शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
3
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
4
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
5
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
6
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
7
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
8
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
9
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
10
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
11
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
12
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
13
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
14
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
15
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
16
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
17
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
18
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
19
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
20
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान

आदिवासी शिक्षणाचे ‘आदर्श विद्यापीठ’

By admin | Updated: November 3, 2023 15:12 IST

रियाज सय्यद, संगमनेर शैक्षणिक गुणवत्ता सिद्ध करणारी शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा ग्रामीण भागातील आदिवासी विद्यार्थ्यांचे ‘आदर्श विद्यापीठ’ ठरली आहे.

रियाज सय्यद, संगमनेरपठार भागात अकलापूरच्या अतिदुर्गम साडेसात एकर खडकाळ माळरानावर नंदनवन फुलवून शैक्षणिक गुणवत्ता सिद्ध करणारी शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा ग्रामीण भागातील आदिवासी विद्यार्थ्यांचे ‘आदर्श विद्यापीठ’ ठरली आहे. ‘विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास’ हे ध्येय घेवून १० आॅक्टोबर १९८९ रोजी आश्रमशाळेची स्थापना झाली. आश्रमशाळेने शैक्षणिक गुणवत्तेसह विविध उपक्रमांद्वारे ‘उपक्रमशील शाळा’ म्हणून प्रतिमा तयार केली. प्रारंभी १ ते ७ वीपर्यंत वर्ग होते. आज १२ वी कला व विज्ञान शाखांचे वर्ग भरतात. सुमारे ६०० आदिवासी विद्यार्थी शिक्षणाचे धडे गिरवतात. साडेसात एकर खडकाळ भागावर वृक्षराजींचे संगोपन करून परिसर हिरवागार केला आहे. ‘रद्दीतून ग्रंथालय’ या उपक्रमाद्वारे वर्तमानपत्रातील अभ्यासपूरक माहिती संकलित करून पुस्तिका तयार केली. ‘कचरामुक्त शाळा’ उपक्रमातून शाळा परिसर स्वच्छतेचा पायंडा पाडला आहे. ‘गांडूळखत’ प्रकल्पाद्वारे शाळेतील ओला कचरा, सुका कचरा वेगळा करून गांडूळखताची निर्मिती केली जाते. शेवगा, सुबाभूळ, अशोका, करंज, फुलझाडे, औषधी वनस्पती आदी प्रकारच्या झाडांची तयार केलेली ‘ट्री बँक’(रोपवाटिका) अतिशय सुंदर आहे. रोज पहाटे ५ वाजता स्वत: मुख्याध्यापक जी. डी. भांड विद्यार्थ्यांकडून सूर्यनमस्कारासह योगा व प्राणायाम करून घेतात. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शारीरिक व मानसिक विकासाला चालना मिळते. शाळेच्या क्रीडा विभागाचा नावलौकिक असून कल्पना केदार, सुनंदा भगत हिने धावण्यात राज्यस्तरावर चमकदार कामगिरी केली आहे. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना येथे मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. ‘भरारी’ या वार्षिक नियतकालिकातून शाळेचा लेखा-जोखा मांडला जातो. डिजीटल जमान्यात ‘वेबसाईट’ सुरू करणारी ही एकमेव शाळा आहे. दहावी व बारावीचे निकाल सतत ९० टक्क्यांपेक्षा अधिक आहेत. सन २०१२-१३ मध्ये सचिन दळवी हा (१२वी कला) विद्यार्थी ८० टक्के गुण मिळवून आदिवासी विभागात पहिला आला. नावीन्यपूर्ण उपक्रम व भौतिक सुविधांमुळे शाळेला महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विभागाचा ‘आदर्श आश्रमशाळा’ पुरस्कार मिळाला आहे. किशोरवयीन मुलींची आरोग्य व रक्तगट तपासणी, स्वसंरक्षणाचे धडे, मार्गदर्शनपर व्याख्याने, लेक वाचवा पथनाट्य, रांगोळी स्पर्धा, सुसज्ज व्यायामशाळा, पक्ष्यांसाठी चारा व पाण्याची सोय, विद्यार्थी नियतकालिके, वृक्षारोपण, वृक्षदिंडी, पर्यावरण संदेश नाटिका, क्षेत्रभेटी, वनभोजन, ‘पाणी आडवा-पाणी जिरवा’अंतर्गत पाझर तलाव निर्मिती ही शाळेची वैशिष्ट्ये आहेत.