शहरं
Join us  
Trending Stories
1
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
2
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
3
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
4
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
5
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
6
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
7
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
8
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
9
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
10
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
11
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
12
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
13
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार
14
“धर्म-भाषा काहीही असो, आपण सर्व हिंदू आहोत; ब्रिटिशांनी आपल्यात फूट पाडली”- मोहन भागवत
15
"...तोपर्यंत मी तुरुंगात राहण्यास तयार आहे"; सोनम वांगचुक यांनी जोधपूरहून भावाकडे पाठवला मेसेज
16
INDW vs PAKW: अचानक मैदानात पसरला पांढरा धूर: भारत-पाक सामन्यात नेमकं काय घडलं?
17
IND W vs PAK W : पुरुष असो वा महिला, नो हँडशेक फॉर्म्युला! हरमनप्रीतनं पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ
18
‘’२०२७ चा वर्ल्डकप खेळायला मिळाला तर…’’, बोलता बोलता रोहित झाला होता भावूक, तो व्हिडीओ होतोय व्हायरल  
19
बिहारमध्ये केव्हा होणार विधानसभा निवडणूक? CEC ज्ञानेश कुमार यांची घोषणा; SIR संदर्भातही मोठं विधान
20
गुजरातमधून आणलेला सिंह तामिळनाडूच्या प्राणीसंग्रहालयातून पळाला; स्थानिकांमध्ये घबराट...

पाणीसाठ्यांबाबत सरकार दक्ष

By admin | Updated: September 22, 2015 00:23 IST

अहमदनगर: परतीच्या मान्सूनने जिल्ह्यातील चित्र पालटले आहे़ मात्र, दुष्काळ दूर झाला असला तरी उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी केल्या

अहमदनगर: परतीच्या मान्सूनने जिल्ह्यातील चित्र पालटले आहे़ मात्र, दुष्काळ दूर झाला असला तरी उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी केल्या असून, त्यादृष्टीने मोठे प्रकल्प, छोटे तलाव आणि बंधाऱ्यावर प्रशासनाचे लक्ष राहील़ तसेच ग्रामसभेत पाणी व चाऱ्याचे नियोजन केले जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी पत्रकारांना दिली़मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी दुष्काळी जिल्ह्यांचा व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे आढावा घेतला़ या बैठकीनंतर कवडे पत्रकारांशी बोलत होते़ मागील आॅगस्ट महिन्यात जिल्ह्यात भीषण स्थिती निर्माण झाली होती़ मात्र, गेल्या वीस दिवसांत झालेल्या पावसाने चित्र पालटले आहे़ या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत नगर जिल्ह्यातील पाऊस, चारा, टँकर आणि वाढलेले पाणीसाठे, याची माहिती देण्यात आली़ इतर जिल्ह्यांतील स्थिती समाधानकारक असल्याचे यानिमित्ताने समोर आल्याचे कवडे यांनी सांगितले़ पावसामुळे दुष्काळाची दाहकता कमी होण्यास मदत झाली आहे़ परतीच्या मान्सूनने दुष्काळग्रस्त तालुक्यांत दमदार हजेरी लावली़ टँकरची संख्या घटली़ दक्षिण नगर जिल्ह्यातील उद्भवही ओसंडून वाहू लागले आहेत़ रब्बी हंगामात मोठ्या प्रमाणात चारा उपलब्ध होईल़ पण, पुन्हा पूर्वीप्रमाणे स्थिती निर्माण होणार नाही, यावर बैठकीत चर्चा झाली़ कमीत कमी पाण्यात अधिकाधिक उत्पादन घेण्याबाबत शेतकऱ्यांना कृषी विभागामार्फत मार्गदर्शन केले जाईल़ मोठ्या प्रकल्पांतील पाण्याचा गैरवापर होणार नाही, यासाठी महावितरण, पोलीस, महसूल आणि कृषी विभागांना आदेश देण्यात आले आहेत़ वेळप्रसंगी गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. येत्या २ आॅक्टोबर रोजी होणाऱ्या ग्रामसभेत गावातील पाणी व चाऱ्याचे नियोजन केले जाईल़ ग्रामसभेसाठी प्रशासनाचे अधिकारी उपस्थित राहतील़ जनावरांच्या चाऱ्यासाठी योग्य प्रयत्न केले जातील़ रब्बी हंगामात जवळपास ६५० हेक्टरवर ज्वारीचे पिक घेतले जाईल, असा प्रशासनाचा अंदाज आहे़ चारा उपलब्ध होणार असल्याने चारा छावण्या सुरू करण्याची आवश्यकता भासणार नाही, असा विश्वास कवडे यांनी यावेळी व्यक्त केला़