शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

प्रशासनाच्या आश्वासनानंतर उपोषण मागे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:19 IST

कोपरगाव / चांदेकसारे : तालुक्यातील घारी गावातील नागरिकांना ग्रामपंचायतमार्फत आर.ओ.प्लांट बसवून शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे. या मागणीसाठी भूमिपुत्र ...

कोपरगाव / चांदेकसारे : तालुक्यातील घारी गावातील नागरिकांना ग्रामपंचायतमार्फत आर.ओ.प्लांट बसवून शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे. या मागणीसाठी भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे उत्तर नगर जिल्हा संपर्कप्रमुख किसन विठ्ठल पवार यांनी मंगळवारी (दि.२३) ग्रामपंचायत कार्यालयासमोर सकाळपासून लाक्षणिक उपोषण सुरु केले होते.

या उपोषणाची प्रशासनाने दखल घेत ग्रामसेवक जालिंदर पाडेकर यांनी १५ मे २०२१ पर्यंत गावातील नागरिकांना शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्यात येईल असे लेखी आश्वासन दिल्यानंतर उपोषणकर्ते डॉ. गोरक्षनाथ रोकडे यांचे हस्ते लिंबूपाणी घेऊन दुपारी दोन वाजता उपोषण मागे घेतले.

पवार म्हणाले, गेल्या अनेक वर्षांपासून घारी गावाला पिण्याच्या पाण्यासाठी पाणी शुद्धीकरण यंत्रणा बसवावी किंवा आर.ओ. प्लांट बसवावा, अशी मागणी सातत्याने करण्यात येत होती. मात्र, ग्रामपंचायतीने त्याकडे दुर्लक्ष केले व त्यासाठी कोणतेही ठोस प्रयत्न केले गेले नाही. नुकतेच जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने गावातील पिण्याच्या पाण्याचे नमुन्यांची तपासणी केली, असता सदर पाणी दूषित असल्याचे आढळून आले आहे. गावातील अनेक लोक डाऊच बुद्रूक, चांदेकसारे येथून पिण्याचे पाणी आणतात. यामध्ये वेळ, इंधन व पैशाचा मोठ्या प्रमाणात अपव्यय तर होतोच लोकांना त्रास सहन करावा लागत आहे.

शेवटी ग्रामपंचायत प्रशासनाला जागे करण्यासाठी उपोषण करण्याचा निर्णय घेतला होता. या उपोषणावर ग्रामसेवक जालिंदर पाडेकर यांनी १५ मे २०२१ पर्यंत आर. ओ. प्लांटचे नियोजन करून कार्यान्वित करण्यात येईल असे लेखी पत्र दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले आहे. असे पवार यांनी सांगितले आहे. याप्रसंगी कुणाल जमदाडे, ग्रामपंचायत सदस्य भाऊसाहेब खरात, मच्छिंद्र गायकवाड, डॉ. बाबासाहेब पाटील, शेतकरी लक्ष्मण पवार उपस्थित होते.