शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंसा हे प्रश्नांचं उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य; सरसंघचालकांनी टोचले राजकीय पक्षांचे कान
2
'पीओके'मध्ये निदर्शने हिंसक झाली, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला; १२ नागरिकांचा मृत्यू
3
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये संपेल पेन्शनचं टेन्शन, दर महिन्याला मिळतील ₹२००००
4
Video: "आय लव्ह मराठी! मी मराठी शिकतोय, माझ्याशी मराठीत बोला..."; अबू आझमींना झाली उपरती
5
महात्मा गांधींच्या पणतीला पाहिलंत का? दिसायला आहे खूप ग्लॅमरस, गाजवतेय हॉलिवूड
6
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
7
'मानवी इतिहासाचा मार्ग बदलला', पंतप्रधान मोदींनी राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली
8
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
9
डायबिटीज रुग्णांसाठी गुडन्यूज! ब्लड शुगर आणि लठ्ठपणा गुणकारी औषधीच्या विक्रीला केंद्राची मंजुरी
10
तृप्ती, शर्वरी की अनन्या, कोणती अभिनेत्री दिसणार 'चांदनी बार'च्या सीक्वलमध्ये मुख्य भूमिकेत?
11
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
12
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
13
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी
14
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
15
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
16
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
17
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
18
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
19
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
20
रा. स्व. संघाने शिकवली फक्त शिस्त आणि सेवा! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली संघ शाखेतील प्रार्थनेची शक्ती

विंचरणा नदीवरील बंधा-याचे वाहून गेलेले दरवाजे बसविले ३६ तासानंतर; बंधा-यात उरले फक्त २० टक्के पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2017 16:46 IST

वंजारवाडी येथील विंचरणा नदीवरील कोल्हापूर पद्धतीच्या बंधा-याचे अतिदाबामुळे दोन लोखंडी दरवाजे सोमवारी रात्री बाराच्या सुमारास पाण्याच्या लोंढ्यात वाहून गेले. हे बंधारे तब्बल ३६ तासानंतर बसविण्यात यश आले असून, बंधा-यात अवघे आता २० टक्के पाणी उरले आहे.

जामखेड : तालुक्यातील वंजारवाडी येथील विंचरणा नदीवरील कोल्हापूर पद्धतीच्या बंधा-याचे अतिदाबामुळे दोन लोखंडी दरवाजे सोमवारी रात्री बाराच्या सुमारास पाण्याच्या लोंढ्यात वाहून गेले. हे बंधारे तब्बल ३६ तासानंतर बसविण्यात यश आले असून, बंधा-यात अवघे आता २० टक्के पाणी उरले आहे.वंजारवाडी येथील कोल्हापूर पद्धतीचा बंधारा काठोकाठ भरून वाहत होता. या बंधा-याला २१ मो-या आहेत. एका मोरीत आठ लोखंडी दरवाजे आहेत. एका मोरीतील बंधा-यातील खालच्या बाजूतील दोन दरवाजे जिर्ण झालेले असल्याने पाण्याच्या अतिउच्च दाबामुळे ते वाहून गेले. यामुळे या बंधा-यातील लाखो लिटर पाणी वाया गेले. हे दरवाजे बसवण्यासाठी गावक-यांनी खूप प्रयत्न केले. पण अतिदाबामुळे शक्य झाले नाही. अखेर पाणी ३६ तासानंतर कमी झाल्याने गावक-यांनी दरवाजे बसवले. पण तोपर्यंत २० दशलक्ष घनफूट पाणी वाहून गेले होते.रत्नापूर येथील बंधा-यातील व पाटोदा येथील बंधा-यातील ओव्हरफ्लोचे पाणी विंचारणा नदीतून वंजारवाडी येथील बंधा-यात येत आहे. त्यामुळे बंधा-यात काही प्रमाणात पाणीसाठा वाढू शकतो. बंधा-यातील पाणी किती वाढते याकडे वंजारवाडी गावक-यांचे लक्ष लागले आहे.

कोल्हापूर बंधारा हा चारगावासाठी वरदान ठरणारा आहे. या बंधा-यातील पाणी मे महिन्यापर्यंत पुरले असते. मोठ्या प्रमाणावर पाणी वाया गेले असल्यामुळे गावक-यांना रडू आवरले नाही. ३६ तासानंतर ग्रामस्थांनी दरवाजे बसवले आहेत. वरील भागातील ओव्हरफ्लोचे पाणी पंधरा दिवस आणखी येत राहिल्यास बंधारा ७० ते ८० टक्के भरू शकतो.-आशा जायभाय, सरपंच, वंजारवाडी

टॅग्स :AhmednagarअहमदनगरJamkhedजामखेड