य माणसाला न्याय मिळेल याची खात्री आहे. --अण्णा हजारे, ज्येष्ठ समाजसेवक.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरanna hazareअण्णा हजारे