शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
3
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
4
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
5
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
6
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
7
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
8
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
9
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
10
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
11
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
12
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
13
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
14
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
15
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
16
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
17
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
18
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
19
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
20
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त

११८५ गावांसाठी ८४ कोटींचा टंचाई कृती आराखडा मंजूर

By चंद्रकांत शेळके | Updated: December 12, 2023 20:43 IST

टँकरसाठी सर्वाधिक ८० कोटींची तरतूद : जूनपर्यंतच्या संभाव्य टंचाईवर होणार खर्च

अहमदनगर : जिल्ह्यात यंदा झालेल्या कमी पर्जन्यमानामुळे येणाऱ्या उन्हाळ्यात होणारी संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने ११८५ गावांसाठी ८४ कोटी ४५ लाख रुपये खर्चाच्या टंचाई कृती आराखड्यास मंजुरी दिली आहे. यात सर्वाधिक ८० कोटींची तरतूद टँकरसाठी करण्यात आली आहे.

जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाने ॲाक्टोबर २०२३ ते जून २०२४ या कालावधीत पाणीटंचाई निवारणार्थ करावयाच्या उपाययोजनांचा संभाव्य कृती आराखडा तयार करून अंतिम मान्यतेसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवला होता. काल (सोमवारी) जिल्हाधिकाऱ्यांनी या आराखड्यास मंजुरी दिली. चालू वर्षी जून ते सप्टेंबर या पावसाळ्याच्या कालावधीत कमी पाऊस झाला. पहिले दोन महिने तर पावसाने ओढ दिली होती. सप्टेंबरअखेर झालेल्या पावसाने काही प्रमाणात पाण्याची उपलब्धता झाली. जिल्ह्याची पर्जन्यमानाची सरासरी ४४८ मिलिमीटर असताना यंदा केवळ ४०० मिलिमीटर पाऊस झालेला आहे. म्हणजे १६ टक्के पावसाची तूट आहे. अजून हिवाळाच सुरू असतानाही जिल्ह्यात ९ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. त्यामुळे उन्हाळ्यात पाण्याची टंचाई आणखी तीव्र होईल, या अंदाजाने हा टंचाई आराखडा तयार करण्यात आला आहे. हा सर्व निधी नैसर्गिक आपत्ती अनुदानातून खर्च होणार आहे. आराखड्यात यावर होणार खर्च

२९ गावांत आणि १६६ वाड्या-वस्त्यांवर नळयोजना प्रगतिपथावर आहेत. त्या पूर्ण करण्यावर भर दिला जाईल. शिवाय अस्तित्वातील एका नळ योजनेच्या विशेष दुरुस्तीसाठी दोन लाखांचा खर्च गृहीत धरण्यात आला आहे. १२ गावे आणि २ वाड्या अशा १४ ठिकाणी नवीन विहिरींसाठी ५.३१ लाखांचा खर्च गृहीत धरण्यात आला आहे. विहिरी खोल करण्यासाठी २ गावांत ४ लाखांचा खर्च प्रस्तावित आहे. टंचाई निवारणाची मोठी भिस्त खासगी विहिरींवर असल्याने १८८ गावे व ११३ वाड्यावर खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्याचे नियोजन आहे. त्यासाठी एक कोटी ६९ लाखांचा खर्च अपेक्षित आहे. टँकरसाठी विशेष निधी

पावसाचे प्रमाण कसेही असले तरी जिल्ह्याच्या ठरावीक भागात उन्हाळ्यात टँकर सुरूच करावे लागतात. तीव्र दुष्काळ असेल तर टँकरची संख्या ५००च्या पुढे जाते. या उन्हाळ्यात ८९७ गावे व ३५५० वाड्यांसाठी टँकर किंवा बैलगाडीने पाणीपुरवठा करावा लागू शकतो. त्यासाठी आराखड्यात सर्वाधिक ८० कोटी ९४ लाख खर्च गृहीत धरला गेला आहे. याशिवाय टँकर भरण्यासाठी वेगळ्या एक कोटी ६९ लाखांच्या निधीची तरतूद आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर