शहरं
Join us  
Trending Stories
1
"विधानभवनात आमदारांचे खून पडले तरी...", राज ठाकरे भडकले, महाराष्ट्रातील जनतेला संतप्त सवाल
2
'...तेव्हा राज ठाकरे-उद्धव ठाकरेंना लोक आपटू आपटू मारतील'; भाजप खासदार निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
3
Mumbai: मालवणी परिसरातून अपहरण झालेल्या तीन मुलींची सुखरूप सुटका
4
५ वर्षांनंतर पाकिस्तानला यूके उड्डाणाची मुभा मिळाली! पण 'बनावट पायलट' घोटाळ्याचा शिक्का अजूनही कायम?
5
६ महिन्यांपूर्वी लग्न मोडलं, मुलीने दुसरीकडे स्थळ बघायला सुरुवात केली; रागाने तरुण ऑफिसमध्ये पोहोचला अन्...
6
Mumbai Chawl Collapsed: वांद्र्यात तीन मजली चाळ कोसळली, अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकले, बचावकार्य सुरू
7
Share Market Today: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; 'या' शेअर्समध्ये दिसली मोठी घसरण
8
'शोले'मधील गब्बरचा अड्डा आहे या ठिकाणी, शूटिंगसाठी निर्मात्यांनी बनवलेला रस्ता, आता बनलंय पर्यटन स्थळ
9
१८ जुलै ते ११ ऑगस्ट बुधाचे वक्री भ्रमण; डोक्याचा ताप वाढणार, सगळ्या राशींनी घ्या 'ही' काळजी!
10
Ola-Uber Strike: "संप मागे घ्या नाही तर...; बंदूक दाखवून कॅब चालकांना धमकावले, व्हिडीओ व्हायरल!
11
दूध गरम करताना सिलेंडर फुटला, २० घरांची राखरांगोळी; महिलेचा होरपळून मृत्यू
12
राड्याच्या काही क्षण अगोदर काय घडले? पडळकर यांच्याशी चर्चा सुरू असतानाच बाचाबाची नंतर...
13
तुमची मुलगी बनेल लखपती; महिन्याला वाचवा १००० रुपये, २१ व्या वर्षी मिळतील ₹५.५ लाख
14
Padalkar Awhad: विधान भवनात देशमुखांना मारहाण, पडळकरांचा कार्यकर्ता ऋषिकेश टकले कोण?
15
पहलगाम हल्ल्यानंतर अमेरिकेने ‘TRF’बद्दल घेतला मोठा निर्णय; पाकिस्तानच्या कुरापतींना चाप बसणार!
16
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
17
आजचे राशीभविष्य, १८ जुलै २०२५: 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार लय भारी!
18
मंत्रालय, ठाणे अन् नाशिक बनले ‘हनी ट्रॅप’चे केंद्र; पटोलेंनी विधानसभेत पेनड्राइव्ह दाखविला
19
संपादकीय: धन-धान्य कृषी योजना योजना चांगली; पण...
20
पडळकर-आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये लाॅबीमध्ये तुंबळ हाणामारी, ‘म’-‘भ’च्या भाषेत शिवीगाळ

अखेर कुकडीतून पाणी सुटले

By admin | Updated: August 13, 2015 23:14 IST

अहमदनगर: अधिकाऱ्यांच्या टोलवाटोलवील अडकलेले पाणी अखेर गुरुवारी सायंकाळी कुकडीतून बाहेर पडले़

अहमदनगर: अधिकाऱ्यांच्या टोलवाटोलवील अडकलेले पाणी अखेर गुरुवारी सायंकाळी कुकडीतून बाहेर पडले़ दुष्काळाने होरपळत असलेल्या दक्षिण नगर जिल्ह्यातील कर्जत, जामखेड, पारनेर आणि श्रीगोंदा तालुक्यातील शेतकऱ्यांचा जीव भांड्यात पडला असून,भंडारदरा धरणातून दुपारी बारा वाजेच्या सुमारास आवर्तन सुरू करण्यात आले आहे़ त्यामुळे हजारो हेक्टरवरील खरीप पिकांना मोठा दिलासा मिळणार आहे़कुकडी प्रकल्पातून गुरुवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास ५०० क्युसेक वेगाने आवर्तन सोडण्यात आले़ आवर्तनाच्या आदेशाचा घोळ गुरुवारी दिवसभर सुरु होता़ सरकारी आदेश न आल्याने पाणी सुटले नाही़ निर्णय होऊन पाणी न सुटल्याने सर्वांचीच चिंता वाढली होती़ मात्र दुपारनंतर चके्र फिरले आणि सायंकाळी कुकडीतून पाणी नगरकडे झेपावले़ विशेष म्हणजे पिण्याबरोबरच हे पाणी शेतीसाठी सोडण्यात आले आहे़ कुकडीच्या आवर्तनाचा लाभ कर्जत, जामखेड, पारनेर आणि श्रीगोंदा तालुक्यातील शेतकऱ्यांना होणार आहे़ दरम्यान भंडारदरा धरणातून १ हजार ७०० क्युसेक वेगाने आवर्तन सुरू करण्यात आले आहे़ सायंकाळी हे पाणी अकोला परिसरात दाखल झाले असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले़ दक्षिण नगर जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे़ टँकर भरण्यासाठीही पाणी शिल्लक नाही़ त्यामुळे कुकडी प्रकल्पातून पिण्यासाठी पाणी आवर्तन सोडण्याची मागणी जिल्हा प्रशासनाकडून गेल्या २९ जुलै रोजी जलसंपदा विभागाकडे करण्यात आली होती़ दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या टंचाई आढावा बैठकीत पालकमंत्री शिंदे यांनी याबाबत जलसंपदा मंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक होऊन कुकडीतून आवर्तन सोडण्याचे आश्वासन दिले होते़ कुकडीत ४१ टक्के पाणीसाठा असल्याने पेच निर्माण झाला होता़ त्यामुळे जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत आवर्तन सोडण्याचा निर्णय झाला नाही़ दुसऱ्या दिवशी पालकमंत्री राम शिंदे यांनी महाजन यांची भेट घेऊन वस्तुस्थिती निदर्शनास आणून दिली़ त्यावर महाजन यांनी गुरुवारपासून आवर्तन सोडण्याचे आदेश दिले होते़ मात्र गुरुवारी दिवसभरात जलसंपदा विभागाकडून तसे आदेश प्रशासनास प्राप्त झाले नव्हते़ त्यामुळे दिवसभरात पाणी सुटले नाही़ सायंकाळी चक्रे फिरली आणि पाणी सुटले़ कुकडीतून ५०० क्युसेकने पाणी श्रीगोंद्याकडे झेपावले असून, हे पाणी नारायणवाडी,श्रीगोंदा तालुक्यात दाखल होणार असून, या पाण्यातून सोलापूर जिल्ह्याला पाणी दिले जाणार आहे़ पिण्याबरोबरच शेतीसाठी पाणी सुटल्याने खरिपाला दिलासा मिळाला आहे़ (प्रतिनिधी)