शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

प्रशासनाच्या आश्वासनानंतर उपोषण मागे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:19 IST

कोपरगाव / चांदेकसारे : तालुक्यातील घारी गावातील नागरिकांना ग्रामपंचायतमार्फत आर.ओ.प्लांट बसवून शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे. या मागणीसाठी भूमिपुत्र ...

कोपरगाव / चांदेकसारे : तालुक्यातील घारी गावातील नागरिकांना ग्रामपंचायतमार्फत आर.ओ.प्लांट बसवून शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे. या मागणीसाठी भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे उत्तर नगर जिल्हा संपर्कप्रमुख किसन विठ्ठल पवार यांनी मंगळवारी (दि.२३) ग्रामपंचायत कार्यालयासमोर सकाळपासून लाक्षणिक उपोषण सुरु केले होते.

या उपोषणाची प्रशासनाने दखल घेत ग्रामसेवक जालिंदर पाडेकर यांनी १५ मे २०२१ पर्यंत गावातील नागरिकांना शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्यात येईल असे लेखी आश्वासन दिल्यानंतर उपोषणकर्ते डॉ. गोरक्षनाथ रोकडे यांचे हस्ते लिंबूपाणी घेऊन दुपारी दोन वाजता उपोषण मागे घेतले.

पवार म्हणाले, गेल्या अनेक वर्षांपासून घारी गावाला पिण्याच्या पाण्यासाठी पाणी शुद्धीकरण यंत्रणा बसवावी किंवा आर.ओ. प्लांट बसवावा, अशी मागणी सातत्याने करण्यात येत होती. मात्र, ग्रामपंचायतीने त्याकडे दुर्लक्ष केले व त्यासाठी कोणतेही ठोस प्रयत्न केले गेले नाही. नुकतेच जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने गावातील पिण्याच्या पाण्याचे नमुन्यांची तपासणी केली, असता सदर पाणी दूषित असल्याचे आढळून आले आहे. गावातील अनेक लोक डाऊच बुद्रूक, चांदेकसारे येथून पिण्याचे पाणी आणतात. यामध्ये वेळ, इंधन व पैशाचा मोठ्या प्रमाणात अपव्यय तर होतोच लोकांना त्रास सहन करावा लागत आहे.

शेवटी ग्रामपंचायत प्रशासनाला जागे करण्यासाठी उपोषण करण्याचा निर्णय घेतला होता. या उपोषणावर ग्रामसेवक जालिंदर पाडेकर यांनी १५ मे २०२१ पर्यंत आर. ओ. प्लांटचे नियोजन करून कार्यान्वित करण्यात येईल असे लेखी पत्र दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले आहे. असे पवार यांनी सांगितले आहे. याप्रसंगी कुणाल जमदाडे, ग्रामपंचायत सदस्य भाऊसाहेब खरात, मच्छिंद्र गायकवाड, डॉ. बाबासाहेब पाटील, शेतकरी लक्ष्मण पवार उपस्थित होते.