-----------
शहरातील गंभीर अपघात
२१ घटना
२४ जणांचा मृत्यू
-------
इतर अपघात
२४ घटना
२४ जण गंभीर जखमी
-------
किरकोळ अपघात
३ घटना
-----------
मोबाइलवर बोलणे धोक्याचे
वाहन चालविताना मोबाइलवर बोलण्याचे व्यसनच अनेकांना जडले आहे. अचानक वाहनाला नियंत्रित करण्याची वेळ आल्यास त्यातून अपघात घडतो. त्यामुळे पोलिसांनी अशा चालकांवर कारवाई करावी व सक्तीने दंड वसूल करावा, अशी मागणी होत आहे.
-----------
वाहतूक शाखा बंद
अपघाताच्या घटनांमध्ये दररोज वाढ होत असताना येथील वाहतूक शाखा बंद करण्यात आली आहे. जिल्हा पोलीस प्रमुखांनी नुकताच हा निर्णय घेतला. महामार्गांवरील वाहतूक सुरळीत करणे, अपघातस्थळी तातडीची मदत, गर्दीवर नियंत्रण अशी कामे या शाखेतील कर्मचारी पाहत होते. एक अधिकारी व १२ कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते. सर्व कर्मचारी आता शहर पोलीस ठाण्यात रुजू झाले आहेत.
---------
हेल्मेटचा वापर अभावानेच
अनेकदा हेल्मेट सक्ती करूनही नागरिकांनी त्या निर्णयाला केराची टोपली दाखविली. त्यामुळे वाहन चालकांकडून अभावानेच हेल्मेटचा वापर दिसून येतो.
------