शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
2
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
3
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
4
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
5
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
6
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
7
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
8
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
9
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
10
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
11
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
12
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
13
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
14
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
15
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
16
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
17
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
18
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
19
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
20
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा

प्रशासन-सदस्यांत खडाजंगी

By admin | Updated: August 24, 2016 00:41 IST

अहमदनगर : जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या सभेत मंगळवारी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र बिनवडे यांच्याशी महिला बालकल्याणच्या विषयावरून खटके उडाले.

अहमदनगर : जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या सभेत मंगळवारी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र बिनवडे यांच्याशी महिला बालकल्याणच्या विषयावरून खटके उडाले. यावेळी प्रशासन पदाधिकारी आणि स्थायी सदस्यांना विश्वासात घेत नसतील उपयोग काय? असा संतप्त सवाल उपस्थित करत सदस्यांनी स्थायी समितीच्या बैठकीचा त्याग केला. बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्ह्यात पुन्हा मोठा टँकर घोटाळा झाला असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. जिल्हा परिषद अध्यक्षा मंजुषा गुंड यांच्या उपस्थितीत मंगळवारी स्थायी समितीची बैठक झाली. यावेळी सदस्यांनी पाणी पुरवठा विभागाकडून टँकरवर बसवण्यात आलेल्या जीपीआरएस प्रणालीबाबत तक्रारीचा पाढा वाचला. अनेक ठिकाणी मंजूर खेपाच्या तुलनेत क मी खेपा होत आहे. मात्र, प्रत्यक्षात बिल सर्व खेपांचे काढण्यात येत आहे. हा विषय सदस्य राजेंद्र फाळके यांनी दोन महिन्यांपासून लावून धरलेला आहे. मात्र, पाणी पुरवठा विभागाचे दुर्लक्ष झालेले असल्याची माहिती मंजुषा गुंड यांनी दिली. पारनेर तालुक्यात टँकरची माहिती घेतली असता या ठिकाणी टँकरच्या कमी खेपा असतांना सर्व खेपांची बिले अदा करण्यात आलेली आहे. या ठिकाणी मोठी अनियमितता आहे. असा प्रकार जिल्ह्यात असण्याची शक्यता आहे. पाणी पुरवठा विभागाकडे टँकरच्या जीपीआरएस प्रणालीबाबत कोणतीच माहिती उपलब्ध नसल्याचा आरोप सदस्य सुजित झावरे यांनी केला आहे. यामुळे स्थायी समितीच्या सदस्यांनी पाणी पुरवठा विभाग आणि प्रशासनाला चार दिवसांची मुदत दिली असून त्यावेळी संपूर्ण जिल्ह्यातील टँकरची सर्व माहिती घेवून अहवाल देण्याचे आदेश अध्यक्षा गुंड यांनी दिले आहे. दरम्यान, महिला बालकल्याण विभागाच्या कपाट खरेदी प्रकरणाचे पडसाद पुन्हा स्थायी समितीच्या बैठकीत उमटले. मुख्य कार्यकारी अधिकारी बिनवडे यांनी स्थायी समितीला अहवाल सादर न करता परस्पर महिला बालकल्याण आयुक्तांना कसा पाठवला. चौकशीचा अहवाल गोपनीय होता, तर माध्यमांना कशी माहिती दिली, असा आक्षेप सदस्यांचा होता. तर चौकशी आणि त्यावर कारवाई प्रस्तावित करणे ही प्रक्रिया प्रशासकीय आहे. त्यात स्थायी समितीच्या सदस्यांना कळवण्यासारखे काहीच नसल्याचा पवित्रा बिनवडे यांनी घेतला. यावरून खऱ्या अर्थाने खडाजंगी झाली. अखेर सदस्य बाळासाहेब हराळ, राजेंद्र फाळके, सुजित झावरे यांच्यासह अन्य सदस्यांनी सभात्याग केला. बैठकीत जिल्ह्यात अधिकृत पाणी पुरवठादार यांच्याऐवजी काही सरकारी कर्मचारी पाणी पुरवठा करत आहेत. सरकारी पाण्याच्या टँकरमधील पाण्याची परस्पर विक्री होत असल्याचा आरोप केला. बैठकीत झालेल्या खडाजंगीनंतर या वादावर पदाधिकारी, सदस्य आणि अधिकाऱ्यांनी चुप्पी साधली. या विषयावर कोणीच बोलण्यास तयार नव्हते. मात्र, वादाचे पडसाद लवकरच उमटण्याची शक्यता व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)