शहरं
Join us  
Trending Stories
1
Sambhajinagar Accident: संभाजीनगरात भीषण अपघात, भरधाव कार दुभाजकाला धडकून उलटली, ३ जण जागीच ठार!
2
IND vs ENG: केएल राहुलने शुभमन गिलकडून घेतली 'कॅप्टन्सी', पराभवापूर्वी सामन्यात अचानक काय घडलं?
3
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा वाल्मीक कराडच 'डायरेक्टर'; न्यायालयात ३ तास काय झाला युक्तिवाद?
4
IND vs ENG: आधी चार झेल सोडले, नंतर हसत-खेळत केली 'तशी' कृती... यशस्वी जैस्वालवर संतापले नेटिझन्स
5
मदरशामध्ये अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत ठेवले अनैसर्गिक संबंध, व्हिडीओही काढले, सोशल मीडियावर शेअर केले, आरोपी अटकेत
6
पाकिस्तान सुधारणार नाही, राजौरीमध्ये नियंत्रण रेषेवर घुसखोरीचा प्रयत्न अयशस्वी; दहशतवादी गोळीबार करून पळून गेले
7
Iran Israel Conflict: इराण इस्रायल प्रकरणी भारत शांत का? एक चूक आणि ५७,४४८ कोटी येतील धोक्यात
8
Pramod Kondhare: पाठीमागून आला आणि...; भाजप पदाधिकाऱ्याचं महिला पोलीसाशी गैरवर्तन, गुन्हा दाखल
9
जगभर: चिनी राष्ट्राध्यक्षांच्या ‘अज्ञात’ मुलीची ‘हेरगिरी’! शी जिनपिंग यांची मुलगी कोण?
10
पीएफ खात्यातून ७२ तासांत काढता येणार ५ लाख रुपये; एटीएम आणि यूपीआयद्वारेही पैसे काढता येणार
11
दोन पत्नी असल्याने आमदारकी रद्द होत नाही; शिवसेना आमदाराला मुंबई उच्च न्यायालयात मोठा दिलासा
12
Mumbra Local Train Accident: ‘त्या’ प्रवाशामुळे मुंब्र्यात अपघात? दोन्ही ट्रेनमधील प्रवाशांमध्ये होते फक्त ०.७५ मीटर अंतर
13
"...म्हणून आम्ही हरलो", पराभवानंतर शुभमन गिलने यांच्यावर फोडलं अपयशाचं खापर 
14
नीरज चोप्राचं सोनेरी यश, ओस्ट्रावा गोल्डन स्पाईक स्पर्धेत जिंकलं सुवर्णपदक   
15
आजचे राशीभविष्य - २५ जून २०२५, नोकरीत पदोन्नतीची शक्यता, वैवाहिक सौख्य लाभेल!
16
विशेष लेख: आणीबाणीने देशाला शिकवलेले तीन धडे
17
Samruddhi Mahamarg: 'समृद्धी'वर शहापूरजवळ ओव्हरपासच्या पुलावर १९ दिवसांतच पडले खड्डे
18
लेख: तोटा सोसून बँकेच्या बचत खात्यात लोकांनी पैसे का ठेवावे?
19
शक्तिपीठ महामार्ग होणारच; 'कोल्हापुरात महामार्ग नको', कोल्हापूरच्या मंत्र्यांची भूमिका
20
India vs England: जिथे कमी तिथे केएल राहुल!

महापालिकेत सभापती बदलाच्या हलचालींना वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:31 IST

अहमदनगर : महापालिका स्थायी समितीचे निम्मे आठ सदस्य सोमवारी निवृत्त होत असून, नवीन सदस्य निवडीसाठी सत्ताधाऱ्यांवर दबाव वाढला आहे. ...

अहमदनगर : महापालिका स्थायी समितीचे निम्मे आठ सदस्य सोमवारी निवृत्त होत असून, नवीन सदस्य निवडीसाठी सत्ताधाऱ्यांवर दबाव वाढला आहे. महापौरांनी महासभा घेऊन नवीन सदस्यांची निवड केल्यास सभापतीपदाच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा होईल. सभापतीपदासाठी माजी सभागृह नेते स्वप्निल शिंदे व राष्ट्रवादीकडून कुमार वाकळे यांच्या नावाची चर्चा असल्याने सभापतीपदासाठी चांगलीच चुरस पाहायला मिळणार आहे.

महापालिकेत स्थायी ही महत्त्वाची समिती आहे. स्थायी समितीवर सदस्य म्हणून जाण्यासाठी नगरसेवकांत रस्सीखेच असते. या समितीतील आठ सदस्य दरवर्षी निवृत्त होतात. उर्वरित आठ सदस्यदेखील दोन वर्षांनी निवृत्त होतात. स्थायीतील निम्मे आठ सदस्य सोमवारी निवृत्त होत असून, नवीन आठ सदस्य निवडीकरिता महासभा बोलाविण्याबाबत नगरसचिव विभागाने महापौर कार्यालयास प्रस्ताव दिला आहे. परंतु, नवीन आठ सदस्यांची निवड झाल्यास स्थायी समितीची १६ सदस्य संख्या पूर्ण होऊन सभापतीपदाची निवडणूक लागेल. नगरसेवक मनोज कोतकर हे सप्टेंबरमध्ये सभापती झाले. सभापतीपदाची निवडणूक जाहीर झाल्यास कोतकर यांना चार महिन्यांतच सभापतीपद गमवावे लागेल. सभापतीपद कायम ठेवण्यासाठी कोतकर यांचे पडद्याआडून प्रयत्न सुरू आहेत. परंतु, राजकीय पक्षांकडून नगरसेवकांना सदस्यपदाचे शब्द दिले गेलेले आहेत. इच्छुकांचा सभा घेण्यासाठी दबाव वाढू लागला आहे. त्यात नवीन सदस्य निवडल्यास सभापती निवडणूक जाहीर होणार असल्याने सत्ताधाऱ्यांसमोर राजकीय पेच निर्माण झाला आहे. सभापतीपदासाठी माजी सभागृह नेते शिंदे व नगरसेवक वाकळे यांचे नाव पुढे येत आहे. महापौर वाकळे हे इच्छुकांची नाराजी ओढावून घेतील, असे वाटत नाही. कारण वाकळे यांच्या दोन वर्षांच्या कार्यकाळात कुठलाही राजकीय वाद निर्माण झालेला नाही. त्यामुळे महापौर कार्यालयाकडून महासभेची तारीख लवकरच जाहीर केली जाईल, असेही बोलले जाते.

....

संग्राम जगतापांच्या भूमिकेकडे लक्ष

महापालिकेत राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर भाजपची सत्ता आहे. मागील सभापतीपदाच्या निवडणुकीत भाजपचे मनोज कोतकर हे राष्ट्रवादीत दाखल झाले. राष्ट्रवादीकडून ते बिनविरोध सभापती झाले. कोतकर यांना सभापती करण्यासाठी आमदार संग्राम जगताप यांनी पुढाकार घेतलेला होता. कोतकर हे सभापती होऊन पाच महिनेच झाले आहेत. कोतकर यांना मुदतवाढ की दुसऱ्याला संधी द्यायची, याबाबतचा निर्णयही जगताप यांच्याशी चर्चा करून घेतला जाईल, असे बोलले जाते. त्यामुळे जगताप काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.