शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
2
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
3
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
4
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
5
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
6
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
7
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
8
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
9
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
10
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
11
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
12
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
13
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
14
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
15
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
16
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
17
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
18
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
19
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
20
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
Daily Top 2Weekly Top 5

पाणीसाठ्यांबाबत सरकार दक्ष

By admin | Updated: September 22, 2015 00:23 IST

अहमदनगर: परतीच्या मान्सूनने जिल्ह्यातील चित्र पालटले आहे़ मात्र, दुष्काळ दूर झाला असला तरी उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी केल्या

अहमदनगर: परतीच्या मान्सूनने जिल्ह्यातील चित्र पालटले आहे़ मात्र, दुष्काळ दूर झाला असला तरी उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी केल्या असून, त्यादृष्टीने मोठे प्रकल्प, छोटे तलाव आणि बंधाऱ्यावर प्रशासनाचे लक्ष राहील़ तसेच ग्रामसभेत पाणी व चाऱ्याचे नियोजन केले जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी पत्रकारांना दिली़मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी दुष्काळी जिल्ह्यांचा व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे आढावा घेतला़ या बैठकीनंतर कवडे पत्रकारांशी बोलत होते़ मागील आॅगस्ट महिन्यात जिल्ह्यात भीषण स्थिती निर्माण झाली होती़ मात्र, गेल्या वीस दिवसांत झालेल्या पावसाने चित्र पालटले आहे़ या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत नगर जिल्ह्यातील पाऊस, चारा, टँकर आणि वाढलेले पाणीसाठे, याची माहिती देण्यात आली़ इतर जिल्ह्यांतील स्थिती समाधानकारक असल्याचे यानिमित्ताने समोर आल्याचे कवडे यांनी सांगितले़ पावसामुळे दुष्काळाची दाहकता कमी होण्यास मदत झाली आहे़ परतीच्या मान्सूनने दुष्काळग्रस्त तालुक्यांत दमदार हजेरी लावली़ टँकरची संख्या घटली़ दक्षिण नगर जिल्ह्यातील उद्भवही ओसंडून वाहू लागले आहेत़ रब्बी हंगामात मोठ्या प्रमाणात चारा उपलब्ध होईल़ पण, पुन्हा पूर्वीप्रमाणे स्थिती निर्माण होणार नाही, यावर बैठकीत चर्चा झाली़ कमीत कमी पाण्यात अधिकाधिक उत्पादन घेण्याबाबत शेतकऱ्यांना कृषी विभागामार्फत मार्गदर्शन केले जाईल़ मोठ्या प्रकल्पांतील पाण्याचा गैरवापर होणार नाही, यासाठी महावितरण, पोलीस, महसूल आणि कृषी विभागांना आदेश देण्यात आले आहेत़ वेळप्रसंगी गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. येत्या २ आॅक्टोबर रोजी होणाऱ्या ग्रामसभेत गावातील पाणी व चाऱ्याचे नियोजन केले जाईल़ ग्रामसभेसाठी प्रशासनाचे अधिकारी उपस्थित राहतील़ जनावरांच्या चाऱ्यासाठी योग्य प्रयत्न केले जातील़ रब्बी हंगामात जवळपास ६५० हेक्टरवर ज्वारीचे पिक घेतले जाईल, असा प्रशासनाचा अंदाज आहे़ चारा उपलब्ध होणार असल्याने चारा छावण्या सुरू करण्याची आवश्यकता भासणार नाही, असा विश्वास कवडे यांनी यावेळी व्यक्त केला़