शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

अखेर कुकडीतून पाणी सुटले

By admin | Updated: August 13, 2015 23:14 IST

अहमदनगर: अधिकाऱ्यांच्या टोलवाटोलवील अडकलेले पाणी अखेर गुरुवारी सायंकाळी कुकडीतून बाहेर पडले़

अहमदनगर: अधिकाऱ्यांच्या टोलवाटोलवील अडकलेले पाणी अखेर गुरुवारी सायंकाळी कुकडीतून बाहेर पडले़ दुष्काळाने होरपळत असलेल्या दक्षिण नगर जिल्ह्यातील कर्जत, जामखेड, पारनेर आणि श्रीगोंदा तालुक्यातील शेतकऱ्यांचा जीव भांड्यात पडला असून,भंडारदरा धरणातून दुपारी बारा वाजेच्या सुमारास आवर्तन सुरू करण्यात आले आहे़ त्यामुळे हजारो हेक्टरवरील खरीप पिकांना मोठा दिलासा मिळणार आहे़कुकडी प्रकल्पातून गुरुवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास ५०० क्युसेक वेगाने आवर्तन सोडण्यात आले़ आवर्तनाच्या आदेशाचा घोळ गुरुवारी दिवसभर सुरु होता़ सरकारी आदेश न आल्याने पाणी सुटले नाही़ निर्णय होऊन पाणी न सुटल्याने सर्वांचीच चिंता वाढली होती़ मात्र दुपारनंतर चके्र फिरले आणि सायंकाळी कुकडीतून पाणी नगरकडे झेपावले़ विशेष म्हणजे पिण्याबरोबरच हे पाणी शेतीसाठी सोडण्यात आले आहे़ कुकडीच्या आवर्तनाचा लाभ कर्जत, जामखेड, पारनेर आणि श्रीगोंदा तालुक्यातील शेतकऱ्यांना होणार आहे़ दरम्यान भंडारदरा धरणातून १ हजार ७०० क्युसेक वेगाने आवर्तन सुरू करण्यात आले आहे़ सायंकाळी हे पाणी अकोला परिसरात दाखल झाले असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले़ दक्षिण नगर जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे़ टँकर भरण्यासाठीही पाणी शिल्लक नाही़ त्यामुळे कुकडी प्रकल्पातून पिण्यासाठी पाणी आवर्तन सोडण्याची मागणी जिल्हा प्रशासनाकडून गेल्या २९ जुलै रोजी जलसंपदा विभागाकडे करण्यात आली होती़ दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या टंचाई आढावा बैठकीत पालकमंत्री शिंदे यांनी याबाबत जलसंपदा मंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक होऊन कुकडीतून आवर्तन सोडण्याचे आश्वासन दिले होते़ कुकडीत ४१ टक्के पाणीसाठा असल्याने पेच निर्माण झाला होता़ त्यामुळे जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत आवर्तन सोडण्याचा निर्णय झाला नाही़ दुसऱ्या दिवशी पालकमंत्री राम शिंदे यांनी महाजन यांची भेट घेऊन वस्तुस्थिती निदर्शनास आणून दिली़ त्यावर महाजन यांनी गुरुवारपासून आवर्तन सोडण्याचे आदेश दिले होते़ मात्र गुरुवारी दिवसभरात जलसंपदा विभागाकडून तसे आदेश प्रशासनास प्राप्त झाले नव्हते़ त्यामुळे दिवसभरात पाणी सुटले नाही़ सायंकाळी चक्रे फिरली आणि पाणी सुटले़ कुकडीतून ५०० क्युसेकने पाणी श्रीगोंद्याकडे झेपावले असून, हे पाणी नारायणवाडी,श्रीगोंदा तालुक्यात दाखल होणार असून, या पाण्यातून सोलापूर जिल्ह्याला पाणी दिले जाणार आहे़ पिण्याबरोबरच शेतीसाठी पाणी सुटल्याने खरिपाला दिलासा मिळाला आहे़ (प्रतिनिधी)