शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
3
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
4
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
5
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
6
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
7
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
8
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
9
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
10
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
11
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
12
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
13
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
14
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
15
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
16
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
17
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
18
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
19
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
20
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण

खुद्द राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा सल्ला दिला; ही आत्महत्या ठरली असती : राधाकृष्ण विखे

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2019 13:37 IST

लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर राज्यातील सर्व कार्यकत्यार्शी चर्चा करणार आहे. त्यानंतर बैठक घेऊन पुढील निर्णय घेणार असल्याचे मत विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी व्यक्त केले.

अहमदनगर : लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर राज्यातील सर्व कार्यकर्त्यांशी चर्चा करणार आहे. त्यानंतर बैठक घेऊन पुढील निर्णय घेणार असल्याचे मत विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी व्यक्त केले. राधाकृष्ण विखे लोणी येथील पत्रकार परिषदेत व्यक्त केली.

विखे म्हणाले, गेल्या अनेक दिवसांपासून मोकळेपणाने बोलता येत नव्हते. गेली साडेचार वर्षे मी विरोधी पक्षनेता म्हणून काम केले. नेत्यांनी आमच्या पाठीमागे उभे राहण्याऐवजी आम्हाला राष्ट्रवादीमध्ये जाण्याचा सल्ला दिला. सुजय विखे यांनी राष्ट्रवादीच्या चिन्हावर लढावी असा आग्रह होता. हे असे सांगून एक प्रकारे राजकीय आत्महत्या आम्हाला करायला लावण्याची भुमिका पक्षातूनच घेण्यात आली. पक्षासाठी योगदान असूनही पक्ष आमच्या पाठीशी उभा राहिला नाही, अशी खंत राधाकृष्ण विखे यांनी व्यक्त केली.

गेल्या चार वर्षांच्या काळात कार्यकर्त्यांचा, सहकारी आमदारांचे मनोबल वाढविण्याचे काम मी केले. या काळात चांगले काम केल्याचे समाधान मला आहे. अनेक नेत्यांच्या जिल्ह्यात काँग्रेसची सत्ता आली नाही. मात्र आमच्या जिल्ह्यात जिल्हा परिषदेवर काँग्रेसने सत्ता मिळविली. लोकसभा निवडणुकांच्या सुरुवातीला जागावाटपाची चर्चा सुरु होती. आमची सुरुवातीपासूनच काँग्रेसला जागा सोडावी, अशी मागणी होती. यासाठी शरद पवारांनाही भेटलो. आमच्या पक्षातील काही मंडळी ही जागा न सोडण्यासाठी प्रयत्न करत होते. या सर्व घटनेमध्ये डॉ.सुजय विखे यांना उमेदवारी देण्याचा आग्रह होता. यासाठी राहुल गांधी यांनाही भेटलो. त्यांनी राष्ट्रवादीमध्ये जाण्याचा सल्ला दिला. त्यानंतर सुजयने भाजपात जाण्याचा निर्णय घेतला. १५ मार्च रोजी राजीनामा दिला. तो स्विकारला गेला. याबाबत मला दु:ख नाही. निवडणूकीत पवार विरूध्द विखे असा रंग आला. आमच्या भाऊबंदकीवर पवारांनी निवडणूक आणली. पवारांनी आमच्या वडीलांवर जिव्हारी टीका केली, असेही विखे म्हणाले. 

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरshirdi-pcशिर्डीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Maharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019