शहरं
Join us  
Trending Stories
1
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
2
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
3
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
4
सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात 'तारा'चा भीमपराक्रम! मगरींच्या विळख्यात दीड किमी पोहून वारणा धरण केले पार
5
बॉक्सर नीरजनं विचालं, कसे आहात? पंतप्रथान मोदींनी उत्तर दिलं, तुझ्यासारखाच...!; VIDEO व्हायरल
6
KTM Duke: केटीएम ड्यूक १६० आता आणखी पॉवरफुल! ग्राहकांना मिळणार नवीन अपडेट्स
7
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
8
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
9
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
10
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
11
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
12
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
13
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
14
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
15
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
16
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
17
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
18
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
19
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
20
‘मी स्नेहाची हत्या केलेली नाही…’, पँटवर लिहून प्रियकरानं संपवलं जीवन, पोलिसांवर गंभीर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

सोळा वर्षानंतर कुटुंबावर पुन्हा काळाचा घाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2018 18:42 IST

अकोले तालुक्यातील चितळवेढे येथील कुलकर्णी कुटुंबावर सोळा वर्षानंतर पुन्हा एकदा काळाने घाला घातला.. याच कुटुबांतील दोन मुले व एक मुलगी १६ वषार्पूर्वी झालेल्या अपघात मृत्यूमुखी पडली होती.

ठळक मुद्देनाशिकमधील बस अपघात : कुलकर्णी कुटुंबावर शोककळ

राजूर : अकोले तालुक्यातील चितळवेढे येथील कुलकर्णी कुटुंबावर सोळा वर्षानंतर पुन्हा एकदा काळाने घाला घातला. याच कुटुबांतील दोन मुले व एक मुलगी १६ वषार्पूर्वी झालेल्या अपघात मृत्यूमुखी पडली होती. या अपघातात नशिबाने वाचलेले दिपक प्रभाकर कुलकर्णी तर मंगळवारी ( ४ संप्टेबर) नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यातील भाबडबारी जवळ बस व ट्रक यांच्यात समोरासमोर झालेल्या भीषण अपघातात (३९) ठार झाले. यामुळे या कुटुंबाचा आधारच संपुष्टात आला.या वृत्ताने चितळवेढे गावाबरोबरच परिसरातील गावांमधून हळहळ व्यक्त होत आहे.गेल्या दोन तीन पिढ्यांपासून कुळकर्णी कुटुंब चितळवेढे व परिसरातील गावांमध्ये भिक्षुकी करून गुजराण करत होते. पुढे प्रभाकर कुलकर्णी यांनी भिक्षुकी सुरु केली. लग्नानंतर या कुटुंबाला तीन मुले आणि एक मुलगी झाली. एक प्रामाणिक कुटुंब म्हणून परिसरात या कुटुंबाची ख्याती होती. मुले मोठी होऊ लागली, शालेय शिक्षण घेऊ लागली. सुखी संसाराचे दिवस सुरु झाले. मात्र नियतीच्या मनात वेगळच होत. सुमारे १६ वर्षा पूर्वी या कुटुंबातील मोठी मुलगी, दोन मुले व जावई, नातू देवदर्शनासाठी शनिशिंगणापूर-शिर्डी येथे गेले होते. त्यावेळी वाहनाच्या झालेल्या भीषण अपघातात दोन मुले व त्यांची मुलगी ठार झाली. दिपकही या प्रवासास जाणार होता मात्र ऐनवेळी तो गेला नाही. कमावती झालेली मुले काळाच्या पडद्याआड गेली आणि प्रभाकर कुलकर्णी यांनी पुन्हा भिक्षुकी सुरू केली. पुढे दीपक मोठा झाला. वेद मंत्र शिकला आणि परिसरात एक चांगला ब्राम्हण म्हणून त्यांनी नाव मिळविले. कुटुंबातील कर्ते मुले गेल्याचे दु:ख पचवत मोठ्या धक्क्यातून हे कुटुंब पुन्हा एकदा उभे राहिले. पुढे दिपकचे लग्न झाले. त्याला दोन मुले झाली. एक मुलगा त्रंबकेश्वर येथे वेद विद्या शिकत आहे तर दुसरा शालेय शिक्षण घेत आहे. दीपक पूजे निमित्ताने गावोगावी फिरू लागले. असाच प्रवास करताना आज मंगळवारी दुपारी नंदुरबारहून नाशिककडे येणा-या एस टी बसने प्रवास करत असताना त्यांच्यावर काळाने घाला घातला. आणि ते प्रवास करत असलेल्या बसचा तालुक्यातील भाबडबारीत येथे बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. या अपघातात अपघातात दिपक यांचा दुदैर्वी मृत्यू झाला. बसमधील आणखी ४ जणांचा मृत्यू झाला असून अनेक प्रवासी गंभीर जखमी आहेत.उतारवयात मोठे धक्के पचवत सावरत असलेल्या या कुटुंबावर पुन्हा एकदा दु:खाचा डोंगर कोसळला. दीपक यांच्या अपघाती निधनाचे वृत्त समजताच चितळवेढे सह परिसरातील गावांवर शोककळा पसरली. मयत दिपकच्या मागे वृद्ध आई, वडील, पत्नी व दोन मुले असा परिवार आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरAkoleअकोलेNashikनाशिक