शहरं
Join us  
Trending Stories
1
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
2
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका
3
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य
4
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
5
'टीम इंडिया'त मिळाली नाही संधी; अखेर परदेशी संघाकडून खेळला, पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक
6
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
7
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
8
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
9
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
10
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
11
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
12
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
13
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
14
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
15
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
16
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
17
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
18
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
19
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष
20
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल

आदिवासी शिक्षणाचे ‘आदर्श विद्यापीठ’

By admin | Updated: November 3, 2023 15:12 IST

रियाज सय्यद, संगमनेर शैक्षणिक गुणवत्ता सिद्ध करणारी शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा ग्रामीण भागातील आदिवासी विद्यार्थ्यांचे ‘आदर्श विद्यापीठ’ ठरली आहे.

रियाज सय्यद, संगमनेरपठार भागात अकलापूरच्या अतिदुर्गम साडेसात एकर खडकाळ माळरानावर नंदनवन फुलवून शैक्षणिक गुणवत्ता सिद्ध करणारी शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा ग्रामीण भागातील आदिवासी विद्यार्थ्यांचे ‘आदर्श विद्यापीठ’ ठरली आहे. ‘विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास’ हे ध्येय घेवून १० आॅक्टोबर १९८९ रोजी आश्रमशाळेची स्थापना झाली. आश्रमशाळेने शैक्षणिक गुणवत्तेसह विविध उपक्रमांद्वारे ‘उपक्रमशील शाळा’ म्हणून प्रतिमा तयार केली. प्रारंभी १ ते ७ वीपर्यंत वर्ग होते. आज १२ वी कला व विज्ञान शाखांचे वर्ग भरतात. सुमारे ६०० आदिवासी विद्यार्थी शिक्षणाचे धडे गिरवतात. साडेसात एकर खडकाळ भागावर वृक्षराजींचे संगोपन करून परिसर हिरवागार केला आहे. ‘रद्दीतून ग्रंथालय’ या उपक्रमाद्वारे वर्तमानपत्रातील अभ्यासपूरक माहिती संकलित करून पुस्तिका तयार केली. ‘कचरामुक्त शाळा’ उपक्रमातून शाळा परिसर स्वच्छतेचा पायंडा पाडला आहे. ‘गांडूळखत’ प्रकल्पाद्वारे शाळेतील ओला कचरा, सुका कचरा वेगळा करून गांडूळखताची निर्मिती केली जाते. शेवगा, सुबाभूळ, अशोका, करंज, फुलझाडे, औषधी वनस्पती आदी प्रकारच्या झाडांची तयार केलेली ‘ट्री बँक’(रोपवाटिका) अतिशय सुंदर आहे. रोज पहाटे ५ वाजता स्वत: मुख्याध्यापक जी. डी. भांड विद्यार्थ्यांकडून सूर्यनमस्कारासह योगा व प्राणायाम करून घेतात. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शारीरिक व मानसिक विकासाला चालना मिळते. शाळेच्या क्रीडा विभागाचा नावलौकिक असून कल्पना केदार, सुनंदा भगत हिने धावण्यात राज्यस्तरावर चमकदार कामगिरी केली आहे. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना येथे मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. ‘भरारी’ या वार्षिक नियतकालिकातून शाळेचा लेखा-जोखा मांडला जातो. डिजीटल जमान्यात ‘वेबसाईट’ सुरू करणारी ही एकमेव शाळा आहे. दहावी व बारावीचे निकाल सतत ९० टक्क्यांपेक्षा अधिक आहेत. सन २०१२-१३ मध्ये सचिन दळवी हा (१२वी कला) विद्यार्थी ८० टक्के गुण मिळवून आदिवासी विभागात पहिला आला. नावीन्यपूर्ण उपक्रम व भौतिक सुविधांमुळे शाळेला महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विभागाचा ‘आदर्श आश्रमशाळा’ पुरस्कार मिळाला आहे. किशोरवयीन मुलींची आरोग्य व रक्तगट तपासणी, स्वसंरक्षणाचे धडे, मार्गदर्शनपर व्याख्याने, लेक वाचवा पथनाट्य, रांगोळी स्पर्धा, सुसज्ज व्यायामशाळा, पक्ष्यांसाठी चारा व पाण्याची सोय, विद्यार्थी नियतकालिके, वृक्षारोपण, वृक्षदिंडी, पर्यावरण संदेश नाटिका, क्षेत्रभेटी, वनभोजन, ‘पाणी आडवा-पाणी जिरवा’अंतर्गत पाझर तलाव निर्मिती ही शाळेची वैशिष्ट्ये आहेत.