शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
3
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
4
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
5
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
6
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
7
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
8
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
9
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
10
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
11
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
12
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
13
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
14
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
15
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
16
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
17
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
18
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
19
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
20
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  

लॉकडाऊननंतर राज्य व्यसनमुक्तीची मागणी करणार – वर्षा विलास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2020 18:11 IST

लॉकडाऊनमुळे व्यसनमुक्तीला चांगले गिफ्ट मिळाले आहे. महाराष्ट्रात दारू विक्रीने निचांक गाठला असून घसरलेल्या आलेखामुळे गुन्हेगारीचा आलेख घसरला आहे.

राहुरी : लॉकडाऊनमुळे व्यसनमुक्तीला चांगले गिफ्ट मिळाले आहे. महाराष्ट्रात दारू विक्रीने निचांक गाठला असून घसरलेल्या आलेखामुळे गुन्हेगारीचा आलेख घसरला आहे. लॉकडाऊन उठल्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याशी संपर्क साधून मध्य मुक्त महाराष्ट्र उभय करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्याचे सरचिटणीस वर्षा विद्या विलास यांनी सांगितले.    

विलास म्हणाल्या, शहरी भागात ८५ टक्के तर ग्रामीण भागात ८० टक्के दारू पिण्याचे प्रमाण कमी झाले आहे. महाराष्ट्र राज्य दारू उत्पादन शुल्क विभागाने एका दिवसात १५२ केसेस दाखल केल्या आहेत. ५५ जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून ३८ लाख रुपयांची दारू जप्त करण्यात आली आहे. ग्रामीण भागात हातभट्टी दारू विक्री सुरू आहे. कोरोनामुळे दारूची उपलब्धता कमी झाली आहे. दारू बंद झाल्यामुळे कुटुंबातील महिलांवर होणारे अत्याचार कमी झाले आहेत. हॉटेल बंद असल्यामुळे अनेक जणांना व्यसनमुक्तीची गिफ्ट दिले आहे. 

दारूपासून महाराष्ट्र शासनाला कोट्यवधी रुपयांचा महसूल मिळतो. शासनाने दारूकडे महसूल म्हणून न बघता आरोग्याच्या दृष्टीने बघावे. दारू बरोबर तंबाखू, सिगारेट, गुटखा अशा व्यसनांचे प्रमाणही घसरले आहे. महाराष्ट्रातील तीन जिल्ह्याप्रमाणे राज्यात टप्याटप्याने दारूबंदी व्हावी असा पाठपुरावा व्यसनमुक्तीचे कार्यकर्ते राज्य शासनाकडे करणार आहे. लॉकडाऊन उठल्यानंतर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात असलेली व्यसन मुक्तीचे कार्यकर्ते आव्हान म्हणून व्यसनमुक्ती चळवळीला सामोरे जाणार आहेत.

बिहारमध्ये दारूबंदी झाल्यानंतर हा खर्च मुलांच्या दुधावर केला जाऊ लागला. महाराष्ट्रात टप्प्याटप्प्याने दारूबंदी व्हावी म्हणून राज्यातील व्यसनमुक्तीचे शिष्टमंडळ शासन दरबारी पाठपुरावा करणार आहे. शासनाने व्यसन मुक्तीसाठी कायदे करण्याची गरज आहे. - वर्षा विद्या विलास, सरचिटणीस, महाराष्ट्र राज्य नशाबंदी मंडळ

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar collector officeअहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय