शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

विकासाच्या मुद्यावर ‘आप’ने साधला जनतेशी संवाद

By अरुण वाघमोडे | Updated: June 17, 2023 16:02 IST

सावेडी येथील पारिजात चौकातून शनिवारी स्वराज्य संवाद यात्रेस प्रारंभ झाला.

अहमदनगर: नगर शहरातील विकासात्मक मुद्दयांवर व प्रश्‍नांवर चर्चा करण्यासाठी आम आदमी पार्टीच्यावतीने स्वराज्य संवाद यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. शहर व उपनगरातील विविध भागात आपच्या पदाधिकाऱ्यांनी संवाद बैठका घेऊन शहरातील विविध प्रश्नांबाबत चर्चा केली. तर नागरिकांच्या मनातील भावना जाणून घेऊन आपच्यावतीने दिल्लीच्या धर्तीवर करण्यात आलेल्या विकासाची माहिती देण्यात आली.

सावेडी येथील पारिजात चौकातून शनिवारी स्वराज्य संवाद यात्रेस प्रारंभ झाला. यावेळी पक्षाचे शहर जिल्हा संघटक प्रा. अशोक डोंगरे, कार्याध्यक्ष भरत खाकाळ, राजेंद्र कर्डिले, गौतम कुलकर्णी, दिलीप घुले, गणेश मारवाडी, संपत मोरे, रवी सातपुते, प्रकाश फराटे आदींसह नागरिक उपस्थित होते.

प्रा. अशोक डोंगरे म्हणाले  आम आदमी पार्टीने विकास हाच अजेंडा घेऊन राजकारण केले आहे. जातीय राजकारणाला पर्याय देण्यासाठी केंद्र व राज्यात आपने पर्याय उभा केला आहे. दिल्लीत शिक्षण, व्यापार, आयटी व उद्योग क्षेत्रात क्रांती घडवून आणली आहे. अनेक खर्चिक सोयी-सुविधा नागरिकांना तेथे मोफत मिळत आहे. त्या तुलनेत महाराष्ट्रात ही व्यवस्था व विकास दिसत नसून, येथे फक्त जातीय राजकारण सुरु आहे. विकास साधण्यासाठी जनतेने आपकडे सत्तेची सूत्र देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. कार्याध्यक्ष भरत खाकाळ यांनी आम आदमी पार्टीच्या वतीने पंढरपूर या ठिकाणापासून रायगड पर्यंत निघालेल्या स्वराज्य स्वराज्य यात्रेला लाभलेल्या जनतेच्या प्रतिसादाची माहिती दिली.