शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
2
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
3
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
4
एका वर्षात तिसरी वेळ! भारताच्या शेजारी देशात सापडली तब्बल १००० टन सोन्याची खाण, कोणता आहे देश?
5
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज कराडात! सातारा जिल्ह्यामधील महाविकास आघाडी बाबत होणार निर्णय?
6
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
7
दिल्ली ब्लास्ट प्रकरण : आता पठानकोटमधून आणखी एका डॉक्टरला अटक, अल-फलाह विद्यापीठात केली होती नोकरी
8
IPL 2026 : अय्यरसह मसल पॉवर रसेल OUT! मिनी लिलावासाठी शाहरुखच्या KKR च्या पर्समध्ये सर्वाधिक पैसा
9
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
10
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
11
जी मोटारसायकल चोरली, तिच्यावरच गेला जीव; मिरज रोडवर चोर ठार, कसा घडला अपघात?
12
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
13
चुकूनही करू नका 'हे' काम, क्षणार्धात तुमचा मोबाईल फोन होऊ शकतो हॅक! गुगलने काय इशारा दिला?
14
नोकरी सोडून आयपीएस अधिकारी उतरले बिहार निवडणुकीच्या मैदानात; मराठमोळ्या लांडेंना किती मिळाली मते?
15
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
16
मशिदीचा पत्ता, मोबाइल SIM, थायलंड टूर अन्...! डॉ. शाहीन संदर्भात मोठा खुलासा; डॉ परवेझला कशासाठी नेलं होतं कानपूरला?
17
दिल्ली स्फोटापूर्वी उमर घाबरला होता, नवीन सीसीटीव्हीमध्ये खुलासा, दोन्ही फोन कुठे लपवले?
18
Ravindra Jadeja : जड्डूनं केली विक्रमांची 'बरसात'! WTC मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला
19
Travel : नवीन वर्ष परदेशात सेलिब्रेट करायचा विचार करताय? 'या' देशांमध्ये होऊ शकते खिशाला परवडणारी ट्रीप!
20
'भाजपाला फायदा करून देण्याची सुपारी घेतलीय का?'; काँग्रेसच्या स्वबळाच्या निर्णयावर शरद पवार गट नाराज
Daily Top 2Weekly Top 5

पुन्हा पुन्हा आंदोलनाची वेळ, हा सरकारचा कमीपणा : अण्णा हजारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2018 19:42 IST

शेतकऱ्यांच्या शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित हमी भाव देणे, लोकपाल व लोकायुक्तांची नियुक्ती या प्रश्नांवर पुन्हा पुन्हा आंदोलन करण्याची वेळ आपणावर व जनतेवर यावी हा केंद्र सरकारचा कमीपणा असल्याची टीका ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी बुधवारी ‘लोकमत’शी बोलताना केली.

राळेगण सिद्धी : शेतकऱ्यांच्या शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित हमी भाव देणे, लोकपाल व लोकायुक्तांची नियुक्ती या प्रश्नांवर पुन्हा पुन्हा आंदोलन करण्याची वेळ आपणावर व जनतेवर यावी हा केंद्र सरकारचा कमीपणा असल्याची टीका ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी बुधवारी ‘लोकमत’शी बोलताना केली.महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून २ आॅक्टोबरपासून विविध मागण्यांसाठी राळेगणसिद्धी येथे आंदोलन करण्याचे हजारे यांनी जाहीर केले आहे. या पार्श्वभूमिवर ते म्हणाले, देशाच्या प्रगतीसाठी विकासकामांची गरज आहे. परंतु, भ्रष्टाचारामुळे विकासाला गळती लागली आहे. विकासकामे करणे व भ्रष्टाचार रोखणे ही दोन्ही कामे केल्याशिवाय समाज व देशाला उज्ज्वल भविष्य मिळणार नाही. स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी व लोकपाल-लोकायुक्त नियुक्तीचे आश्वासन देणारांना सत्तेवर आल्यानंतर गेल्या चार वर्षांमध्ये आश्वासनांचा विसर पडला. जनतेला दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करून देशहिताचे प्रश्न सोडविणे हे सरकारचे कर्तव्य आहे. त्यासाठी २३ मार्च या शहीद दिनापासून नवी दिल्लीत उपोषण केले. तेव्हा केंद्र सरकारने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत दिलेल्या लेखी आश्वासनाची अजूनपर्यंत पूर्तता झाली नाही. गांधी जयंतीपर्यंत पूर्तता न झाल्यास पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा तेव्हाच दिला होता. गेल्या ५ महिन्यात आश्वासन पूर्तीसाठी सरकारकडून कोणतीही कार्यवाही केली नाही. विविध कारणे देऊन सरकारने लोकपाल व लोकायुक्त नियुक्तीबाबत वेळकाढूपणाचे धोरण चालविले आहे. सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला फटकारले असतानाही सरकारकडून कार्यवाही होत नाही.

राळेगणसिद्धी येथे गर्दी न करता कार्यकर्त्यांनी आपापल्या गावात, तहसील कार्यालयासमोर, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अहिंसात्मक व शांततेच्या मार्गाने आंदोलन करावे. या आंदोलनाची माहिती राष्ट्रपती व पंतप्रधान यांना पत्राद्वारे किंवा इ मेलने द्यावी. माहिती अधिकाराच्या कायद्यासाठी आठ वर्षे संघर्ष करावा लागला. त्याचा फायदा सर्वसामान्य जनतेला मिळू लागला आहे. लोकपाल-लोकायुक्त कायद्यासाठीही मागील सरकारशी मोठा संघर्ष करावा लागला. आता त्याची अंमलबजावणी व्हावी म्हणून सरकारशी संघर्ष सुरू आहे. लोकपाल-लोकायुक्त नियुक्तीमुळे सर्वच भ्रष्टाचार संपेल, असा माझा दावा नाही. परंतु, भ्रष्टाचाराला मोठ्या प्रमाणात आळा बसून सर्वसामान्य माणसाला न्याय मिळेल याची खात्री आहे. --अण्णा हजारे, ज्येष्ठ समाजसेवक.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरanna hazareअण्णा हजारे