शहरं
Join us  
Trending Stories
1
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
2
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
3
वादग्रस्त आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर पुणे पोलिसांत हजर; मनाने आलेली नाही, सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप 
4
Waves Summit 2025: "भारतात पुरेसे सिनेसमागृहच नाहीत..." आमिर खानने व्यक्त केली खंत
5
केवळ १००० रुपयांनी गुंतवणूक करून तुमच्या मुलांना बनवू शकता कोट्यधीश; कोणती आहे ही स्कीम?
6
पाकिस्तानने भारताची भीती घेतली! पीओकेमधील हॉटेल्स अन् गेस्ट हाऊसमध्ये सैन्य; मदरसे बंद
7
पाकिस्तानने अटारी, वाघा बॉर्डरचे गेट उघडले; धास्ती एवढी की पाकिस्तानींनाही घेत नव्हते...
8
प्रेक्षकांचा सूरज चव्हाणला 'गोलीगत धोका', 'झापुक झुपूक'ने पहिल्या आठवड्यात केली फक्त इतकी कमाई
9
श्रीराम दर्शनाची ओढ लागली, ३०० वर्षे जुनी परंपरा मोडली; हनुमानगढीचे महंत मंदिराबाहेर पडले!
10
हवाई दलाचं जबरदस्त शक्तिप्रदर्शन, हायवेवर उतरवली मिराज, राफेलसह ही लढाऊ विमानं
11
सिद्धार्थ-मितालीच्या घरी आला छोटा पाहुणा, फोटो शेअर करत दिली गुड न्यूज
12
WhatsApp वेबवर व्हॉइस आणि व्हिडीओ कॉलिंग फीचर लाँच; आता तुम्ही थेट करू शकता कॉल
13
बजाज चेतकला एप्रिल फूल बनविले; टीव्हीएस पहिल्यांदाच नंबर १, विक्रीत ओला कुठे...
14
पाकिस्तानी हवाई क्षेत्र बंद; एअर इंडियाला 5000 कोटी रुपयांचा फटका बसण्याचा अंदाज...
15
दारूच्या व्यसनाने आई आणि चुलतीचा खून; बीड जिल्हा दोन हत्येच्या घटनांनी हादरला
16
पंकजा मुंडेंना कॉल अन् पाठवला अश्लील मेसेज, पुण्यातील तरुणाला पोलिसांनी केली अटक
17
CEOs चा १ तासाचा पगार सामान्य कर्मचाऱ्याच्या वर्षाच्या पगाराइतका, एका रिपोर्टमध्ये झाले अनेक आश्चर्यकारक खुलासे
18
अन्न पुन्हा गरम करणं आरोग्यासाठी ठरतंय घातक; 'या' ५ गोष्टी टाळाल तरच ठणठणीत राहाल
19
 संतापजनक! मासिक पाळीत स्वयंपाक करणं महिलेच्या जीवावर बेतलं,नणंद आणि सासूने खून केल्याचा आरोप, दोन मुलं अनाथ
20
नवी मुंबईत ठाकरे गटाला खिंडार! माजी नगरसेवकांचे उद्धवसेनेला जय महाराष्ट्र, शिंदेसेनेत प्रवेश

वाळू माफीयांविरोधात कारवाईची मोहीम

By admin | Updated: October 29, 2014 23:57 IST

अहमदनगर: जिल्ह्यातील वाळू माफीयांविरोधात प्रशासनाने कडक पावले उचलली असून, महिनाभरात अवैध वाळू उपसा करणाऱ्या २२ वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे़

अहमदनगर: जिल्ह्यातील वाळू माफीयांविरोधात प्रशासनाने कडक पावले उचलली असून, महिनाभरात अवैध वाळू उपसा करणाऱ्या २२ वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे़ इतर गौण खणिज चोरी प्रकरणी आठ वाहनांवरही कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे़जिल्ह्यातील वाळूचे लिलाव अद्याप झालेले नाहीत़ याविषयीचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने महसूल खात्याकडे पाठविला आहे़ मात्र त्यास अद्याप मंजुरी मिळालेली नाही़ नदीपात्रातून वाळू उपसा करण्यास बंदी आहे़ असे असले तरी नियम धाब्यावर बसवून सर्रास वाळू उपसा सुरू आहे़ नदीपात्रात वाहने उतरवून वाळू उपसा होत असल्याचे प्रकार उघडकीस आले़ नदी पात्र परिसरातील नागरिकांनी ही बाब प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली़ त्यामुळे जिल्हा प्रशासनाने वाळू माफीयांविरोधात कडक मोहीम हाती घेतली आहे़ प्रशासनाच्या अहवालानुसार गत सप्टेंबर अखेर जिल्ह्यातील विविध ठिकाणी छापे टाकून २२ वाहने पकडण्यात आली आहेत़ प्रशासनाने पकडलेल्या वाहनांची संख्या ४५१ झाली़ इतर मुरुम व खडीचे डंपरही पकडण्यात आले असून, दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे़ त्यामुळे वाळू चोरी प्रकरणांना आळा बसला असल्याचे प्रशासकीय सूत्रांकडून सांगण्यात आले आहे़नदी पात्रातील वाळू उपसून ती शहरात आणून विकली जात आहे़ वाळू चोरी करणारे मोठे रॅकेटच जिल्ह्यात कार्यरत आहेत़ नदी पात्र कोरडे पडले आहेत़ त्यामुळे वाळूचा सर्रास उपसा केला जात आहे़ ही वाळू शहरात आणून विकली जाते़ मात्र याकडे पोलीस प्रशासनाचेही दुर्लक्ष झाले आहे़ वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्याच्या सूचना पोलीस खात्यास करण्यात आल्या़ परंतु त्याचा फारसा परिणाम झालेला दिसत नाही़ विधानसभा निवडणुकीतून मोकळीक मिळाल्याने जिल्हा प्रशासनानेच कारवाईची मोहीम उघडली असून, चालू महिन्यांत जिल्हाभर कारवाई करण्यात आली आहे़या पुढील काळात कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासकीय सूत्रांकडून सांगण्यात आले़(प्रतिनिधी)