शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
4
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
7
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
8
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
9
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
10
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
11
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
12
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
13
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
14
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
15
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
16
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
17
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
18
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
19
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
20
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
Daily Top 2Weekly Top 5

आयटीआयनंतर आता थेट पदवीसाठी प्रवेश!

By admin | Updated: June 14, 2014 01:19 IST

अशोक निंबाळकर, अहमदनगर व्यवसाय शिक्षण (आयटीआय) घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आता थेट पदवीच्या पहिल्या वर्षाला प्रवेश घेता येईल. शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाने आयटीआयला

अशोक निंबाळकर, अहमदनगर व्यवसाय शिक्षण (आयटीआय) घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आता थेट पदवीच्या पहिल्या वर्षाला प्रवेश घेता येईल. शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाने आयटीआयला दोन वर्षांची समकक्षता म्हणून मान्यता दिली आहे. या अध्यादेशाची पुणे विद्यापीठ यावर्षीपासून अंमलबजावणी करीत आहे. यामुळे लाखो विद्यार्थी पदवीधर होतील.सध्या बारावीचे निकाल लागले आहेत. त्यामुळे आयटीआय विद्यार्थ्यांना या वर्षीपासूनच पदवीच्या पहिल्या वर्षाला प्रवेश घेता येईल. आयटी आय-ला दोन वर्षांच्या समकक्षतेसाठी शासनाने संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञ व शासकीय अधिकाऱ्यांची संयुक्त समिती नेमली होती. तिने या निर्णयासाठी अहवाल सादर केला. या समितीने विविध अभ्यासक्रमांना समकक्षता तसेच पर्यायी शैक्षणिक अर्हता दिल्याने विद्यार्थ्यांना होणारे फायदे, विविध राज्यांनी अर्हतेबाबत निर्गमित केलेले आदेश, व्यवसाय शिक्षणाबाबत विविध समितींनी केलेल्या शिफारशी आदी बाबींचा सर्वंकष अभ्यास करून अर्हतेबाबत अहवाल सादर केला. राज्य सरकारने व्यवसाय शिक्षणाच्या विकासासाठी अनेक योजना सुरू करण्याचे धोरण अवलंबिले आहे. आंतरराष्ट्रीय स्पर्धेत टिकण्यासाठी औद्योगिक क्षेत्रात कुशल कामगार वर्गाची गरज निर्माण झाली आहे. त्यासाठी व्यवसाय शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी वरीलप्रमाणे निर्णय घेतला.पूर्वी आयटीआयनंतर त्यांना १७ क्रमांकाचा अर्ज भरून बारावीची परीक्षा द्यावी लागे. त्यात अनुत्तीर्ण झाल्यास विद्यार्थी शिक्षणापासून परावृत्त होत. या समतुल्यमुळे विद्यार्थ्यांना थेट पदवीच्या पहिल्या वर्षांसाठी (कोणतीही शाखा) प्रवेश घेता येईल. प्रवेश देण्याबाबत पुणे विद्यापीठाला आदेश मिळाले आहेत, असे पुणे विद्यापीठाचे सिनेट सदस्य शिवाजीराव साबळे यांनी सांगितले.