शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

विकासाच्या मुद्यावर ‘आप’ने साधला जनतेशी संवाद

By अरुण वाघमोडे | Updated: June 17, 2023 16:02 IST

सावेडी येथील पारिजात चौकातून शनिवारी स्वराज्य संवाद यात्रेस प्रारंभ झाला.

अहमदनगर: नगर शहरातील विकासात्मक मुद्दयांवर व प्रश्‍नांवर चर्चा करण्यासाठी आम आदमी पार्टीच्यावतीने स्वराज्य संवाद यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. शहर व उपनगरातील विविध भागात आपच्या पदाधिकाऱ्यांनी संवाद बैठका घेऊन शहरातील विविध प्रश्नांबाबत चर्चा केली. तर नागरिकांच्या मनातील भावना जाणून घेऊन आपच्यावतीने दिल्लीच्या धर्तीवर करण्यात आलेल्या विकासाची माहिती देण्यात आली.

सावेडी येथील पारिजात चौकातून शनिवारी स्वराज्य संवाद यात्रेस प्रारंभ झाला. यावेळी पक्षाचे शहर जिल्हा संघटक प्रा. अशोक डोंगरे, कार्याध्यक्ष भरत खाकाळ, राजेंद्र कर्डिले, गौतम कुलकर्णी, दिलीप घुले, गणेश मारवाडी, संपत मोरे, रवी सातपुते, प्रकाश फराटे आदींसह नागरिक उपस्थित होते.

प्रा. अशोक डोंगरे म्हणाले  आम आदमी पार्टीने विकास हाच अजेंडा घेऊन राजकारण केले आहे. जातीय राजकारणाला पर्याय देण्यासाठी केंद्र व राज्यात आपने पर्याय उभा केला आहे. दिल्लीत शिक्षण, व्यापार, आयटी व उद्योग क्षेत्रात क्रांती घडवून आणली आहे. अनेक खर्चिक सोयी-सुविधा नागरिकांना तेथे मोफत मिळत आहे. त्या तुलनेत महाराष्ट्रात ही व्यवस्था व विकास दिसत नसून, येथे फक्त जातीय राजकारण सुरु आहे. विकास साधण्यासाठी जनतेने आपकडे सत्तेची सूत्र देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. कार्याध्यक्ष भरत खाकाळ यांनी आम आदमी पार्टीच्या वतीने पंढरपूर या ठिकाणापासून रायगड पर्यंत निघालेल्या स्वराज्य स्वराज्य यात्रेला लाभलेल्या जनतेच्या प्रतिसादाची माहिती दिली.