शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वे ठप्प; मेट्रो सेवा सुरळीत, प्रवाशांना अल्प दिलासा
2
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधू बाजी मारणार की महायुती चितपट होणार? निकालाची उत्सुकता शिगेला
3
पापा की परी... सावधान! स्कुटरच्या हँडलमधून साप निघाला साप, तरुणीने उडीच मारली...
4
मिठी नदी धोक्याच्या पातळीवर; नदीलगतच्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं, बीकेसीत पाणी साचण्याची शक्यता
5
VIDEO : किन्नरच्या सौंदर्यावर नेटकरी 'फिदा'! व्हिडिओ पाहून युजर्स म्हणतायत...; तुम्हीही थक्क व्हाल!
6
Mangalagauri 2025: मंगळगौरीचे पावित्र्य आणि माधुर्य दर्शवणारे दीनानाथ दलाल यांचे चित्र; पहा बारकावे!
7
ऋतुराजनं बॉलिंगमध्ये आजमावला हात; सिक्सर मारल्यावर विकेट्स घेत हिशोब केला चुकता (VIDEO)
8
ती गुढ आग... ज्यात भारताचं सेमीकंडक्टर बनवण्याचं स्वप्न झालं होतं जळून खाक, ७ फेब्रुवारी १९८९ रोजी नेमकं काय झालं होतं?
9
सावधान! अनोळखी व्यक्तीला कॅशच्या बदल्यात पैसे ट्रान्सफर करताय? 'या' एका चुकीमुळे जावं लागेल थेट तुरुंगात
10
Himachal Pradesh: हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटी; अनेक घरे, गाड्या गेल्या वाहून, ४०० रस्ते बंद!
11
Miss Universe India: २२ वर्षांच्या मनिका विश्वकर्माने जिंकला 'मिस युनिव्हर्स इंडिया २०२५' चा खिताब, कोण आहे ही सुंदरी?
12
Indian Railway: आता रेल्वेतही विमानासारखा नियम; ‘जादा' सामान बाळगल्यास दंड!
13
ट्रम्प यांना भेटायला गेलेल्या झेलेन्स्कींनी मेलानियांसाठी पाठवले खास पत्र; काय आहे या पत्रात?
14
आज उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवाराची घोषणा करणार 'I.N.D.I.A.'? ही 3 नावं शर्यतीत!
15
पैसे दुप्पट करते ही सरकारी योजना; ५ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळेल १० लाखांचा गॅरंटीड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
पतीच्या निधनामुळे खचलेल्या तिच्या आयुष्यात 'तो' आला अन् मोठा झटका देऊन गेला! तरुणीसोबत घडलं असं काही की...
17
LIC ची मोठी घोषणा! बंद पडलेल्या पॉलिसी पुन्हा सुरू करण्याची सुवर्णसंधी; विलंब शुल्कातही मोठी सूट
18
मुंबईतील सर्व सरकारी कार्यालयांना सुट्टी; खासगी कंपन्यांना वर्क फ्रॉम देण्याच्या सूचना, शाळा, कॉलेज बंद
19
रोनाल्डोचा साखरपुडा आणि सौदीचे ‘रहस्य’! स्थानिकांना वेगळा नियम आणि स्टारला वेगळा न्याय, का?
20
ठाकरे बंधू किंवा महायुती कुणीही निवडणूक जिंकली तरी बेस्ट कर्मचाऱ्यांना न्याय मिळेल का?

पाणीसाठ्यांबाबत सरकार दक्ष

By admin | Updated: September 22, 2015 00:23 IST

अहमदनगर: परतीच्या मान्सूनने जिल्ह्यातील चित्र पालटले आहे़ मात्र, दुष्काळ दूर झाला असला तरी उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी केल्या

अहमदनगर: परतीच्या मान्सूनने जिल्ह्यातील चित्र पालटले आहे़ मात्र, दुष्काळ दूर झाला असला तरी उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी केल्या असून, त्यादृष्टीने मोठे प्रकल्प, छोटे तलाव आणि बंधाऱ्यावर प्रशासनाचे लक्ष राहील़ तसेच ग्रामसभेत पाणी व चाऱ्याचे नियोजन केले जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी पत्रकारांना दिली़मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी दुष्काळी जिल्ह्यांचा व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे आढावा घेतला़ या बैठकीनंतर कवडे पत्रकारांशी बोलत होते़ मागील आॅगस्ट महिन्यात जिल्ह्यात भीषण स्थिती निर्माण झाली होती़ मात्र, गेल्या वीस दिवसांत झालेल्या पावसाने चित्र पालटले आहे़ या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत नगर जिल्ह्यातील पाऊस, चारा, टँकर आणि वाढलेले पाणीसाठे, याची माहिती देण्यात आली़ इतर जिल्ह्यांतील स्थिती समाधानकारक असल्याचे यानिमित्ताने समोर आल्याचे कवडे यांनी सांगितले़ पावसामुळे दुष्काळाची दाहकता कमी होण्यास मदत झाली आहे़ परतीच्या मान्सूनने दुष्काळग्रस्त तालुक्यांत दमदार हजेरी लावली़ टँकरची संख्या घटली़ दक्षिण नगर जिल्ह्यातील उद्भवही ओसंडून वाहू लागले आहेत़ रब्बी हंगामात मोठ्या प्रमाणात चारा उपलब्ध होईल़ पण, पुन्हा पूर्वीप्रमाणे स्थिती निर्माण होणार नाही, यावर बैठकीत चर्चा झाली़ कमीत कमी पाण्यात अधिकाधिक उत्पादन घेण्याबाबत शेतकऱ्यांना कृषी विभागामार्फत मार्गदर्शन केले जाईल़ मोठ्या प्रकल्पांतील पाण्याचा गैरवापर होणार नाही, यासाठी महावितरण, पोलीस, महसूल आणि कृषी विभागांना आदेश देण्यात आले आहेत़ वेळप्रसंगी गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. येत्या २ आॅक्टोबर रोजी होणाऱ्या ग्रामसभेत गावातील पाणी व चाऱ्याचे नियोजन केले जाईल़ ग्रामसभेसाठी प्रशासनाचे अधिकारी उपस्थित राहतील़ जनावरांच्या चाऱ्यासाठी योग्य प्रयत्न केले जातील़ रब्बी हंगामात जवळपास ६५० हेक्टरवर ज्वारीचे पिक घेतले जाईल, असा प्रशासनाचा अंदाज आहे़ चारा उपलब्ध होणार असल्याने चारा छावण्या सुरू करण्याची आवश्यकता भासणार नाही, असा विश्वास कवडे यांनी यावेळी व्यक्त केला़