शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
6
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
7
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
8
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
9
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
10
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
11
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
12
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
13
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
14
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
15
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
16
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
17
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
18
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
19
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
20
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ

सोळा वर्षानंतर कुटुंबावर पुन्हा काळाचा घाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2018 18:42 IST

अकोले तालुक्यातील चितळवेढे येथील कुलकर्णी कुटुंबावर सोळा वर्षानंतर पुन्हा एकदा काळाने घाला घातला.. याच कुटुबांतील दोन मुले व एक मुलगी १६ वषार्पूर्वी झालेल्या अपघात मृत्यूमुखी पडली होती.

ठळक मुद्देनाशिकमधील बस अपघात : कुलकर्णी कुटुंबावर शोककळ

राजूर : अकोले तालुक्यातील चितळवेढे येथील कुलकर्णी कुटुंबावर सोळा वर्षानंतर पुन्हा एकदा काळाने घाला घातला. याच कुटुबांतील दोन मुले व एक मुलगी १६ वषार्पूर्वी झालेल्या अपघात मृत्यूमुखी पडली होती. या अपघातात नशिबाने वाचलेले दिपक प्रभाकर कुलकर्णी तर मंगळवारी ( ४ संप्टेबर) नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यातील भाबडबारी जवळ बस व ट्रक यांच्यात समोरासमोर झालेल्या भीषण अपघातात (३९) ठार झाले. यामुळे या कुटुंबाचा आधारच संपुष्टात आला.या वृत्ताने चितळवेढे गावाबरोबरच परिसरातील गावांमधून हळहळ व्यक्त होत आहे.गेल्या दोन तीन पिढ्यांपासून कुळकर्णी कुटुंब चितळवेढे व परिसरातील गावांमध्ये भिक्षुकी करून गुजराण करत होते. पुढे प्रभाकर कुलकर्णी यांनी भिक्षुकी सुरु केली. लग्नानंतर या कुटुंबाला तीन मुले आणि एक मुलगी झाली. एक प्रामाणिक कुटुंब म्हणून परिसरात या कुटुंबाची ख्याती होती. मुले मोठी होऊ लागली, शालेय शिक्षण घेऊ लागली. सुखी संसाराचे दिवस सुरु झाले. मात्र नियतीच्या मनात वेगळच होत. सुमारे १६ वर्षा पूर्वी या कुटुंबातील मोठी मुलगी, दोन मुले व जावई, नातू देवदर्शनासाठी शनिशिंगणापूर-शिर्डी येथे गेले होते. त्यावेळी वाहनाच्या झालेल्या भीषण अपघातात दोन मुले व त्यांची मुलगी ठार झाली. दिपकही या प्रवासास जाणार होता मात्र ऐनवेळी तो गेला नाही. कमावती झालेली मुले काळाच्या पडद्याआड गेली आणि प्रभाकर कुलकर्णी यांनी पुन्हा भिक्षुकी सुरू केली. पुढे दीपक मोठा झाला. वेद मंत्र शिकला आणि परिसरात एक चांगला ब्राम्हण म्हणून त्यांनी नाव मिळविले. कुटुंबातील कर्ते मुले गेल्याचे दु:ख पचवत मोठ्या धक्क्यातून हे कुटुंब पुन्हा एकदा उभे राहिले. पुढे दिपकचे लग्न झाले. त्याला दोन मुले झाली. एक मुलगा त्रंबकेश्वर येथे वेद विद्या शिकत आहे तर दुसरा शालेय शिक्षण घेत आहे. दीपक पूजे निमित्ताने गावोगावी फिरू लागले. असाच प्रवास करताना आज मंगळवारी दुपारी नंदुरबारहून नाशिककडे येणा-या एस टी बसने प्रवास करत असताना त्यांच्यावर काळाने घाला घातला. आणि ते प्रवास करत असलेल्या बसचा तालुक्यातील भाबडबारीत येथे बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. या अपघातात अपघातात दिपक यांचा दुदैर्वी मृत्यू झाला. बसमधील आणखी ४ जणांचा मृत्यू झाला असून अनेक प्रवासी गंभीर जखमी आहेत.उतारवयात मोठे धक्के पचवत सावरत असलेल्या या कुटुंबावर पुन्हा एकदा दु:खाचा डोंगर कोसळला. दीपक यांच्या अपघाती निधनाचे वृत्त समजताच चितळवेढे सह परिसरातील गावांवर शोककळा पसरली. मयत दिपकच्या मागे वृद्ध आई, वडील, पत्नी व दोन मुले असा परिवार आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरAkoleअकोलेNashikनाशिक