शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

 वर्षभरानंतर अखेर ‘ते’ शिक्षक परतले स्वगृही, आंतरजिल्हा बदलीने ८९ शिक्षकांना मिळणार नियुक्त्या

By चंद्रकांत शेळके | Updated: June 20, 2023 20:17 IST

राज्यातील ३९४३ शिक्षकांच्या ॲानलाईन आंतरजिल्हा बदल्या ॲागस्ट २०२२ मध्ये झाल्या.

अहमदनगर: गेल्या वर्षी ॲानलाईन आंतरजिल्हा बदली झाली, परंतु संबंधित जिल्ह्यात १० टक्केपेक्षा जादा रिक्त जागा राहत असल्याने कार्यमुक्त होऊ न शकलेेले ८९ शिक्षक आता वर्षभरानंतर कार्यमुक्त झाले असून त्यांना आता स्वगृही म्हणजे नगर जिल्ह्यात नियुक्ती मिळणार आहे.

राज्यातील ३९४३ शिक्षकांच्या ॲानलाईन आंतरजिल्हा बदल्या ॲागस्ट २०२२ मध्ये झाल्या. यात इतर जिल्ह्यांतून २६५ शिक्षकांच्या बदल्या नगर जिल्ह्यात झाल्या. परंतु विहीत मुदतीत केवळ १७६ शिक्षक हजर झाले. त्यांना जिल्हा परिषदेच्या वतीने समुपदेशन करून जिल्ह्यात नियुक्त्या दिल्या गेल्या. परंतु ८९ शिक्षकांना त्या त्या जिल्ह्यातील जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी कार्यमुक्तच केले नव्हते.

संबंधित शिक्षकाला नवीन जिल्ह्यात रुजू होण्यासाठी कार्यमुक्त करणे प्रत्येक जिल्ह्याच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांवर अवलंबून असते. शिक्षण हक्क कायदा २००९ च्या कलम २६ अन्वये जिल्हा परिषदांमध्ये शिक्षकांच्या १० टक्केपेक्षा जास्त जागा रिक्त असू शकत नाहीत. त्यामुळेच बदलीने रिक्त पदांचा रेशो १० टक्केपेक्षा खाली जात असल्याने या शिक्षकांना कार्यमुक्त केले गेले नव्हते. परिणामी बदली होऊनही हे शिक्षक त्याच जिल्ह्यात अडकून पडले. आता आंतरजिल्हा बदलीने पुन्हा हा रेशो राखला जात असल्याने संबंधित जिल्ह्यांतील प्रशासनाने या शिक्षकांना कार्यमुक्त केले आहे. अखेर हे ८९ शिक्षक आता स्वगृही म्हणजे नगर जिल्ह्यात बदलून आले आहेत. समुपदेशनाने पदस्थापनाआंतरजिल्हा बदलीने आलेल्या या ८९ शिक्षकांना जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून समुपदेशनाने पदस्थापना दिली जाणार आहे. त्यासाठी दोन-तीन दिवसांत जिल्हा परिषदेत समुपदेशन वर्ग आयोजित केला जाणार आहे. जिल्ह्यातील रिक्त जागांचा तपशील शिक्षकांना पडद्यावर दाखवून ही पदस्थापना देण्यात येणार आहे. त्यासाठी संवर्ग १, संवर्ग २मधील शिक्षकांना आवश्यक कागदपत्रांसह जिल्हा परिषद सभागृहात बोलावले जाणार आहे. शिक्षण विभागाने २१ जून रोजीच हा समुपदेशन वर्ग आयोजित केला होता. परंतु काही कारणास्तव तो पुढे ढकलला आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरTeacherशिक्षक