शहरं
Join us  
Trending Stories
1
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
4
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
5
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
6
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
7
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
8
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
9
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
10
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
11
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
12
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
13
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
14
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
15
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
16
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
17
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
18
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
19
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
20
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले

खुद्द राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा सल्ला दिला; ही आत्महत्या ठरली असती : राधाकृष्ण विखे

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2019 13:37 IST

लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर राज्यातील सर्व कार्यकत्यार्शी चर्चा करणार आहे. त्यानंतर बैठक घेऊन पुढील निर्णय घेणार असल्याचे मत विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी व्यक्त केले.

अहमदनगर : लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर राज्यातील सर्व कार्यकर्त्यांशी चर्चा करणार आहे. त्यानंतर बैठक घेऊन पुढील निर्णय घेणार असल्याचे मत विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी व्यक्त केले. राधाकृष्ण विखे लोणी येथील पत्रकार परिषदेत व्यक्त केली.

विखे म्हणाले, गेल्या अनेक दिवसांपासून मोकळेपणाने बोलता येत नव्हते. गेली साडेचार वर्षे मी विरोधी पक्षनेता म्हणून काम केले. नेत्यांनी आमच्या पाठीमागे उभे राहण्याऐवजी आम्हाला राष्ट्रवादीमध्ये जाण्याचा सल्ला दिला. सुजय विखे यांनी राष्ट्रवादीच्या चिन्हावर लढावी असा आग्रह होता. हे असे सांगून एक प्रकारे राजकीय आत्महत्या आम्हाला करायला लावण्याची भुमिका पक्षातूनच घेण्यात आली. पक्षासाठी योगदान असूनही पक्ष आमच्या पाठीशी उभा राहिला नाही, अशी खंत राधाकृष्ण विखे यांनी व्यक्त केली.

गेल्या चार वर्षांच्या काळात कार्यकर्त्यांचा, सहकारी आमदारांचे मनोबल वाढविण्याचे काम मी केले. या काळात चांगले काम केल्याचे समाधान मला आहे. अनेक नेत्यांच्या जिल्ह्यात काँग्रेसची सत्ता आली नाही. मात्र आमच्या जिल्ह्यात जिल्हा परिषदेवर काँग्रेसने सत्ता मिळविली. लोकसभा निवडणुकांच्या सुरुवातीला जागावाटपाची चर्चा सुरु होती. आमची सुरुवातीपासूनच काँग्रेसला जागा सोडावी, अशी मागणी होती. यासाठी शरद पवारांनाही भेटलो. आमच्या पक्षातील काही मंडळी ही जागा न सोडण्यासाठी प्रयत्न करत होते. या सर्व घटनेमध्ये डॉ.सुजय विखे यांना उमेदवारी देण्याचा आग्रह होता. यासाठी राहुल गांधी यांनाही भेटलो. त्यांनी राष्ट्रवादीमध्ये जाण्याचा सल्ला दिला. त्यानंतर सुजयने भाजपात जाण्याचा निर्णय घेतला. १५ मार्च रोजी राजीनामा दिला. तो स्विकारला गेला. याबाबत मला दु:ख नाही. निवडणूकीत पवार विरूध्द विखे असा रंग आला. आमच्या भाऊबंदकीवर पवारांनी निवडणूक आणली. पवारांनी आमच्या वडीलांवर जिव्हारी टीका केली, असेही विखे म्हणाले. 

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरshirdi-pcशिर्डीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Maharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019