शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

आदिवासी शिक्षणाचे ‘आदर्श विद्यापीठ’

By admin | Updated: November 3, 2023 15:12 IST

रियाज सय्यद, संगमनेर शैक्षणिक गुणवत्ता सिद्ध करणारी शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा ग्रामीण भागातील आदिवासी विद्यार्थ्यांचे ‘आदर्श विद्यापीठ’ ठरली आहे.

रियाज सय्यद, संगमनेरपठार भागात अकलापूरच्या अतिदुर्गम साडेसात एकर खडकाळ माळरानावर नंदनवन फुलवून शैक्षणिक गुणवत्ता सिद्ध करणारी शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा ग्रामीण भागातील आदिवासी विद्यार्थ्यांचे ‘आदर्श विद्यापीठ’ ठरली आहे. ‘विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास’ हे ध्येय घेवून १० आॅक्टोबर १९८९ रोजी आश्रमशाळेची स्थापना झाली. आश्रमशाळेने शैक्षणिक गुणवत्तेसह विविध उपक्रमांद्वारे ‘उपक्रमशील शाळा’ म्हणून प्रतिमा तयार केली. प्रारंभी १ ते ७ वीपर्यंत वर्ग होते. आज १२ वी कला व विज्ञान शाखांचे वर्ग भरतात. सुमारे ६०० आदिवासी विद्यार्थी शिक्षणाचे धडे गिरवतात. साडेसात एकर खडकाळ भागावर वृक्षराजींचे संगोपन करून परिसर हिरवागार केला आहे. ‘रद्दीतून ग्रंथालय’ या उपक्रमाद्वारे वर्तमानपत्रातील अभ्यासपूरक माहिती संकलित करून पुस्तिका तयार केली. ‘कचरामुक्त शाळा’ उपक्रमातून शाळा परिसर स्वच्छतेचा पायंडा पाडला आहे. ‘गांडूळखत’ प्रकल्पाद्वारे शाळेतील ओला कचरा, सुका कचरा वेगळा करून गांडूळखताची निर्मिती केली जाते. शेवगा, सुबाभूळ, अशोका, करंज, फुलझाडे, औषधी वनस्पती आदी प्रकारच्या झाडांची तयार केलेली ‘ट्री बँक’(रोपवाटिका) अतिशय सुंदर आहे. रोज पहाटे ५ वाजता स्वत: मुख्याध्यापक जी. डी. भांड विद्यार्थ्यांकडून सूर्यनमस्कारासह योगा व प्राणायाम करून घेतात. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शारीरिक व मानसिक विकासाला चालना मिळते. शाळेच्या क्रीडा विभागाचा नावलौकिक असून कल्पना केदार, सुनंदा भगत हिने धावण्यात राज्यस्तरावर चमकदार कामगिरी केली आहे. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना येथे मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. ‘भरारी’ या वार्षिक नियतकालिकातून शाळेचा लेखा-जोखा मांडला जातो. डिजीटल जमान्यात ‘वेबसाईट’ सुरू करणारी ही एकमेव शाळा आहे. दहावी व बारावीचे निकाल सतत ९० टक्क्यांपेक्षा अधिक आहेत. सन २०१२-१३ मध्ये सचिन दळवी हा (१२वी कला) विद्यार्थी ८० टक्के गुण मिळवून आदिवासी विभागात पहिला आला. नावीन्यपूर्ण उपक्रम व भौतिक सुविधांमुळे शाळेला महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विभागाचा ‘आदर्श आश्रमशाळा’ पुरस्कार मिळाला आहे. किशोरवयीन मुलींची आरोग्य व रक्तगट तपासणी, स्वसंरक्षणाचे धडे, मार्गदर्शनपर व्याख्याने, लेक वाचवा पथनाट्य, रांगोळी स्पर्धा, सुसज्ज व्यायामशाळा, पक्ष्यांसाठी चारा व पाण्याची सोय, विद्यार्थी नियतकालिके, वृक्षारोपण, वृक्षदिंडी, पर्यावरण संदेश नाटिका, क्षेत्रभेटी, वनभोजन, ‘पाणी आडवा-पाणी जिरवा’अंतर्गत पाझर तलाव निर्मिती ही शाळेची वैशिष्ट्ये आहेत.