शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
3
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
4
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
5
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
6
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
7
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
8
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
9
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
10
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
11
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
12
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
13
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
14
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
15
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
16
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
17
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
18
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
19
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
20
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स

जिल्ह्यातील ६५२ गावांना मिळणार शाश्वत पाणी

By admin | Updated: July 21, 2014 00:27 IST

अहमदनगर : राष्ट्रीय पेयजल योजनेतून जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने २०१५ पर्यंत जिल्ह्यातील ६५२ गावे आणि वाड्यासाठी ३२९ योजनांचे उद्दिष्ट ठेवण्यात आलेले आहे.

अहमदनगर : राष्ट्रीय पेयजल योजनेतून जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने २०१५ पर्यंत जिल्ह्यातील ६५२ गावे आणि वाड्यासाठी ३२९ योजनांचे उद्दिष्ट ठेवण्यात आलेले आहे. यातील ९३ योजनांचे काम प्रगतीपथावर असून आॅगस्टपर्यंत ३२ योजनांचे काम पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय पेयजल कार्यक्रमात जिल्ह्यासाठी २०१३ ते २०१५ या कालावधीसाठी ५९ कोटी ८७ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला होता. त्यातून सहा कोटी ५८ लाख रुपये खर्च झालेला आहे. एप्रिल महिन्यापर्यंत अकोले, कोपरगाव आणि कर्जत तालुक्यातून प्रत्येकी एक योजना पूर्ण झाली असल्याची माहिती पाणी पुरवठा विभागाने दिलेली आहे. ग्रामीण भागातील जनतेला शाश्वत पाणी पुरवठा व्हावा, यासाठी ही योजना राबविण्यात येत आहे. योजनेत ६५२ गावे आणि वाड्याचा समावेश आहे. या ठिकाणी ३२९ योजना मंजूर करण्यात आल्या असून ९३ ठिकाणी योजनेतील कामे प्रगती पथावर असून ४२ ठिकाणी योजनांना प्रशासकीय, आठ ठिकाणी तांत्रिक मंजूरी देण्यात आलेली आहे. २७ ठिकाणचे अंदाज पत्रक जिल्हा परिषदेला प्राप्त झालेले असून आॅगस्ट महिन्याअखेर ३ योजना पूर्ण होणार आहेत. (प्रतिनिधी)तालुकानिहाय मिळालेला निधी आणि झालेला खर्चअकोले- सहा कोटी ६७ लाखांपैकी ८६ लाख, जामखेड तीन कोटींपैकी १५ लाख ७४ हजार, कर्जत तीन कोटी, कोपरगाव एक कोटी ९२ लाखांपैकी १३ लाख, नगर तीन कोटी ९१ लाखांपैकी ३८ लाख ७४ हजार, नेवासा दोन कोटी ४० लाखांपैकी २६ लाख ६५ हजार, पारनेर नऊ कोटी ९७ लाखांपैकी २२ लाख ९० हजार, पाथर्डी एक कोटी ४८ लाखांपैकी १९ लाख ७६ हजार, राहाता एक कोटी ५६ लाखांपैकी २४ लाख ५० हजार, राहुरी पाच कोटी ९३ लाखांपैकी ५९ लाख, संगमनेर दहा कोटी २२ लाखांपैकी दोन कोटी ७७ लाख , शेवगाव २८ लाख, श्रीगोंदा तीन कोटी ४३ लाख, श्रीरामपूर पाच कोटी ६१ लाखांपैकी ७३ लाख ५३ हजार.कामे सुरुच नाही योजनेचा कालावधी हा २०१५ पर्यंत असल्याने आतापर्यंत ४२९ गावात २३३ योजनेची कामे सुरूच झालेली नाहीत. या कामांची निविदा प्रक्रिया सुरू असून निर्धारीत वेळेत योजना पूर्ण होणार असल्याचे ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडून सांगण्यात आले.