शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

वेल्हाळे गावातून जलजीवन मिशन योजनेचे तीस लाखांचे पाईप चोरीला

By शेखर पानसरे | Updated: August 4, 2023 20:56 IST

पाईप चोरणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

संगमनेर : संगमनेर तालुक्यातील वेल्हाळे गावातून जलजीवन मिशन योजनेचे तीस लाख ३ हजार ७८४ रुपये किमतीचे पाईप चोरीला गेल्याचे गुरुवारी (दि.०३) दुपारी चार वाजेच्या सुमारास समोर आले. या प्रकरणी शुक्रवारी (दि.०४) संगमनेर शहर पोलिस ठाण्यात पाईप चोरणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

जलजीवन मिशन योजनेचे पाईप चोरीला गेल्या प्रकरणी संगमनेरातील आर. एम. कातोरे ॲण्ड कंपनी येथे अभियंता म्हणून नोकरीला असलेल्या अंकेत राजेंद्र वाकचौरे (रा. पेमगिरी, ता. संगमनेर) यांनी संगमनेर शहर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवून घेतला. वेल्हाळे येथील भांडमळा टाळीजवळ निमगाव भोजापूर व इतर तीन गावे या कामाअंतर्गत जलजीवन मिशन योजनेचे काम सुरू आहे. तेथे ४७० पाईप भांडमळा टाकीजवळ वेल्हाळे येथे ठेवले होते.

देखरेखीसाठी सुरक्षा रक्षक नेमलेले नसल्याने अभियंता वाकचौरे हेच अधूनमधून पाहणी करण्यासाठी जात होते. एका पाईपची लांबी ५.५ मीटर १०० एमएम डीआयके ७ डायचे, ४ इंची पाईप एका पाईपचे वजन अंदाजे ११५ किलो आणि किमत ९ हजार ३९१ रूपये इतकी आहे. एका पाईपचे वजन साधारण ११५ किलो असताना आणि एवढ्या मोठ्या संख्येने ठेवलेले पाईप नेमके कुणी चोरले यांचा तपास करणे पोलिसांसमोर आव्हान आहे. शहर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक जे. एन. दहातोंडे अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :SangamnerसंगमनेरCrime Newsगुन्हेगारीRobberyचोरी