शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash :या अपघाताला जबाबदार कोण? बोइंग विमानातील त्रुटी की...?
2
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
3
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
4
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
5
Ahmedabad Plane Crash : महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांवर कोसळले ‘दुःखाचे आकाश’
6
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
7
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
8
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
9
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
10
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
11
अहमदाबादनंतर मुंबईत दुर्घटना घडण्याची वाट बघायची का? मुंबई विमानतळ परिसरातील झोपड्या, फनेल झाेनमधील इमारतींचे पुनर्वसन रखडले
12
प्रभाग रचना सप्टेंबरमध्ये पूर्ण होणार; पालिका निवडणुका ऑक्टोबरनंतरच! ९ टप्प्यांमध्ये प्रक्रिया पूर्ण होणार; २९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबरदरम्यान होणार शिक्कामोर्तब
13
मुंब्रा स्टेशनजवळील रुळांचे ‘ते’ वळण तसेच राहणार ! मध्य रेल्वेनं सांगितलं कारण; जमिनीच्या अधिग्रहणाची मोठी अडचण
14
ग्रुप बुकिंग केल्यास एसटीने थेट पंढरपूरला जाता येणार, ‘आषाढी’साठी ५ हजार विशेष बसेस : सरनाईक
15
राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल 
16
लंडनला कायमचेच निघालेले डॉक्टरचे कुटुंब; महिन्या पूर्वीच दिलेला राजीनामा, चेहऱ्यावर हसूही होते...
17
Air India plane crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत विक्रांत मेस्सीच्या वैमानिक मित्राचा मृत्यू, अभिनेत्याने लिहिली पोस्ट
18
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
19
क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले; एअर इंडियाच्या विमानात होती...
20
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 

प्रशासनाने नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य दिले-बाळासाहेब थोरात; नागरिकांनीही स्वयंशिस्त पाळावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2020 15:24 IST

देशात, राज्यात कोरोनाची वाढ रोखण्यात यश आले आहे. प्रशासनाने नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. नागरिकांनीही नियमांसह स्वयंशिस्त पाळणे गरजेचे आहे. आपण त्यांना सहकार्य करा, असे आवाहन कॉँग्रेस प्रदेशाध्यक्ष, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले. 

संगमनेर : देशात, राज्यात कोरोनाची वाढ रोखण्यात यश आले आहे. प्रशासनाने नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. नागरिकांनीही नियमांसह स्वयंशिस्त पाळणे गरजेचे आहे. आपण त्यांना सहकार्य करा, असे आवाहन कॉँग्रेस प्रदेशाध्यक्ष, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.  येथील अमृतवाहिनी शेती आणि शिक्षण विकास संस्थेच्या प्रांगणात शुक्रवारी महसुलमंत्री थोरात यांनी फिजीकल डिस्टन्स ठेवत कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत आढावा बैठक घेतली. आमदार डॉ. सुधीर तांबे, नगराध्यक्षा दुर्गा तांबे, प्रांताधिकारी डॉ.शशिकांत मंगरूळे, उपविभागीय पोलीस अधिकारी रोशन पंडीत, तहसीलदार अमोल निकम, मुख्याधिकारी डॉ.सचिन बांगर, गटविकास अधिकारी सुरेश शिंदे, पोलीस निरीक्षक अभय परमार, सुनील पाटील, सहायक पोलीस निरीक्षक पी.वाय.कादरी, अमृतवाहिनी संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे उपस्थित होते.  मंत्री थोरात यांनी संगमनेर शहरातील हॉटस्पॉट तसेच तालुक्यातील धांदरफळ बुद्रूक, कुरण येथील परिस्थितीची माहिती घेत तेथील नागरिकांची गैरसोय होवू नये याकरिता प्रशासनाला सूचना केल्या.  कोरोनाचा मुकाबला आपण सतर्क राहून करीत आहोत. या संकटात महसूल, पोलीस आणि आरोग्य विभाग प्रभावीपणे काम करीत आहेत. तालुक्यातील नागरिकांनी नियमांचे पालन करीत गोरगरिब, गरजू नागरिक, मजूर, परराज्यातील कामगार यांना मानवतेच्या भावनेतून चांगले सहकार्य केले आहे. हे कार्य कौतूकास्पद आहे.  कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सर्वांनी स्वयंशिस्त पाळावी. धांदरफळ बुद्रूक, कुरण, संगमनेर शहर व हॉटस्पॉट असलेल्या ठिकाणातील नागरिकांनी घाबरून जावू नये, असे आवाहन देखील थोरात यांनी केले. 

ग्रामीण भागात नागरिकांनी मोठी काळजी घेतली आहे. संगमनेर शहरात अनेक स्वयंसेवक गोरगरिबांना अन्न पाकिट पुरविण्याचे काम करीत आहेत. भाजीपाल्यासह अत्यावश्यक सेवा आॅनलाईन मागणीद्वारे पुरविले जात आहेत. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी नागरिकांनी घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन नगराध्यक्षा दुर्गा तांबे यांनी केले आहे.  

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरcorona virusकोरोना वायरस बातम्याBalasaheb Thoratबाळासाहेब थोरातSangamnerसंगमनेर